Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog

पाचोरा–भडगाव तालुक्यातील आदिवासी भिल समाजाच्या ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.!!!

0

पाचोरा–भडगाव तालुक्यातील आदिवासी भिल समाजाच्या ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.!!!

पाचोरा  प्रतिनिधी :-

पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या आदिवासी भिल समाजास अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असून, या प्रश्नांकडे प्रशासनाकडून अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची तीव्र भावना समाजबांधवांतून व्यक्त होत आहे. दफनभूमीचा प्रश्न, घरकुलासाठी जागेचा अभाव तसेच जातीचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी या प्रमुख समस्या असून त्याचा थेट परिणाम समाजाच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी भिल समाजाची दफनभूमी अस्तित्वात असली तरी त्याठिकाणी कोणतेही संरक्षण नसल्याने अतिक्रमण, जनावरांचा वावर व वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. काही गावांमध्ये तर आजतागायत दफनभूमीच मंजूर नसल्याने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये दफनभूमी आहे, तेथे ग्रामपंचायत स्तरावरून तार-कंपाउंड किंवा संरक्षण भिंत उभारावी व ज्या गावांमध्ये दफनभूमी नाही, तेथे तातडीने नवीन दफनभूमी मंजूर करून कागदोपत्री नोंद घ्यावी, अशी मागणी होत आहे.

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीतही भिल समाजाला अनेक अडचणी येत आहेत. शबरी आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र असतानाही अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही. अनेक कुटुंबे गावठाण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून घरे सांभाळात आहेत. मात्र अतिक्रमणाचा शिक्का बसल्यामुळे त्याच जागेवर घरकुल बांधण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना नियमित करून घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आदिवासी भिल समाजातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जातीचे दाखले मिळविताना मोठ्या अडचणी येत आहेत. समाजातील बहुतांश नागरिक अशिक्षित असल्याने सनद पुरावा, शाळेचे दाखले किंवा शेतीचे ७/१२ उतारे उपलब्ध नाहीत. परिणामी जातीचा दाखला मिळण्यात विलंब होतो किंवा अर्ज नामंजूर होतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभांवर होत आहे. शासन निर्णयानुसार अशा प्रकरणांमध्ये शिथिलता देऊन ग्रामस्तरावरील पुरावे, वंशावळी व स्थानिक चौकशीच्या आधारे जातीचे दाखले देण्यात यावेत, अशी मागणी समाजाकडून करण्यात येत आहे.

या सर्व समस्या मूलभूत स्वरूपाच्या असून त्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावेत, अन्यथा आदिवासी भिल समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही काही समाजबांधवांनी दिला आहे. आता प्रशासन या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देऊन ठोस कार्यवाही करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचा राजकीय आरसा: २९ शहरांचा विश्लेषणात्मक आढावा

0

महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचा राजकीय आरसा: २९ शहरांचा विश्लेषणात्मक आढावा

गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या अंतिम निकालांचा हा तक्ता केवळ आकड्यांची बेरीज नसून, तो महाराष्ट्राच्या लोकशाही मनोवृत्तीचा सखोल, बहुआयामी आणि वास्तवदर्शी आरसा आहे. प्रत्येक शहरातील निकाल त्या त्या शहराच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तवाचा साक्षीदार ठरतो. मतदारांनी दिलेले कौल हे केवळ पक्षांना नाही, तर त्यांच्या कामगिरीला, धोरणांना, नैतिकतेला आणि भविष्यातील अपेक्षांना दिलेले उत्तर आहे. या निवडणुकांमधील मतदार सहभाग लोकशाहीवरील विश्वास दर्शवतो, तर काही ठिकाणी जाणवणारी उदासीनता लोकशाहीतील ‘मतदान थकवा’, निवडणूक खर्चाविषयीची अस्वस्थता आणि अपेक्षा–वास्तव यांतील दरीही अधोरेखित करते.

