महाराष्ट्रविशेषशासकीय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, औपचारिक आणि सन्मानपूर्ण वातावरणात पार पडला.

या वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील–भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे तसेच विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शपथविधीनंतर उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आयोगाच्या कार्यक्षमतेत अधिक पारदर्शकता, गती आणि गुणवत्तावृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शपथ स्वीकारल्यानंतर विवेक भीमनवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेचा उच्च दर्जा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रशासनातील सुधारणांना चालना देण्यावर भर देत स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या शपथविधी सोहळ्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासनिक वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. राज्याच्या स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, आमंत्रित मान्यवर तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!