Thursday, January 22, 2026
Google search engine
Home Blog Page 23

Fly Fishing for Taimen in Mongolia

0

Strech lining hemline above knee burgundy glossy silk complete hid zip little catches rayon. Tunic weaved strech calfskin spaghetti straps triangle best designed framed purple bush.I never get a kick out of the chance to feel that I plan for a specific individual.

Separated they live in Bookmarksgrove right at the coast of the Semantics, a large language ocean. A small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart. Even the all-powerful Pointing has no control about the blind texts it is an almost unorthographic life One day however a small line of blind text by the name of Lorem Ipsumdecided to leave for the far World of Grammar. The Big Oxmox advised her not to do so, because there were thousands of bad Commas, wild Question Marks and devious Semikoli, but the Little Blind Text didn’t listen.

On her way she met a copy. The copy warned the Little Blind Text, that where it came from it would have been rewritten a thousand times and everything that was left from its origin would be the word “and” and the Little Blind Text should turn around and return to its own, safe country.

Fishing the Wiggly

But nothing the copy said could convince her and so it didn’t take long until a few insidious Copy Writers ambushed her, made her drunk with Longe and Parole and dragged her into their agency, where they abused her for their projects again and again. And if she hasn’t been rewritten, then they are still using her.
Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts. Separated they live in Bookmarksgrove right at the coast of the Semantics, a large language ocean. A small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia.

Gregor then turned to look out the window at the dull weather. Drops of rain could be heard hitting the pane, which made him feel quite sad. “How about if I sleep a little bit longer and forget all this nonsense”, he thought, but that was something he was unable to do because he was used to sleeping on his right, and in his present state couldn’t get into that position. However hard he threw himself onto his right, he always rolled back to where he was.

  • Responsive Design. Tested on Google Mobile Friendly
  • Header Builder with Live Preview
  • Optimized for Google Page Speed as SEO Signal

Website schema using JSON LD which is recommended by GoogleI am so happy, my dear friend, so absorbed in the exquisite sense of mere tranquil existence, that I neglect my talents. I should be incapable of drawing a single stroke at the present moment; and yet I feel that I never was a greater artist than now.

A collection of textile samples lay spread out on the table – Samsa was a travelling salesman – and above it there hung a picture that he had recently cut out of an illustrated magazine and housed in a nice, gilded frame. It showed a lady fitted out with a fur hat and fur boa who sat upright, raising a heavy fur muff that covered the whole of her lower arm towards the viewer.

Even the all-powerful Pointing has no control about the blind texts it is an almost unorthographic life One day however a small line of blind text by the name of Lorem Ipsum decided to leave for the far World of Grammar. The Big Oxmox advised her not to do so, because there were thousands of bad Commas, wild Question Marks and devious Semikoli, but the Little Blind Text didn’t listen.

Fishing Strategies

His room, a proper human room although a little too small, lay peacefully between its four familiar walls. A collection of textile samples lay spread out on the table – Samsa was a travelling salesman – and above it there hung a picture that he had recently cut out of an illustrated magazine and housed in a nice, gilded frame.

Even the all-powerful Pointing has no control about the blind texts it is an almost unorthographic life One day however a small line of blind text by the name of Lorem Ipsum decided to leave for the far World of Grammar. The Big Oxmox advised her not to do so, because there were thousands of bad Commas, wild Question Marks and devious Semikoli, but the Little Blind Text didn’t listen.

A collection of textile samples lay spread out on the table – Samsa was a travelling salesman – and above it there hung a picture that he had recently cut out of an illustrated magazine and housed in a nice, gilded frame. It showed a lady fitted out with a fur hat and fur boa who sat upright, raising a heavy fur muff that covered the whole of her lower arm towards the viewer.

Website schema using JSON LD which is recommended by GoogleI am so happy, my dear friend, so absorbed in the exquisite sense of mere tranquil existence, that I neglect my talents. I should be incapable of drawing a single stroke at the present moment; and yet I feel that I never was a greater artist than now.

His room, a proper human room although a little too small, lay peacefully between its four familiar walls. A collection of textile samples lay spread out on the table – Samsa was a travelling salesman – and above it there hung a picture that he had recently cut out of an illustrated magazine and housed in a nice, gilded frame.

Even the all-powerful Pointing has no control about the blind texts it is an almost unorthographic life One day however a small line of blind text by the name of Lorem Ipsum decided to leave for the far World of Grammar. The Big Oxmox advised her not to do so, because there were thousands of bad Commas, wild Question Marks and devious Semikoli, but the Little Blind Text didn’t listen.

A collection of textile samples lay spread out on the table – Samsa was a travelling salesman – and above it there hung a picture that he had recently cut out of an illustrated magazine and housed in a nice, gilded frame. It showed a lady fitted out with a fur hat and fur boa who sat upright, raising a heavy fur muff that covered the whole of her lower arm towards the viewer.

Website schema using JSON LD which is recommended by GoogleI am so happy, my dear friend, so absorbed in the exquisite sense of mere tranquil existence, that I neglect my talents. I should be incapable of drawing a single stroke at the present moment; and yet I feel that I never was a greater artist than now.

भडगाव नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 11 मधून सुरेंद्र मोरे यांची जोरदार चर्चा.!!!

0

भडगाव नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 11 मधून सुरेंद्र मोरे यांची जोरदार चर्चा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद निवडणूक 2025 ची सरगर्मी दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार जनतेचा कौल मिळवण्यासाठी तयारीला लागले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून सुरेंद्र मोरे हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे.