या निकालांकडे पाहताना महानगरपालिकांच्या आर्थिक व्यवस्थापनाची गंभीर चौकशी करणे अपरिहार्य ठरते. महसूल स्रोतांची मर्यादा, मालमत्ता कराची अंमलबजावणी, वाढता कर्जभार, प्रकल्प खर्च यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आर्थिक शिस्तीचे आव्हान उभे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवरील मर्यादा आणि राज्य शासनावर वाढते अवलंबित्व यामुळे स्वायत्त स्थानिक प्रशासनाची संकल्पनाच प्रश्नांकित होत असल्याचे दिसते. नगरसेवकांच्या वैयक्तिक जबाबदारी व कार्यक्षमतेचा प्रश्न मतदारांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केला आहे.

मुंबई महानगरपालिकेचा निकाल पाहता बहुरंगी राजकीय वास्तव प्रकर्षाने समोर येते. विविध पक्षांना मिळालेला प्रतिसाद हा मुंबईसारख्या महानगरातील सामाजिक, आर्थिक व वर्गीय वैविध्याचे प्रतिबिंब आहे. उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय परिसर आणि झोपडपट्टी भाग—या सर्व स्तरांतील मतदारांच्या अपेक्षा भिन्न असून त्याचा ठसा निकालांत स्पष्ट दिसतो. विकास, पारदर्शकता, पर्यावरणीय प्रश्न, हवामान बदल, किनारपट्टीचे संरक्षण, वाढता करभार, मूलभूत सुविधांची असमान उपलब्धता, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सार्वजनिक जागांचे संवर्धन, पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची अंमलबजावणी, शहरी नियोजनातील दीर्घकालीन दृष्टी, आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका या मुद्द्यांचा थेट प्रभाव मतदानावर दिसतो. नेतृत्व स्थानिक आहे की आयात—हा प्रश्न मतदारांनी ठामपणे उपस्थित केला आहे.

पुणे, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक व शैक्षणिक केंद्रांमध्ये मतदारांनी तुलनेने स्पष्ट आणि विवेकी भूमिका घेतलेली दिसते. पुण्यातील निकाल सुशिक्षित मतदारवर्गाची चिकित्सक वृत्ती दर्शवतो, जिथे धोरण, नियोजन, ई-गव्हर्नन्स, शिक्षण व्यवस्था, महापालिका शाळांची गुणवत्ता, सार्वजनिक शिक्षणावर खर्चाचा प्राधान्यक्रम आणि सांस्कृतिक ओळख महत्त्वाची ठरली आहे. नागपूरमध्ये सत्तेचा समतोल, प्रशासनातील स्थैर्य, आरक्षणाच्या सामाजिक वास्तवाची जाणीव आणि संविधानिक संस्थांबद्दलचा आदर प्रकर्षाने जाणवतो. पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक कामगार, स्थलांतरित वर्ग आणि मध्यमवर्ग यांचे प्रश्न—रोजगारातील असुरक्षितता, स्थलांतरित कामगारांची स्थिती, प्रदूषण, वाहतूक, कामगार कल्याण—निर्णायक ठरले.

ठाणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांचे निकाल झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा आणि नागरी सेवांवरील ताणाचा आरसा ठरतात. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षितता, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि गृहनिर्माण यांतील तफावत मतदारांच्या निर्णयात स्पष्ट दिसते. ‘शहरातील शहर’ अशी निर्माण झालेली आर्थिक व सामाजिक विषमता, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सोयींचा अभाव, नगरसेवकांच्या वैयक्तिक जबाबदारीचा प्रश्न आणि मतदारांच्या अपेक्षा व प्रत्यक्ष कारभार यांतील दरी कमी करण्याची गरज येथे अधोरेखित होते.

छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि अमरावतीसारख्या शहरांतील निकाल प्रादेशिक अस्मिता, सामाजिक समतोल आणि स्थानिक नेतृत्वाच्या स्वीकाराचे प्रतीक आहेत. बेरोजगारी, उद्योग, पाणीटंचाई, शहरी गरीब, पुनर्वसन, सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता, सुरक्षिततेची भावना आणि निवडणूक वचननामे प्रत्यक्षात उतरतील की नाही याविषयीची शंका येथे निर्णायक ठरली आहे. सार्वजनिक शिक्षण व आरोग्यावर खर्चाच्या प्राधान्यक्रमाचा अभाव मतदारांच्या अस्वस्थतेतून व्यक्त होताना दिसतो.

नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारसारख्या वेगाने वाढणाऱ्या महानगरांमध्ये तरुण मतदार, डिजिटल-जाणिवा आणि स्थलांतरित लोकसंख्या निर्णायक ठरलेली आहे. स्मार्ट सिटी संकल्पना, ऑनलाईन सेवा, तक्रार निवारण प्रणाली, पुनर्वसन, पर्यावरणीय समतोल, पाणीप्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक वाहतूक आणि दीर्घकालीन शहरी नियोजन या मुद्द्यांवर मतदारांनी ठोस भूमिका घेतली आहे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर असूनही मानवी संवेदनशीलतेचा अभाव आणि प्रत्यक्ष समस्यांवरील तात्काळ उपाय यांचा अभाव जाणवतो.

लातूर, नांदेड, अकोला, मालेगाव, चंद्रपूर आणि परभणीसारख्या अंतर्गत शहरांतील निकाल ग्रामीण-शहरी संक्रमणाची वास्तववादी कथा सांगतात. शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, आर्थिक विषमता, महानगरपालिकांच्या आर्थिक स्वायत्ततेचा प्रश्न, महानगरपालिकांच्या आर्थिक व्यवस्थापनातील मर्यादा आणि केंद्र–राज्य अनुदानांवरील अवलंबित्व येथे केंद्रस्थानी आहे. शहरी गरिबी, बेघरपणा आणि स्थलांतरित कामगारांचे प्रश्न मतदारांनी ठामपणे अधोरेखित केले आहेत.

या २९ महानगरपालिकांच्या निकालांतून अपक्ष व छोट्या पक्षांची वाढती भूमिका, आघाडी-युती राजकारणाबाबतची मतदारांची परिपक्व समज, महिला प्रतिनिधित्वात झालेली वाढ आणि नागरिक सहभागाचे नवे प्रकार—नागरिक सभा, सामाजिक लेखापरीक्षण, ऑनलाईन सहभाग—यांचे महत्त्व स्पष्ट होते. तसेच महापालिका कर्मचारी, सफाई कामगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता वाढताना दिसते.

अखेर, हा तक्ता महाराष्ट्राच्या शहरी लोकशाहीचा जिवंत, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक दस्तऐवज आहे. तो सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा आहे, विरोधकांसाठी संधी आहे आणि नागरिकांसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आरसा आहे. महापौर, स्थायी समित्या आणि संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाकडून आता मतदार केवळ आश्वासने नव्हे, तर आश्वासनांची मोजमापयोग्य अंमलबजावणी, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, पर्यावरणपूरक आणि परिणामकारक कारभार अपेक्षित ठेवत आहेत. लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी सत्तेइतकीच नागरिकांवरही आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी हे निकाल महत्त्वाचे संकेत देतात. लोकशाही ही मतदानापुरती मर्यादित नसून, सातत्यपूर्ण, सजग, प्रश्न विचारणाऱ्या आणि जबाबदार नागरिक सहभागातूनच ती अधिक सशक्त होत जाते—आणि या महानगरपालिका निकालांनी हेच ठामपणे अधोरेखित केले आहे.

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी.!!!

0

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तसेच सांगली जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान स्नेह मेळावा अंतर्गत श्री लक्ष्मणरावजी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्युनियर कॉलेज, मग्रेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेत भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत पदकांची लक्षणीय कमाई केली. विविध वजनगटांमध्ये खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढला आहे.

