Thursday, January 22, 2026
Google search engine
Home Blog Page 24

अखेर भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु. अशोकबापु परदेशी यांचे प्रयत्नाला आले यश. चालक व वाहकांचा केला सत्कार.

0

अखेर भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु. अशोकबापु परदेशी यांचे प्रयत्नाला आले यश. चालक व वाहकांचा केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी :

भडगाव ते वाडे काही बस फेर्या पाचोरा आगारामार्फत काही दिवसांपासुन अचानक बंद करण्यात आलेल्या होत्या. या काही बस फेर्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रवासासाठी अतोनात होल होत होते. या बंद बस फेर्या सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन पञकार अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानक वाहतुक निरीक्षक आर. एस. चौधरी , पाचोरा आगाराला दि. २९ रोजी बुधवारी दिलेले होते. बंद बस फेर्या तात्काळ सुरु न केल्यास आपण भडगाव बसस्थानकासमोर प्रवाशांसह उपोषणास बसु असा ईशारा दिला होता. माञ

एस टी महामंडळाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असुन भडगाव ते वाडे बंद बस फेर्या दि. ६ रोजी गुरुवार पासुन पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. पञकार अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. सर्व बस फेर्या सुरु झाल्याने प्रवाशांसह विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे.

याबद्दल प्रवाशांसह विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बस फेर्या सुरु होताच भडगाव बस स्थानकात दि. ६ रोजी गुरुवारी पञकार अशोकबापु परदेशी यांचेसह वाडे येथील पी. आर. माळी, पञकार राजु शेख आदिंनी बसचे चालक शरद कोळी व वाहक वाय. डी. सैंदाणे यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार केला. व भडगाव ते वाडे सर्व बस फेर्या पुर्ववत सुरु झाल्याबद्दल एस टी महामंडळाचे भडगाव ते वाडे गावादरम्यान सर्व गावांमार्फत, प्रवाशांमार्फत अशोकबापु परदेशी यांनी आभार मानले आहेत. यावेळी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक नियंञक पी. एम. राठोड यांचेसह प्रवाशी वर्ग मोठया संख्येने हजर होते.भडगाव ते कोठली, वढधे,निंभोरा,

लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब, वाडे, टेकवाडे बुद्रुक आदि सर्व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे. अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. याबाबत नागरीक, प्रवाशी वर्गाचेही सहकार्य लाभले. या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आव्हानही करण्यात आले आहे.

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या शुक्रवार पासून मुलाखती ;जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती.!!!

0

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या शुक्रवार पासून मुलाखती ;जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील उमेदवार निश्चितीसाठी कंबर कसून कामाला लागले असून पाचोरा मतदार संघातील पाचोरा व भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शिवसेने कडून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी जाहीर केला असून आ.किशोर आप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांशी स्वतंत्ररीत्या संवाद साधणार आहेत.शुक्रवारी ता.७ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात पाचोरा शहरातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून शनिवारी ता.८ रोजी भडगाव नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती भडगाव येथील शिवसेना कार्यालयात सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहेत.

यावेळी इच्छुकांनी प्रभागाच्या परिपूर्ण माहितीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे आहे आवाहन शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

“एक शाम किशोर अप्पा के नाम” — पाचोर्‍यात ६ नोव्हेंबरला शायरीचा सोहळा.!!!

0

“एक शाम किशोर अप्पा के नाम” — पाचोर्‍यात ६ नोव्हेंबरला शायरीचा सोहळा.!!!

देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग; साहित्य-संस्कृतीचा मेळा सजणार