सुशिक्षित, कायदेशीर कामकाजाची जाण असलेले आणि जनतेच्या समस्यांशी थेट निगडित असलेले सुरेंद्र मोरे हे लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे मत मतदारांमध्ये व्यक्त केले जात आहे. पालिकेचे कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, “नगरपरिषद ही केवळ राजकारणाचे व्यासपीठ नसून, शहराच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. प्रत्येक नागरिकाचा आवाज पोहोचवणे, मूलभूत सुविधांची उभारणी करणे आणि कायदेशीर मार्गाने प्रशासन चालवणे हेच माझे ध्येय आहे,” असे.सुरेंद्र मोरे म्हणाले.

भडगाव शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष देण्याची भूमिका मांडली आहे.

त्यांचा घोषवाक्य आहे

> “सुशिक्षित उमेदवार, कायदेशीर कामकाज — जनतेचा खरा सेवक!”

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,

सुरेंद्र मोरे हे शांत स्वभावाचे, परंतु ठाम निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला असून जनतेशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत लोकांना भावते आहे.

भडगाव नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये त्यांचा सहभाग स्थानिक राजकारणात नवी ऊर्जा आणि पारदर्शकतेचा संदेश देणारा ठरणार असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

“शब्दपालवी” दीपावली अंक प्रकाशन आणि २१वे कवी संमेलन — मराठी साहित्याचा अविस्मरणीय सोहळा

0

“शब्दपालवी” दीपावली अंक प्रकाशन आणि २१वे कवी संमेलन — मराठी साहित्याचा अविस्मरणीय सोहळा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१वे कवी संमेलन आणि “शब्दपालवी” या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम मुंबई येथील राजा शिवाजी विद्यालयात संपन्न झाला. “शब्दपालवी” या दीपावली विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रलेखक आणि पत्रकार राजन देसाई यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर साहित्यिक पत्रकार अनुज केसरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “शब्दपालवी” चे संपादक सुभाष कासार आणि त्यांच्या सौभाग्यवती रंजना कासार, वारकरी प्रकाशनचे राहुल मुंढे, सहसंपादिका आश्विनी सोपान म्हात्रे, शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर उपस्थित होते. राजन देसाई यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्यिक प्रतिष्ठा लाभली आणि सृजनशीलतेचा भावस्पर्शी माहोल निर्माण झाला.

मासिक कवीसंमेलनात कवींनी “तुळशी विवाह”, “सैनिकहो तुमच्यासाठी” आणि “श्रद्धा सबुरी” या विषयांवरील हृदयस्पर्शी कविता सादर केल्या. काव्यरचना, भावपूर्ण अभिवाचन आणि ओघवत्या सादरीकरणामुळे सभागृहात साहित्यिक वातावरण फुलले. कवीसंमेलनात प्रामुख्याने अशोक सहदेव सुकाळे, कल्पना दिलीप मापूसकर, किशोरी शंकर पाटील, कृपा राकेश म्हात्रे, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), नमिता नितीन आफळे (अभिवाचन), महेश वैजापूरकर, वनिता साळुंखे, विक्रांत मारूती लाळे, वैभवी विनीत गावडे, शैलजा पुरोहित, स्मिता शाम तोरसकर, जान्हवी शिराळकर आणि गुरुदत्त वाकदेकर या सर्व कवींनी आपल्या काव्यसादरीकरणातून मराठी कवितेची गहनता आणि विविधतेची सुंदर झळाळी प्रकट केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या मनात देशभक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेचे सूर जागवले.

या संमेलनाचे आस्वादक म्हणून मिना महेश वैजापूरकर, किरण जाधव आणि राकेश म्हात्रे उपस्थित होते. कवयित्री जान्हवी शिराळकर यांनी सर्व उपस्थित साहित्यप्रेमींना त्यांचा “दुमडलेले कोपरे” हा काव्यसंग्रह सप्रेम भेट देऊन काव्यप्रेमाचा सुंदर आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शोध आनंदाचा फाऊंडेशनचे सचिव सनी आडेकर तसेच जान्हवी शिराळकर, नमिता आफळे, वनिता साळुंखे आणि वैभवी गावडे यांनी सर्व उपस्थितांना स्वादिष्ट खाऊ वाटप करून स्नेहभाव जपला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट छायाचित्रण किरण जाधव आणि विक्रांत लाळे यांनी कौशल्यपूर्णपणे केले, तर प्रभावी सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी करून कार्यक्रमाला ओघवता प्रवाह दिला. त्यांच्या सुसंवादी सूत्रधारणेने संमेलन अधिक रंगतदार आणि आकर्षक बनले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, वैभवी गावडे, अनुज केसरकर, किरण जाधव आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी परिश्रमपूर्वक कार्य केले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे हा साहित्यिक सोहळा संस्मरणीय ठरला. या कवीसंमेलनाने आणि दीपावली अंक प्रकाशन सोहळ्याने मराठी साहित्य, कविता आणि कथासंवेदनांचा एकत्रित उत्सव साजरा केला. भावनांनी ओथंबलेल्या शब्दांच्या या महोत्सवाने नव्या पिढीसमोर मराठी काव्यसंस्कृतीचा दीप उजळवला. खऱ्या अर्थाने “शब्दपालवी” या दीपावली अंकाने मराठी साहित्याला नव्या उमेद, नव्या विचारांची आणि सर्जनशीलतेची पालवी दिली. या कार्यक्रमाने मराठी भाषेचा, कलेचा आणि साहित्यातील अभिव्यक्तीशक्तीचा सुंदर संगम साधत सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी दिली.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी आयोजकांनी जाहीर केले की २२वे कवीसंमेलन येत्या १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे स्वतंत्र निवेदन लवकरच प्रसिद्ध केले जाईल. इच्छुक कवी, साहित्यिक आणि रसिकांनी ही सुवर्णसंधी नक्की साधावी, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. उपस्थित साहित्यप्रेमींनी “शब्दपालवी” या दीपावली अंकाच्या प्रती विकत घेऊन मराठी साहित्यप्रेमाचा नवा आदर्श इतरांपुढे पुढे निर्माण केला.

