अपघातआपला जिल्हामहाराष्ट्र

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला.!!!

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला.!!!

रात्री झोपेत असताना साप चावला

बीड प्रतिनिधी :-

बीड जिल्ह्यातील काजळीगावा मध्ये घडलेली एक हृदयद्रावक घटना

संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्यामुळे झोपेतच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

ही घटना इतकी अचानक आणि धक्कादायक होती की, संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला गावातील रहिवासी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील १० आणि ८ वर्षांच्या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी झोपेतून उठण्याचं नाव न घेतल्याने पालकांनी पाहणी केली, तेव्हा दोघांच्याही शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळले. तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गाव हादरून गेला आहे. संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून, मृत बालकांच्या पालकांची अवस्था पाहून डोळे पाणावत होते. दोन निष्पाप जीव एका क्षणात काळाच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गावात हंबरडा फुटला होता. या घटनेने गावात सर्पदंशाविषयीची भीती अधिक तीव्र केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ निरीक्षण आणि जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!