जळगावशैक्षणिक

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत एस.के.पवार विद्यालयाचा देशातून पाचवा क्रमांक

पाचोरा ता. प्रतिनिधी :-

नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध कला उत्सव स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये दिनांक २० ते २३ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांसाठी देशातील विविध राज्यातील तसेच केंद्र शासित प्रदेशातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांनी देशातून पाचवा क्रमांक पटकावत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या कला उत्सव स्पर्धेत शिल्पकला या कला प्रकारातून आपले विद्यार्थी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत होते. त्यांनी “लाकडी ट्रॅक्टर, जेसीबी, पांगुळगाडा, विटीदांडू, बाबागाडी, बळीराम नांगर व दुशर,” तयार केली होती.महाराष्ट्र राज्याला प्रथमच हा मान मिळाला ही गौरवाची बाब आहे.आय. ए.एस.अधिकारी मंगेश दोषी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संपूर्ण उपकरणांची माहिती जाणून घेतली.या विद्यार्थ्यांना प्रा उमेश काटकर व प्रा एस एच जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा चेअरमन सुभाष थेपडे मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ,

तसेच प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही बी गहरवाल, पर्यवेक्षक वाय डी ठाकूर, डी पी राजपूत व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

 

ठळक मुद्दे

सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांनी या कला प्रकारात संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

 

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारी सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा ही जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली.

सादरीकरणातून सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांना राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळाला.

पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी व गौरव विनोद मिस्तरी यांना प्रा.उमेश काटकर व प्रा.एस.एच.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरदेवळ्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचाविल्यामुळे येथिल कृषीउदयोजक, प्रणय भांडारकर यांनी विद्यालयासह यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित केले, सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून विविध राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व कला प्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!