पाचोरा प्रतिनिधी :-

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “एक शाम किशोर अप्पा के नाम” हा अखिल भारतीय मुशायरा गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पाचोरा येथील आठवडे बाजार मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याने रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर श्री. संजय गोहिल भूषविणार असून, मुख्य पाहुणे आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव-पाचोरा मतदारसंघ) उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील नामांकित शायर व कवयित्री या मुशायर्‍यात सहभागी होऊन आपल्या शायरीच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शायरांच्या फेहरिस्तीत हामिद भुसावली, अल्ताफ ज़िया, तबरेज़ राणा, निकहत अमरोहवी, हिमांशी बाबरा, इमरान रशीद, इब्राहीम सागर, पप्लू लखनऊ, मुजावर मेलेगाव आणि निजमा: जमील साही या दिग्गजांची नावे अग्रक्रमाने समाविष्ट आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन, मोहसिन खान सर,आणि अकरम कुरेशी,यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले आहे. स्थानिक साहित्यप्रेमी, युवक संघटना आणि सांस्कृतिक मंडळांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या मुशायर्‍याचे उद्दिष्ट साहित्य, संस्कृती आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश पोहोचवणे हे असून, आयोजकांनी सांगितले की “शब्दांच्या माधुर्यातून प्रेम आणि एकतेचा सुगंध दरवळवणे” हेच या कार्यक्रमाचे खरे ध्येय आहे.

पाचोरा शहरात अशा दर्जेदार शायरी संमेलनाचे आयोजन प्रथमच होत असल्याने साहित्यप्रेमी व रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

श्रमिक राष्ट्रीय राष्ट्रीय कामगार सेना भडगाव तालुकाअध्यक्षपदी पत्रकार सतीश पाटील यांची निवड. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.

0

श्रमिक राष्ट्रीय राष्ट्रीय कामगार सेना भडगाव तालुकाअध्यक्षपदी पत्रकार सतीश पाटील यांची निवड. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी :—

तालुक्यातील गोंडगाव येथील रहिवाशी भडगाव तालुका पत्रकार सतीश युवराज पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल तर महाराष्ट्र राज्य संघटक नानासाहेब बच्छाव व उत्तर महाराष्ट्र संघटक समाधान बाविस्कर जळगाव जिल्हा संघटक भिकन सोनवणे युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र वराडे सह पत्रकार नातेवाईक मित्रमंडळी, भडगाव तालुका पञकार संघ, गोंडगाव परीसरातील नागरीक आदिंनी अभिनंदन केले आहे. तसेच श्री. सतीषभाऊ पाटील यांचा सत्कार पञकार श्री. अशोकबापु परदेशी व श्री. दत्तुभाऊ मांडोळे यांनीही शाल, पुष्पगुच्छ देऊन केला.

भडगाव वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न.!!!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार — जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष मा. ईश्वर पाटील साहेब यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव व भडगाव तालुका निरीक्षक अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे साहेब यांनी केले.

या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही समाजातील उपेक्षित, वंचित आणि बहुजन घटकांच्या हक्कासाठी लढणारी पक्षसंघटना आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी स्वबळावर लढविणार असून प्रत्येक गावात संघटन वाढविण्याचे कार्य हाती घेतले जाईल.”

ते पुढे म्हणाले की, “आजही अनेक सामाजिक घटक राजकीय सत्तेपासून वंचित आहेत. त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही खरी पर्यायी ताकद म्हणून उभी राहत आहे. सामाजिक न्याय, समानता आणि विकासाच्या विचारांवर आधारित राजकारणाची दिशा आम्ही देणार आहोत.”

कार्यक्रमात जिल्हा महासचिव अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांनी पक्षाच्या धोरणांवर भाष्य करत सांगितले की, “आघाडीचे उद्दिष्ट फक्त राजकारण करणे नसून समाज परिवर्तनासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हे आहे. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात संघटन बांधणीसाठी कार्य करावे.”

या पक्ष प्रवेश मेळाव्यात गोकुळ संसारे, नाना पगारे, सिद्धार्थ पगारे, जगदीश मोरे, योगेश मोरे, प्रल्हाद बाविस्कर, अरुण बाविस्कर आदींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

मेळाव्याला तालुक्यातील विविध विभागांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष बळकट करण्याचा संकल्प केला.

पाचोर्यात कॉग्रेस सोबत तहसील कचेरीत शेतकऱ्यांचा आक्रोश.!!!

0

पाचोर्यात कॉग्रेस सोबत तहसील कचेरीत शेतकऱ्यांचा आक्रोश.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाने अनुदान अनेकांना मिळाले नाही, तर काहींचे पंचनामे झाले नाही चाळीसगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरींना बागायतचे अनुदान मिळाले तर पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायचे पंचनामे करून अनुदान पासुन वंचित ठेवले आहे या विरोधात न्यायासाठी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आणि शेतकऱ्यांनासह तहसीलदार यांच्या दालनात आक्रोश व्यक्त केला..