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी.मुंबईत पारा २०°C खाली; जळगावात सर्वात कमी तापमान १०.८°C

0

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी.मुंबईत पारा २०°C खाली; जळगावात सर्वात कमी तापमान १०.८°C

जळगाव प्रतिनिधी :-

१० नोव्हेंबर २०२५

राज्यात अखेर गुलाबी थंडीची चाहूल प्रत्यक्ष जाणवू लागली आहे. काही दिवसांपासून हवामानात झालेला हळूहळू बदल आता ठळकपणे जाणवत असून, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान घसरले आहे. पुणे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जळगावमध्ये किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. मुंबईतही या हंगामात प्रथमच पारा २० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने थंडीचा प्रत्यक्ष अनुभव मुंबईकरांना येऊ लागला आहे.

जळगावमध्ये बोचरी थंडीचा शिरकाव

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी गारठा वाढला आहे. रविवारी पहाटे शहरात १०.८°C इतके तापमान नोंदले गेले. या गारठ्यामुळे नागरिक चुलीपाशी ऊब घेताना दिसले. सकाळच्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती, तर ग्रामीण भागात पिकांवर दवबिंदू दिसत होते. शेतकऱ्यांच्या मते, अशा प्रकारची थंडी ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीस फार क्वचितच जाणवते.

पुणे, नाशिक, औरंगाबादमध्येही तापमानात घट

जळगावच्या तुलनेत पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्येही तापमान घसरले आहे.

पुणे: १५.९°C

नाशिक: १३.४°C

औरंगाबाद: १४.२°C

हवामान तज्ज्ञांच्या मते, आकाश निरभ्र राहिल्यामुळे दिवसाची उष्णता रात्री लवकर नष्ट होते. त्यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट होत आहे.

१० नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढणार

हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, १० नोव्हेंबरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

उत्तर-पश्चिम भारतातून येणारे कोरडे आणि थंड वारे सध्या मध्य भारताच्या दिशेने प्रवास करत आहेत. या वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पुढील आठवडाभर राहील.

हवामान विभागाचे अधिकारी सांगतात, “आकाश निरभ्र राहिल्यामुळे दिवसाची उष्णता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.”

मुंबईत ‘थंडीचा गुड मॉर्निंग’ अनुभव

लांबलेली उष्णता संपून मुंबईतही अखेर थंडीने एन्ट्री घेतली आहे. रविवारी पहाटे सांताक्रूझ वेधशाळेत १९.६°C इतके किमान तापमान नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा २.३ अंशांनी कमी आहे.तर कोलाबा वेधशाळेत २२.४°C इतके तापमान नोंदवले गेले.

IMD मुंबईच्या तज्ज्ञांच्या मते, “उत्तर-पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात पुढील आठवडाभर कायम राहतील. त्यामुळे तापमानात आणखी घट होऊन दिवसाही हवामान गार राहील.”

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सूचना

पहाटेच्या वेळी थंडीमुळे दवबिंदूंचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य संरक्षण करावे.

वाहनचालकांनी सकाळी धुक्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवावे.

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांचा वापर करावा.

हिवाळ्याचा पहिला टप्पा सुरू

या आठवड्यापासून महाराष्ट्रात हिवाळ्याची औपचारिक सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात यंदाची थंडी अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे.

वडाळे वडाळी विकासोचे नवनिर्वाचीत चेअरमन धर्मराज अहिरराव यांचा सत्कार पञकार अशोक परदेशी यांनी केला.

0

वडाळे वडाळी विकासोचे नवनिर्वाचीत चेअरमन धर्मराज अहिरराव यांचा सत्कार पञकार अशोक परदेशी यांनी केला.

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वडाळे वडाळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी धर्मराज नगराज अहिरराव (माजी सरपंच) तर व्हाईस चेअरमन पदि जगन्नाथ पुंडलिक शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन पदाचा शिवाजी आमले तर व्हाईस चेअरमन पदाचा समाधान आमले या दोघांनी ठरल्याप्रमाणे पदाचे राजीनामे दिल्याने या रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ही निवडणुक दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी प्रणिता भोयर सहकार अधिकारी चाळीसगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना संस्थेचे सचिव अरुण राजपुत यांनी याकामी सहकार्य केले. याप्रसंगी संचालक मंडळामार्फत नवनिर्वाचीत दोघा पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक शिवाजी विक्रम आमले, अजित अहिरराव, सुभाष अहिरराव, समाधान आमले, भोजराज आमले, शुभांगी पाटील, सीमाबाई आमले, मंजुळाबाई आमले, अर्जुन सूर्यवंशी, रामदास बिराडे ,सुखदेव आमले आदि सर्व संचालक व ग्रामस्थ, शेतकरी, सभासद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील निलेश अहिरराव तसेच बापु आमले, एकनाथ आमले, राजू आमले, शरद सूर्यवंशी, शरद अहिराव, तुषार अहिरराव, संदीप आमले, बाबाजी सुर्यवंशी , रवींद्र सुर्यवंशी, विकास पाटील आदि नागरीक उपस्थित होते. तसेच आभार संस्थेचे सचिव अरुण राजपूत यांनी मानले. संस्थेच्या कर्मचार्यांनी याकामी परीश्रम घेतले.

