एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान.बघा हवामातज्ञ काय म्हणतात.?

0 492

एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान.बघा हवामातज्ञ काय म्हणतात.?

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ

१- संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली असून महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर जळगांव नाशिक या शहर व जिल्हा परिसरात थंडीची लाट व थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवू लागली आहे.

सदर परिस्थिती बुधवार ५ ते शनिवार ८ मार्च असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते.

२- कश्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.?

काल बुधवार ५ मार्चपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ होतांना दिसत आहे.

 

गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवार पर्यंत बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतून बदलातून जाणवत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा