
जनतेचा कौल स्पष्ट : किशोर आप्पा पाटील यांना पालकमंत्रीपदासाठी ६९ टक्के पसंती
जिल्हाभरात अचूक माहिती मांडणाऱ्या आणि विश्वासार्हतेसाठी ओळख असलेल्या एका सोशल मीडिया सर्वेक्षणातून महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार किशोर आप्पा पाटील यांना पालकमंत्रीपदासाठी तब्बल ६९ टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. हा आकडा केवळ मतांचा नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचा आणि अपेक्षांचा स्पष्ट कौल मानला जात आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनमताला अनन्यसाधारण महत्त्व असते. विकासकामांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकांशी थेट संवाद यामुळे किशोर आप्पा पाटील यांनी अल्पावधीतच जनतेमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच या सर्वेक्षणाकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता, भविष्यातील नेतृत्वाबाबत जनतेचा कल म्हणून पाहिले जात आहे.
पाचोरा–भडगाव भागात राबविण्यात आलेल्या विकास मॉडेलची चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. कामाला न्याय, निर्णय प्रक्रियेत वेग आणि अंमलबजावणीत गुणवत्ता या त्रिसूत्रीवर आधारित हे मॉडेल प्रशासन व लोकप्रतिनिधींसाठी दिशादर्शक ठरत आहे. या कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य मिळाले असून विकास कामांना ठोस गती मिळाल्याचे चित्र दिसून येते.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची शैली, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि परिणामकारक निर्णयक्षमता ही या नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळेच किशोर आप्पा पाटील यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यास जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाचे स्वागत विरोधकांनाही करावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच, या सर्वेक्षणातून जिल्ह्याच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत जनतेची भूमिका स्पष्ट होत असून “किशोर आप्पा पॅटर्न” ही कार्यपद्धती जिल्हा विकासासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
— पदम बापू पाटील
मा. जिल्हा परिषद सदस्य, जळगाव



