राष्ट्रीयविशेषसामाजिक

 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

नवी दिल्ली :-

भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत

या योजनांचा लाभ अनेक लोक घेत आहेत. ज्या लोकांना २ वेळेचे जेवण नीट मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून काही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे.

‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द.देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

1 जानेवारीपासून केली जाणार कारवाई

बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने १ जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ई-केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!