विकासोच्या चेअरमन पदी वडाळा गाव चे माजी सरपंच धर्मराज नगराज अहिरराव यांची निवड झाल्याबद्दल भडगावचे लोकमत पत्रकार अशोक परदेशी, मळगावचे शैलेश भाऊराव मोरे, दशरथ दिनकर सोनवणे रवींद्र हिम्मत मोरे , रामदास नारायण मोरे , ज्ञानेश्वर दशरथ सोनवणे आदि मिञ परीवारामार्फत मळगाव गावी त्यांचा सत्कार केला. व निवडीबद्दल सर्व मिञ परीवारामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

लेखणीचा सन्मान — पत्रकारितेच्या अस्तित्वाचा आत्मा.!!!

0
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 70

लेखणीचा सन्मान — पत्रकारितेच्या अस्तित्वाचा आत्मा.!!!

संपादक  अबरार मिर्झा

 

पत्रकार हा केवळ बातम्या सांगणारा नाही; तो समाजाचा आरसा आहे. हा आरसा समाजातील वास्तव दाखवतो — ते सुंदर असो वा कुरूप. पण जेव्हा समाज त्या आरशाकडे दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा त्याला स्वतःचं खरं रूप दिसेनासं होतं. आज पत्रकारितेच्या क्षेत्रात नेमकं हेच घडत आहे — पत्रकार आणि पत्रकारिता दोन्हीचं महत्त्व लोक हळूहळू विसरत चालले आहेत.

पत्रकाराचे श्रम — एक अदृश्य संघर्ष

आजच्या माहितीच्या स्फोटक युगात प्रत्येकालाच प्रसिद्धीची भूक लागली आहे. कोणाचं उद्घाटन असो, कार्यक्रम असो, राजकीय बैठक असो किंवा सामाजिक उपक्रम — सर्वांना “माध्यमांत बातमी हवी” असं वाटतं. “फोटो टाका”, “बातमी देऊन टाका”, “थोडं प्रसिद्ध करा” — ही वाक्यं पत्रकाराला दररोज ऐकावी लागतात.
पण या मागे किती परिश्रम, तपासणी, लेखन, छायाचित्रण, आणि संपादनाचं घाम आहे, हे फार कमी जणांना माहीत असतं. एक बातमी तयार होणं म्हणजे एक जबाबदारीची प्रक्रिया आहे — ज्यासाठी वेळ, ज्ञान, आणि तटस्थता लागते.

“मोफत बातमी” ही मानसिकता — पत्रकारितेवरील आघात

आज अनेक ठिकाणी पत्रकारांकडून मोफत बातमी किंवा कव्हरेजची अपेक्षा केली जाते. परंतु, जेव्हा एखादी गोष्ट मोफत मिळते, तेव्हा तिचं महत्त्व कमी होतं — ही मानवी प्रवृत्ती आहे. पत्रकार जेव्हा आपल्या लेखणीचा वापर फुकटात करू लागतो, तेव्हा समाजही ती लेखणी गृहित धरतो.
पत्रकार हा समाजासाठी काम करणारा आहे, पण तोही माणूस आहे — त्याचंही व्यावसायिक आयुष्य आहे, जबाबदाऱ्या आहेत. म्हणूनच पत्रकारांनी स्वतःचं मूल्य स्वतः ठरवणं आता काळाची गरज बनली आहे.

आत्मसन्मान आणि नैतिकता — पत्रकारितेचे दोन स्तंभ

पत्रकारितेचा पाया हा आत्मसन्मान आणि नैतिकतेवर उभा आहे. लेखणी ही पत्रकाराची ओळख आहे, त्याचं शस्त्र आहे. तिचं विक्रीकरण नको, पण तिचं अवमूल्यनही नको.
सत्यासाठी निडर राहणं जितकं आवश्यक आहे, तितकंच स्वतःच्या श्रमांचा सन्मान राखणंही गरजेचं आहे. कारण जो पत्रकार स्वतःचा आदर करतो, तोच समाजाकडून सन्मान मिळवतो.

सोशल मीडियाचा परिणाम — पत्रकारितेचं अवमूल्यन

आज सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण “पत्रकार” बनला आहे. मोबाईलवर व्हिडिओ टाकणं, पोस्ट लिहिणं, वा अफवा पसरवणं — या गोष्टींना काही लोक पत्रकारिता म्हणतात. पण खरी पत्रकारिता तीच — जी तथ्यांवर आधारित, जबाबदार, आणि तटस्थ असते.
हीच खरी ओळख टिकवण्यासाठी व्यावसायिक पत्रकारांनी आपलं स्थान आणि आपली प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे.

आर्थिक वास्तव — पेपर चालवणे कठीण झाले

आजच्या महागाईच्या काळात वृत्तपत्र चालवणं ही स्वतःतच एक कठीण लढाई आहे. कागदाचे दर वाढले, जाहिरातींचा ओघ कमी झाला, वाचकांचे माध्यम डिजिटल झाले — अशा परिस्थितीत पारंपरिक पत्रकारितेचं आर्थिक गणित कोसळतंय.
पेपर चालवणं म्हणजे आता समाजसेवा नव्हे तर जगण्याचा संघर्ष झाला आहे. “जाहिरात मिळेल तरच खर्च निघतो” — ही वस्तुस्थिती प्रत्येक संपादक आणि प्रतिनिधीच्या आयुष्याशी जोडली गेली आहे.