भडगाव येथील तनवीर रझाक मण्यार (१९ वर्षांखालील, ४४ ते ४८ किलो) यांनी दमदार खेळ करत रौप्य पदक पटकावले. ते श्री साई समर्थ कला व ज्युनियर कॉलेज, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

त्याचप्रमाणे प्रतीक सतीश दाभाडे (१९ वर्षांखालील, +७५ किलो) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक मिळवले. ते सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

जुनेद खान शाकीर खान (१४ वर्षांखालील, ३६ ते ४० किलो) यांनी संघर्षपूर्ण लढतीत कास्य पदक पटकावले. ते वाय. एम. खान उर्दू स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

आर्यन जुलाल सोनवणे (१४ वर्षांखालील, ४० ते ४४ किलो) यांनी आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर रौप्य पदक जिंकले. ते न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

चाळीसगाव येथील फैजान अकरम शेख (१९ वर्षांखालील, ६० ते ६५ किलो) यांनी कास्य पदक पटकावत चाळीसगावचा नावलौकिक वाढवला. तसेच ओम गौतम भोयर (१७ वर्षांखालील, ५२ ते ५६ किलो) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. हे दोन्ही खेळाडू के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव येथील विद्यार्थी आहेत. याशिवाय आर्यन निलेश ब्राह्मणकर यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत अनुभव मिळवला.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अबरार खान (सहसचिव, थाय बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्राचे कोच शाहरुख नजीर मण्यार यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. स्पर्धेतील पंचगणनेत आयन खान, चाळीसगाव यांनी जबाबदारी पार पाडत योगदान दिले.

या यशाबद्दल जळगाव जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, उपाध्यक्ष शाम पाटील तसेच पदाधिकारी डॉ. वसीम मिर्झा, सौरभ पाटील, संतोष पाटील, सौरभ देशमुख, अजगर खान, हाजी खलील शेख यांनी खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश आगामी काळात अधिक खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असून परिसरातील क्रीडा चळवळीला नवी दिशा देणारे ठरले आहे.

पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!!

0

पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहर व तालुक्यातील महिलांसाठी व कुटुंबीयांसाठी विश्वासाचे केंद्र ठरलेले अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह आता नव्या, सुसज्ज व अत्याधुनिक वास्तूत स्थलांतरित होत असून, सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौक परिसरात उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, वातानुकूलित ऑपरेशन थिएटर व २४ तास सेवा यांमुळे हे हॉस्पिटल पाचोरा तालुका व परिसरातील आरोग्यसेवेसाठी नवे पर्व ठरणार आहे.

अंकुर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी, सुलभ व वेदनारहित प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा, दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) शस्त्रक्रिया, गर्भाशय विकारांचे निदान व उपचार, पाळीविषयक विकार, स्त्रीरोग तपासणी व उपचार, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया व साधने तसेच लैंगिक समस्यांचे निदान व निवारण अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच मूलबाळ न होण्याच्या (वंध्यत्व) समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचाराची सुविधाही देण्यात येणार आहे.

नव्या इमारतीत अत्याधुनिक व वातानुकूलित ऑपरेशन थिएटर, स्पेशल वातानुकूलित रूम्स, डिलक्स रूम्स, २४ तास लिफ्ट व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांच्या सोयीसाठी २४ तास कार्यरत फार्मसी व पॅथॉलॉजी लॅबही उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांची सुरक्षितता, स्वच्छता व तत्काळ उपचार यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हॉस्पिटलचे उद्घाटन आण्णासाहेब डॉ. के. बी. पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील भूषविणार आहेत. ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन मा. अमोलदादा विमणराव पाटील यांच्या हस्ते, डॉक्टर केबिनचे उद्घाटन श्री. संतोष देवचंद पाटील व सौ. शालिनीबाई संतोष पाटील यांच्या हस्ते, तर प्रशासन केबिनचे उद्घाटन सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या भव्य प्रकल्पासाठी पाचोरा-भडगाव डॉक्टर असोसिएशन, रोटरी क्लब पाचोरा, केमिस्ट व पॅरामेडिकल असोसिएशन, पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच आर्किटेक्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व इंटेरियर तज्ज्ञांसह सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