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते तर काही गावांमध्ये घरामध्ये पाणी घुसून ग्रामस्थांचे नुकसान झाले तर शहरात काही भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोकांची संसार उघड्यावर पडले यावेळी स्थानिक आमदार यांनी मदतीची घोषणा केली, ओला दुष्काळ शासनाने जाहीर केला मात्र यात पूर्णपणे पंचनामे देखील व्यवस्थित झाले नाही तर अनेकांना अद्यापही अनुदान मिळाले नाही त्यातच शेजारच्या चाळीसगाव तालुक्यात बागायतदारांना बागायचे अनुदान मिळाले तर पाचोरा व भडगाव तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांना जिरायत दाखवून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे या विरोधात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह थेट तहसीलदारांची भेट घेतली यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांना सविस्तर माहिती देऊन तात्काळ ज्यांच्या उताऱ्यावर विहीर आहे अशा शेतकऱ्यांना बागायताचे अनुदान तात्काळ मिळावे त्यासोबत पाचोरा शहरातील नागरिकांचे नुकसान झालेले आहेत त्यांना तात्काळ मिळावे डोंगरगाव येथील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना प्रतिक कुटुंब एक लाख आमदारांनी जाहीर केले ते तात्काळ द्यावे या मागण्या करण्यात आल्या यावेळी तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश काढलेले असून अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह लाभार्थी शेतकरी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे निवेदन देतांना गाळण भागातील शेतकरी ईश्वर पाटील, संतोष पाटील, आतिश पाटील, अविनाश पाटील, गोकुळ पाटील काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रताप पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष राहुल शिंदे, ओबीसी सेल चे चेतन बोदवडे, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा.!!!

0

राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा.!!!

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर आता प्रतिक्षा संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

काय म्हणाले निवडणूक आयुक्त.?

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाहीये.

निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत.

निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

वॉर्ड क्रमांक ६ मध्ये धर्मा भाऊ बाविस्कर चर्चेत.!!!

0

वॉर्ड क्रमांक ६ मध्ये धर्मा भाऊ बाविस्कर चर्चेत.!!!

सामाजिक कार्यातून मिळवला जनतेचा विश्वास; नगरपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणात चुरस

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीची उलटगणती सुरू झाली असून, शहरातील प्रत्येक वॉर्डात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक ६, जो यावेळी अनुसूचित जमाती (ST) आरक्षित घोषित झाला आहे, या वॉर्डात आता धर्मा भाऊ बाविस्कर या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धर्मा भाऊ बाविस्कर हे पाचोरा शहरातील ओळखलेले समाजसेवक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध सामाजिक आणि लोकहिताच्या कामांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, वॉर्डातील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, नाले आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, धर्मा भाऊ बाविस्कर हे साधेपण, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्क यासाठी ओळखले जातात. ते नेहमीच नागरिकांच्या संपर्कात राहतात आणि लोकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधतात. कोणत्याही पक्षीय राजकारणात सक्रिय नसतानाही लोकसेवा हेच त्यांचे प्रमुख ध्येय असल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बाविस्कर यांनी अनेक जनहितकारी उपक्रम हाती घेतले आहेत. शाळकरी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण मोहिमा, स्वच्छता अभियान, तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्य व आर्थिक मदत अशा उपक्रमांमुळे त्यांनी समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे वॉर्डातील तरुणवर्ग आणि नागरिकांमध्ये त्यांच्या नावाबद्दल आदर आणि आत्मीयता निर्माण झाली आहे.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये काही अन्य स्थानिक नेते आणि संभाव्य उमेदवारदेखील आपली तयारी दाखवत आहेत. मात्र, सध्या तरी जनतेत “काम करणारा आणि जनतेशी जोडलेला उमेदवार” म्हणून धर्मा भाऊ बाविस्कर यांच्या नावाचीच चर्चा सर्वाधिक ऐकू येत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, बाविस्कर यांची सामाजिक प्रतिमा आणि लोकसंपर्क या दोन गोष्टी त्यांची सर्वात मोठी ताकद ठरू शकतात. पक्ष कोणताही असो, जनतेचा विश्वास जिंकणे हेच खरे यश मानले जाते. या बाबतीत बाविस्कर आधीच पुढे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नगरपरिषद निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, वॉर्ड क्रमांक ६ मधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. पुढील काही दिवसांत या वॉर्डातील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, पण सध्या तरी नागरिकांच्या चर्चेचा विषय एकच – धर्मा भाऊ बाविस्कर!