पत्रकारितेचा आत्मा जिवंत ठेवा

पत्रकारितेचा मूळ उद्देश समाजसेवा आहे — पण समाजसेवेच्या नावाखाली पत्रकाराला आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिकदृष्ट्या पिचवणं हे चुकीचं आहे.
समाजाला दिशा देणारा पत्रकार जर स्वतःच दिशाहीन झाला, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात होतो.
म्हणूनच आजची वेळ सांगते —

> “स्वतःच्या लेखणीचा सन्मान करा. फुकटात प्रसिद्धी देऊ नका.”
कारण जेव्हा पत्रकार स्वतःचा आदर करतो, तेव्हाच समाज त्याला सन्मान देतो. आणि हाच सन्मान म्हणजेच पत्रकारितेच्या अस्तित्वाचा खरा आत्मा आहे.

एक शाम किशोर अप्पा के नाम पाचोर्‍यात शायरीचा सोहळा उत्साहात संपन्न.!!!

0
0-0x0-2-0-{}-0-0#

एक शाम किशोर अप्पा के नाम पाचोर्‍यात शायरीचा सोहळा उत्साहात संपन्न.!!!

देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग साहित्य-संस्कृतीचा मेळा रंगला

पाचोरा प्रतिनिधी :-

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “एक शाम किशोर अप्पा के नाम” हा अखिल भारतीय मुशायरा गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पाचोरा येथील आठवडे बाजार मैदानावर भव्यदिव्य वातावरणात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर श्री. संजय गोहिल यांनी भूषविले, तर मुख्य पाहुणे म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव–पाचोरा मतदारसंघ) उपस्थित होते.

देशभरातील नामांकित शायर आणि कवयित्रींनी आपल्या सुरेल आवाजात आणि शब्दांच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शायरांच्या फेहरिस्तीत हामिद भुसावली, अल्ताफ ज़िया, तबरेज़ राणा, निकहत अमरोहवी, हिमांशी बाबरा, इमरान रशीद, इब्राहीम सागर, पप्लू लखनऊ, मुजावर मेलेगाव, जुबेर अली ताबीश आणि निजमा जमील साही यांसारख्या नामवंत कलावंतांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे आयोजन हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन, मोहसिन खान सर आणि अकरम कुरेशी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले होते. स्थानिक साहित्यप्रेमी, युवक संघटना आणि सांस्कृतिक मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मुशायर्‍याचे उद्दिष्ट साहित्य, संस्कृती आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश पोहोचवणे हे असून आयोजकांच्या म्हणण्यानुसार — “शब्दांच्या माधुर्यातून प्रेम आणि एकतेचा सुगंध दरवळवणे” हेच या सोहळ्याचे खरे ध्येय आहे.

पाचोरा शहरात अशा दर्जेदार शायरी संमेलनाचे हे पहिलेच आयोजन झाल्याने साहित्यप्रेमी व रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा.!!!

0

भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहीलेल्या ‘वंदे मातरम’ या गीतास दि. ७ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्त भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय पाचोरा रोड भडगाव या ठिकाणी सकाळी कार्यक्रम सुरू झाला.

या कार्यक्रमात सुरवातीस मान्यवारांचे स्वागत, पोलीस निरीक्षक महेश शर्मा प्राचार्य,गायकवाड एन.एन. तसेच स्थानिक प्राचार्य यु.टी.ठाकुर , प्रमुख वक्ते डॉ. निलेश पाटील व ईतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रजल्वन करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.प्रस्तावना व सुत्र संचलन डॉ.प्रा.दिनेश तांदळे यांनी केली. सकाळी ९.५० मीनीटांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे (सहा कडवे असलेले) समुह गायन करण्यात आले. नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव यांचे प्रशिक्षणार्थ्यांने वंदेमातरम या गीतावर व स्वतंत्रपुर्वी झालेल्या देशातील क्रांतीकारक उलाढालीवर आधारीत लघू पथनाटय सादर करण्यात आले. नंतर आपला भारतदेश विवीध परंपरेने नटलेला असल्याने पारंपारीक वेशभुषांवर आधारीत पोशाखात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव यांचे प्रशिक्षणार्थ्यी व आदर्श कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.डॉ. वाल्मीक आहीरे साहित्यीक यांना खानदेशी भाषेत देशभक्तीपर कवीता सादर करण्यात आली.

त्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. निलेश पाटील, यांनी देशभक्ती वर क्रांतीवीर यांचे बलीदान व चळवळीवर उत्तम भाषण करुन सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थिती सर्व मान्यवरांचे प्रशांत एस. जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पञकार अशोक परदेशी, पत्रकार आर.बी.पाटील, प्रा.सी.व्हि.बीऱ्हाडे, आर.जे. कसोदे, गोपाळ पाटील, हेमंत खैरनार, डॉ.साहेबराव अहीरे, वैशाली पाटील, संगीता जाधव,निवाशी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुशिल सोनवणे, डॉ. डी.एम.मराठे, ह.भ.प.शाम महाराज, विजय देशपांडे, अशोक तायडे, अरुण चौधरी, डॉ.एस.एन.हडोलीकर, गजानन चौधरी, एच.डी. पाटील, डॉ. सीमा सौंदाने व शासकीय औ.प्र.संस्था येथील पगारे, दिनेश पाटील ,व्हि.एस.पाटील , अमन मते, राहुल मोरे , दिपक वनवे, गीरीष कोळंबे तसेच राजेंद्र पाटील , सुमनताई गिरधर पाटील माध्यमीक महाविद्यालय भडगाव यांचे विद्यार्थी व आदर्श कन्या महाविद्यालय यांचे विद्यार्थी तसेच खाजगी औ.प्र.संस्थेचे व शासकीय औ.प्र.संस्थेचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. एकुण १२३० विद्यार्थी व ७३ मान्यवरांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला.