नव्या वास्तूत स्थलांतरानिमित्त तिर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. किशोर संतोष पाटील व सौ. प्रियंका किशोर पाटील यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यातील महिलांच्या आरोग्यसेवेसाठी ‘अंकुर हॉस्पिटल’चा हा नवा टप्पा निश्चितच मोलाचा ठरणार आहे.

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा भव्य सत्कार

0

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा भव्य सत्कार

आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; आमदार किशोर (अप्पासाहेब) पाटील यांचे लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्र व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताईसो. सौ. सुनीताताई पाटील व उपनगराध्यक्ष मा. किशोर बारावकर यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकासाचे कार्यसम्राट मा. किशोर (अप्पासाहेब) पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी टाळ्यांच्या गजरात नव्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

डॉक्टर्स असोसिएशनची लक्षणीय उपस्थिती

या सत्कार समारंभास पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये

डॉ. जीवन पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. भरत पाटील, डॉ. झाकीर देशमुख, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. विजय जाधव, डॉ. अतुल पाटील, डॉ. चंद्रकांत विसपुते, डॉ. राहुल पटवारी, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. मुकेश तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. बालकृष्ण पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. चेतन राजपूत, डॉ. किरण राजपूत, डॉ. प्रशांत शेळके, डॉ. दीपक चौधरी, डॉ. व्येंकटेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या विविध प्रलंबित मागण्या व शहरातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर आमदार किशोर (अप्पासाहेब) पाटील यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील आरोग्य सुविधा, वैद्यकीय व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते व आपत्कालीन आरोग्य सेवा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी डॉक्टरांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत, संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिले. पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असून प्रशासन व वैद्यकीय क्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताईसो. सौ. सुनीताताई पाटील व उपनगराध्यक्ष मा. किशोर बारावकर यांनी सत्काराला उत्तर देताना पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधा या विषयांना प्राधान्य दिले जाईल, तसेच डॉक्टरांच्या सहकार्याने पाचोरा शहर अधिक सक्षम व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण व उत्साही वातावरणात पार पडला. शहरातील विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व डॉक्टर यांचा समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मोडी लिपी मोफत प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात प्रारंभ

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण शिबिर एकूण १० रविवार चालणार असून दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील मोडी लिपीप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच नवशिक्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे वर्ग डॉक्टर गायकवाड‘स इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासोबतच वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. या वर्गांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन वनिता साळुंखे या करत असून त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरत आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभप्रसंगी प्रवीण जाधव (शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष) आणि रुपेश पवार (मोडी लिपी आणि इतिहास अभ्यासक) यांची उपस्थिती लाभली. मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नाते जोडण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोडी लिपीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कजगाव येथील अल्पसंख्यांक मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.!!!

0

भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी

कजगाव येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची संरक्षण भिंत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः कोसळलेल्या अवस्थेत असून, याकडे स्थानिक ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे कब्रस्तानाच्या पवित्रतेसह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

सदर कब्रस्तानालगत असलेला रस्ता हा वर्दळीचा असून, रस्त्याच्या कडेला फेअर ब्लॉक बसविण्याची मागणी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कब्रस्तान परिसरात अतिक्रमण, जनावरांचा वावर तसेच अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे अल्पसंख्यांक मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण व विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामनिधीतून आवश्यक कामे करता येणे शक्य असतानाही, त्या निधीचा उपयोग न केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामस्थांच्या मते, निधी उपलब्ध असताना देखील केवळ दुर्लक्ष आणि उदासीनतेमुळे कामे रखडली आहेत.