अमित बघेल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संताप  पाचोरा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन.!!!

0

अमित बघेल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संताप  पाचोरा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा येथील संपूर्ण सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत तसेच भारतीय सिंधी सभा – युवा शाखा (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे जोहर छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाच्या आराध्य देवतेबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य भगवान श्री झुललाल (झुलेलाल) भगवानांविषयी अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप समाज प्रतिनिधींनी केला आहे. हे वक्तव्य समाज माध्यमांवर (Social Media) आणि विविध न्यूज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून, त्यामुळे सिंधी समाजामध्ये तीव्र संताप पसरल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

समाज प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, अमित बघेल यांचे हे वक्तव्य सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे आणि समाजात असंतोष पसरवणारे आहे. धार्मिक श्रद्धांवर थेट प्रहार करून समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न त्यांनी केला आहे.

या संदर्भात पाचोरा येथील सिंधी समाजाने उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन अमित बघेल यांच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना सिंधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवेदनाची प्रत मा. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. विष्णु देव साई (मुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य) आणि मा. अमितजी शाह (गृह मंत्री, भारत सरकार) यांना देखील पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सिंधी समाजाच्या भावनांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच देशातील धार्मिक सलोखा अबाधित राहावा, अशी अपेक्षा सिंधी समाजाने या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

निवेदन देता वेळी अर्जुनदास टाकुरोजा, गोवर्धनदास रिझाणी, गुलाब मिझुमल पंजावणी, लक्ष्मणदास ताराचंद पर्सनाणी, मोटूमल टकणमल नागवाणी, गुलाबचंद गोकुलदास केसवाणी, राम केसवाणी,सनी पंजाबी, आदी समाज बांधव उपस्थित होते

शेवगाव न्यायालयातील वकिलावर हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघाचा तीव्र निषेध.!!!

0

शेवगाव न्यायालयातील वकिलावर हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघाचा तीव्र निषेध.!!!

लाल पट्टी लावून केले कामकाज; ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची मागणी

भडगाव प्रतिनिधी:-

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव न्यायालयात एका प्रकरणाच्या उलट तपासामुळे फिर्यादीने वकिलावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेने न्यायव्यवस्थेतील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा भडगाव येथील वकील संघातर्फे आज (दि. ३ नोव्हेंबर) जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

न्यायालयीन परिसरात सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोटावर लाल पट्टी लावून शांततेत निषेध नोंदवला. दिवसभर वकिलांनी कामकाज सुरू ठेवत असतानाही हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत सरकारकडे तातडीने “ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट” मंजूर करण्याची मागणी केली.

भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील म्हणाले की, “वकिलांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटना अत्यंत गंभीर असून, न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून वकिलांना कायद्याने संरक्षण देणे आवश्यक आहे. शेवगावमधील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि सरकारने त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा, अशी मागणी आम्ही करतो.”

उपाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब अहिरे यांनी सांगितले की, “वकिलांवर हल्ले होणे म्हणजे न्यायप्रक्रियेवरच आघात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

या निषेध आंदोलनात ॲड. भरत ठाकरे (सचिव), ॲड. आर. के. वाणी, ॲड. एम. बी. पाटील, ॲड. पी. बी. तिवारी, ॲड. के. टी. पाटील, ॲड. के. पवार, ॲड. आप्पासाहेब सोनवणे, ॲड. गणेश वेलसे, ॲड. उमेश महाजन, ॲड. रोहित मिसर, ॲड. रवींद्र ब्राह्मणे, ॲड. समाधान सोनवणे, ॲड. सलमान बेग, इरफान बेग तसेच अन्य वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भडगाव न्यायालयीन परिसरात दिवसभर वातावरण शांत राहिले. वकिलांनी लाल फीती लावून कामकाज केल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

वकील संघाच्या माध्यमातून शासनाला लवकरात लवकर वकिलांना कायदेशीर संरक्षण देणारा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करून अंमलात आणावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!