अपघातकृषीजळगाव

मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!

मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव) — अंधार पसरलेला… शेतांच्या कडेकपारीत शांतता… आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या! अशाच थरारक पद्धतीने आज पहाटे कजगावातील शेतकरी रवींद्र शांताराम महाजन यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने अंदाजे 40 हजार रुपये किमतीची वासरी ठार केली. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे.

फक्त एक दिवसांपूर्वी, म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी, शेजारच्या तांदूळवाडी गावातही बिबट्याने शेतकरी सूर्यकांत पाटील यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून ती ठार केली होती. घटनास्थळी आढळलेले मोठे ठसे आणि हल्ल्याची पद्धत पाहता, हा मोठा नर बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागाने व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दिवसांत गावालगत दोन वासरे ठार झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून वन खात्याकडे होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!