स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील इतरही अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र होत असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीची उभारणी करावी तसेच कब्रस्तानालगतच्या रस्त्यावर फेअर ब्लॉक बसवून परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी कजगाव येथील नागरिक व अल्पसंख्यांक समाजाकडून करण्यात येत आहे.

पाचोरा नगरपरिषदेत शिक्षण सभापतीपदी  प्रवीण  ब्राह्मणे यांची निवड

0

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची पाचोरा नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा व चालना मिळेल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली. शिक्षण क्षेत्राबाबतची त्यांची सकारात्मक भूमिका, विद्यार्थीकेंद्रित विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांनी सांगितले की, शहरातील शाळांच्या मूलभूत सुविधा सक्षम करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, तसेच शिक्षक, पालक व प्रशासन यांच्यात समन्वय साधून निर्णय घेणे यावर विशेष भर दिला जाईल. गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, शाळांमधील समस्या मार्गी लावणे आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल पाचोरा शहरातील नागरिक, सहकारी नगरसेवक, शिक्षकवर्ग तसेच समर्थकांकडून आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यकाळात पाचोरा शहरातील शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सर्वत्र त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

गोंडगाव विदयालयात सांस्कृतिक कार्यक्रम रंगतरंग संपन्न.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय गोंडगाव येथे सालाबादप्रमाणे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम रंगतरंग उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी. ननावरे यांचेसह मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडगाव गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील हे होते. पालक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन माजी विदयार्थी विजय सोनार, माजी विदयार्थी दिनकर झावरु पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.जी. ननावरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख एस. डी. चौधरी व व्ही. ए. पाटील यांनी केले.

यावेळी विदयार्थ्यांनी संगीताच्या तालावर हिंदी व मराठी, अहिराणी, लोकगीत, लावणी, भारुड, पारंपारीक नृत्य , एक पाञी नाटक सादर केले. विदयार्थ्यांनी अतिशय चांगली कला सादर केल्याने

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. व्ही. सोळंके व उपप्रमुख व्ही. ए. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य, पालक ,आजी माजी विद्यार्थी तसेच महिला वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.

 

विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस. आमले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, नागरीक, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते

पिंप्री विदयालयाचा चिञकलेचा निकाल १०० टक्के.

0

भडगाव प्रतिनिधी :-

टेक्निकल माध्यमिक विद्यालय पिंप्री बु. ता. पाचोरा शाळेचा महाराष्ट शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंट्री ग्रेड ड्रॉईंग परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एलिमेंट्री परीक्षेत एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैक

किर्ती राजेंद्र पाटील

निकिता उमेश पाटील

अक्षरा दिपक पाटील

कावेरी रविंद्र पाटील

वैष्णवी सुनिल अहिरे

योगिता विनोद धोबी

सुषमा कमलाकर धोबी

पायल शशिकांत पाटील

मयुर माया मोरे

उध्दव प्रविण पाटील

जयदीप विश्वासराव बोरसे

आकाराही विद्यार्थी परीक्षेत पात्रता आहे…

त्यांना मार्गदर्शन करणारे

कलाशिक्षक श्री. जितेंद्र रायचंद परदेशी, श्री. संदिप शालिग्राम पाटील, यांचे व संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री भारत सरकार आण्णासो. एम. के. पाटील साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दादाजी पाटील, तसेच सौ. जयश्री तुकाराम हिरे, श्री. निलेश एकनाथ चव्हाण, श्री. रोहिदास मन्साराम पाटील, सौ. चेतना अशोक सोनवणे, सौ. कविता भिकनराव पाटील, श्री. शिवराज भोजराज पाटील सर्व शिक्षक – शिक्षिका व श्री. प्रताप जनार्दन पाटील, श्री. संजय जगन्नाथ पाटील, श्री. उल्हास रमेश आमले, श्री. सुदाम गोकुळ सोनवणे, श्री. अविनाश पुंडलिक पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!