अभिजित राणे : श्रमिकांच्या हृदयात जागा निर्माण करणारे नेतृत्व.!!!

0

अभिजित राणे : श्रमिकांच्या हृदयात जागा निर्माण करणारे नेतृत्व.!!!

 

“नेतृत्व म्हणजे पद नव्हे, ती लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची जबाबदारी आहे.” — या एका वाक्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या जीवनदृष्टीचं सार सामावलेलं आहे.

 

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव म्हणून ते केवळ कामगारांचे प्रतिनिधी नाहीत, तर त्यांच्या भावविश्वातील आशेचा किरण आहेत. त्यांच्या ८ नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विचारविश्वाचा आणि संघर्षमय प्रवासाचा वेध घेण्यासाठी हा संवाद साधला. सामाजिक संवेदनशीलतेचा, श्रमिक सन्मानाचा आणि न्यायनीतीचा ध्यास घेणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधण्याचा *गुरुदत्त दिनकर वाकदेकर* यांना सन्मान लाभला. संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या शब्दांतून प्रामाणिकपणा, श्रमाची प्रतिष्ठा आणि कार्यकर्त्यांबद्दलची ममत्वपूर्ण बांधिलकी जाणवली.

 

प्रश्न: आपल्या बालपणाने आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाने आजचा नेता घडवण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली?

 

उत्तर: मी एका मध्यमवर्गीय, श्रमिक संस्कृतीत वाढलो. वडिलांचा प्रामाणिकपणा, आईची जिद्द आणि समाजातल्या अन्यायाविरुद्धचा संताप — या सगळ्यांनी माझं बालपण आकारलं. ते दिवस मला शिकवून गेले की श्रम हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, तर आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.

छोट्या छोट्या गोष्टींतून मोठी स्वप्नं पाहायला मी तेव्हाच शिकलो. बालपणात पाहिलेला प्रामाणिक घाम, वडिलांच्या डोळ्यांतला संघर्ष आणि आईच्या हातांतील प्रेमळ स्पर्श — यांनी माझ्या संवेदनांचा पाया रचला. आजही जेव्हा एखाद्या कारखान्यात जातो, तेव्हा कामगारांचा घाम माझ्या आयुष्याचं प्रेरणास्थान वाटतो.

 

प्रश्न: कामगार संघटनेच्या कार्यात पाऊल ठेवताना आपल्याला कोणते आव्हान सर्वात मोठे वाटले?

 

उत्तर: सर्वात मोठं आव्हान म्हणजे विश्वास मिळवणं. कामगारांना अनेकदा फसवलं गेलं होतं. त्यांचं मन दुखावलेलं होतं. त्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवणं हे माझं पहिलं ध्येय होतं. मी केवळ भाषणांनी नाही, तर कृतीतून दाखवून दिलं — “तुमचा हक्क हा मागायचा नाही, तो जगायचा आहे.” याच विश्वासातून श्रमसंस्कृतीचा पाया रचला गेला. मी नेहमी म्हणतो, “संघर्ष हा जरी कठीण असला तरी त्यातून सन्मानाची फळं उमलतात.”

 

प्रश्न: आजच्या औद्योगिक व्यवस्थेत कामगारांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. आपण त्याकडे कसे पाहता?

 

उत्तर: खरं आहे, तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि करार पद्धतीमुळे स्थैर्य कमी झालं आहे. पण मी नेहमी सांगतो — “यंत्रांपेक्षा माणूस मोठा.” कामगार फक्त उत्पादनाचं साधन नाही; तो अर्थव्यवस्थेचा प्राण आहे. शासन आणि उद्योग या दोघांनीही हे ओळखणं गरजेचं आहे. मानवतेचा दृष्टीकोन हरवला, तर विकासाचं समीकरण अपूर्ण राहील. म्हणून तंत्रज्ञानाचा विकास आणि मानवी संवेदनांचा संतुलित संगम आवश्यक आहे. आज आपण श्रमाचा सन्मान, शिस्त आणि सुरक्षा या त्रिसूत्रीला पुन्हा केंद्रस्थानी आणलं पाहिजे.

 

प्रश्न: आपल्या कार्यात मानवी मूल्यांना आपण प्राधान्य देता. यामागचं तत्त्वज्ञान काय आहे?

 

उत्तर: मला वाटतं, नेतृत्व म्हणजे फक्त संघर्ष नाही. ते समजूतदारपणा, करुणा आणि संवेदनशीलतेचं मिश्रण आहे.

कामगारांच्या डोळ्यांत अश्रू असतील, तर तो माझा पराभव आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णयात मी मानवी मूल्यांचा विचार अग्रक्रमाने ठेवतो. श्रम हे केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिक संपत्ती आहे. त्या संपत्तीचा सन्मान करणं म्हणजे समाजाचं खरेखुरं प्रबोधन.

म्हणून मी नेहमी धडक संघटनेत सांगतो — “संवेदना हेच आपलं शस्त्र आहे.”

 

प्रश्न: आपल्या कार्यातील काही महत्त्वपूर्ण टप्पे सांगाल का, जे आजही स्मरणात आहेत?

 

उत्तर: अनेक क्षण आठवतात. एखाद्या कामगाराचं मूल पहिल्यांदा शाळेत गेलं, एखाद्या महिलेला समान वेतन मिळालं किंवा कामगार गृहनिर्माण योजनेत घर मिळालं — हे क्षण माझ्या आयुष्याचं सोनं आहेत.

मी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या औद्योगिक पट्ट्यात कामगारांसाठी आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती आणि कायदेशीर मदतीच्या अनेक योजना सुरू केल्या. या योजनांनी हजारो कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आत्मसन्मान आणला. माझ्यासाठी हेच खरं पारितोषिक आहे.

 

प्रश्न: आजच्या पिढीतील कामगार आणि तरुण नेतृत्वाबद्दल आपलं मत काय आहे?

 

उत्तर: आजचा तरुण ऊर्जावान आहे, पण त्याला दिशेची गरज आहे. मोबाईलच्या युगात माहिती आहे, पण अनुभव नाही. म्हणून मी नेहमी सांगतो — “तंत्रज्ञान शिका, पण माणूस राहा.” नेतृत्वाचा पाया म्हणजे संवाद, शिस्त आणि सहवेदना. कामगारांचा आवाज बनताना जबाबदारीची जाणीव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी अनेक युवा नेत्यांना मार्गदर्शन करतो. त्यांना सांगतो — नेतृत्व म्हणजे पुढे जाणं नाही, तर इतरांना सोबत घेऊन पुढे जाणं.

प्रश्न: आपल्या मते खऱ्या नेतृत्वाची व्याख्या काय आहे?

उत्तर: माझ्यासाठी नेता म्हणजे असा व्यक्ती, जो संकटातही शांत राहतो आणि अंधारातही इतरांसाठी दिवा पेटवतो. सत्ता किंवा पद हे नेतृत्वाचं लक्षण नाही; प्रामाणिकता आणि कृतीशीलता हेच खरे निकष आहेत.

मी कामगारांच्या वेदना ऐकल्या, त्यांच्या नजरेतून जग पाहिलं. त्यामुळे आजही मी स्वतःला नेता नव्हे, तर कामगारांचा एक साथीदार समजतो.

प्रश्न: आपल्या कार्यातून समाजासाठी कोणता संदेश द्यायचा आहे?

उत्तर: एकच — “एकजुटीचा आवाज कधीही मंद होऊ देऊ नका.” कामगार, शेतकरी, शिक्षक, आरोग्यसेवक — सगळे श्रमशील घटक या समाजाचे कणा आहेत.

आपल्याला विभाजन नाही, संवेदनांची एकता हवी. मी नेहमी म्हणतो — “श्रमाचा सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान.” जर प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्तव्याला समर्पित राहिला, तर समाजात अन्यायासाठी जागाच राहणार नाही.

प्रश्न: आपल्या वाढदिवशी आपण कोणती एक गोष्ट सर्वांसोबत सामायिक कराल?

उत्तर: माझ्या वाढदिवशी भेटवस्तू नकोत; फक्त एक वचन द्या — “आपल्या हक्कासाठी शांतपणे पण ठामपणे लढा द्या.” मी आजही त्या लढाईचा सैनिक आहे. माझं आयुष्य कामगारांच्या न्यायासाठी, त्यांच्या हास्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या दिव्यासाठी अर्पण आहे. नेता आपल्या वैभवासाठी नव्हे, तर इतरांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी जगला पाहिजे — ही माझी भूमिका आहे.

प्रश्न: आपल्या व्यक्तिमत्त्वाची भावनिक बाजू ओळखू इच्छितो.

उत्तर: नेतृत्वात कठोरता आवश्यक असते, पण माझ्या अंतःकरणात एक मृदू किनारा आहे. जेव्हा एखाद्या कामगाराचं मूल शाळेत दाखल झाल्याचं समजतं, तेव्हा मला वाटतं — हीच माझी खरी कमाई. कधी एखादा कामगार म्हणतो, “साहेब, आता माझं मूल डॉक्टर झालं,” तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी येतं. ही माणुसकीच मला पुन्हा नव्या उर्जेने कार्य करायला प्रेरणा देते.

प्रश्न: आपण आजवर अनेक सामाजिक प्रकल्प राबवलेत. त्याबद्दल थोडक्यात सांगाल का.?

उत्तर: नक्कीच. कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि शिष्यवृत्ती या योजना वर्षानुवर्षे सुरू आहेत.

कोरोना काळात आम्ही हजारो कुटुंबांना अन्नधान्य, औषधे आणि वैद्यकीय मदत पुरवली. या सर्व उपक्रमांचा गाभा होता — “मानवतेचा धर्म सर्वश्रेष्ठ.” कामगारांसोबतच त्यांच्या कुटुंबाचंही कल्याण होणं हेच माझं ध्येय आहे.

प्रश्न: युवा कार्यकर्त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?

उत्तर: आजच्या काळात युवा कार्यकर्त्यांनी केवळ आंदोलनं, भाषणं किंवा सोशल मीडियावरची उपस्थिती एवढ्यावर समाधान मानू नये. समाजपरिवर्तन ही दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि संवेदनशील प्रक्रिया आहे — हे त्यांनी लक्षात ठेवावं. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिसरातील समस्यांना स्वतःची जबाबदारी समजून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतो, तेव्हाच खरी लोकसेवा घडते. यासाठी निःस्वार्थ वृत्ती, पारदर्शकता आणि टीमवर्क या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. युवकांनी सामाजिक कार्य हे प्रतिष्ठेचं नव्हे, तर कर्तव्याचं क्षेत्र आहे, ही जाणीव ठेवून काम करावं. जनतेशी जोडून, त्यांच्या वेदना समजून घेतल्या की लोक आपोआपच तुमचं नेतृत्व मान्य करतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की खरा नेता तोच, जो लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यकर्ता सुरज भोईर. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. त्यांच्या कार्यातून युवांना हे शिकता येतं की — “स्वतःमध्ये बदल करा आणि इतरांनाही त्या बदलासाठी प्रेरित करा.” त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवा हे त्रिसूत्री मूल्य स्पष्ट दिसतात. त्यांनी केवळ समाजातील समस्या दाखवल्या नाहीत, तर त्यावर उपाय सुचवले आणि अंमलात आणले. हीच खरी समाजसेवा — शांतपणे, सातत्याने आणि परिणामकारकतेने केलेलं कार्य. आजच्या तरुणांनी सुरज भोईर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी कार्य केले, तर आपल्या देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल बनेल. कारण बदलाची सुरुवात नेहमी एका ठाम पावलानेच होते.

प्रश्न: शेवटी, आपल्या जीवनवाक्याचा अर्थ सांगाल का?

उत्तर: माझं जीवनवाक्य अगदी सोपं आहे — “माणूसपण हरवू नका.” बाकी सगळं मिळवता येतं, पण संवेदना, करुणा आणि न्यायबुद्धी हेच खरे संपत्तीचे घटक आहेत. मी आजही कामगारांच्या हृदयातील आवाज ऐकतो, तोच माझा मार्गदर्शक आहे. नेतृत्व म्हणजे प्रकाश देणं — आणि मी तो प्रकाश श्रमाच्या घामातून, कामगारांच्या हसऱ्या चेहऱ्यांतून पाहतो.

अभिजित राणे यांची प्रत्येक ओळ, कृती आणि निर्णय श्रमाचा गौरव आणि मानवतेचं प्रबोधन घेऊन येते. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ संघटनेपुरता मर्यादित नाही, तर समाजघटकांना एकत्र आणणारा आहे. त्यांच्या वाढदिवशी एकच प्रार्थना — हा दिवा असाच तळपत राहो, कामगारांच्या आयुष्यात उजेड फुलवत राहो. संवाद संपताना त्यांच्या आवाजात नितळ शांतता आणि विश्वास होता — एक अशी शांतता, जी संघर्षानंतरच्या विजयातून जन्म घेते. अभिजित राणे यांच्या डोळ्यांत भविष्यातील भारताची झलक दिसते — जिथे प्रत्येक श्रमिक सन्मानाने जगतो, प्रत्येक हाताला काम आहे आणि प्रत्येक मनात आत्मगौरव आहे.

या संवादातून उमगलेली भावना एकच — “अभिजित राणे” हे नाव फक्त एक नेता नाही, तर श्रमशील भारताच्या आत्म्याशी एकरूप झालेली ओळख आहे.

अखेर भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु. अशोकबापु परदेशी यांचे प्रयत्नाला आले यश. चालक व वाहकांचा केला सत्कार.

0

अखेर भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु. अशोकबापु परदेशी यांचे प्रयत्नाला आले यश. चालक व वाहकांचा केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी :

भडगाव ते वाडे काही बस फेर्या पाचोरा आगारामार्फत काही दिवसांपासुन अचानक बंद करण्यात आलेल्या होत्या. या काही बस फेर्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रवासासाठी अतोनात होल होत होते. या बंद बस फेर्या सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन पञकार अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानक वाहतुक निरीक्षक आर. एस. चौधरी , पाचोरा आगाराला दि. २९ रोजी बुधवारी दिलेले होते. बंद बस फेर्या तात्काळ सुरु न केल्यास आपण भडगाव बसस्थानकासमोर प्रवाशांसह उपोषणास बसु असा ईशारा दिला होता. माञ

एस टी महामंडळाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असुन भडगाव ते वाडे बंद बस फेर्या दि. ६ रोजी गुरुवार पासुन पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. पञकार अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. सर्व बस फेर्या सुरु झाल्याने प्रवाशांसह विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे.

याबद्दल प्रवाशांसह विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बस फेर्या सुरु होताच भडगाव बस स्थानकात दि. ६ रोजी गुरुवारी पञकार अशोकबापु परदेशी यांचेसह वाडे येथील पी. आर. माळी, पञकार राजु शेख आदिंनी बसचे चालक शरद कोळी व वाहक वाय. डी. सैंदाणे यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार केला. व भडगाव ते वाडे सर्व बस फेर्या पुर्ववत सुरु झाल्याबद्दल एस टी महामंडळाचे भडगाव ते वाडे गावादरम्यान सर्व गावांमार्फत, प्रवाशांमार्फत अशोकबापु परदेशी यांनी आभार मानले आहेत. यावेळी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक नियंञक पी. एम. राठोड यांचेसह प्रवाशी वर्ग मोठया संख्येने हजर होते.भडगाव ते कोठली, वढधे,निंभोरा,

लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब, वाडे, टेकवाडे बुद्रुक आदि सर्व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे. अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. याबाबत नागरीक, प्रवाशी वर्गाचेही सहकार्य लाभले. या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आव्हानही करण्यात आले आहे.

error: Content is protected !!