महाराष्ट्रसामाजिक

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीच्या श्री शिवछत्रपती जन्मोत्सवानिमित्त शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माझगाव म्हाडा वसाहतीमधील ४–ड, इंद्रप्रस्थ सोसायटीसमोर पार पडला. या व्याख्यानमालेचे आयोजन देवेंद्र वनिता सचिन सोमणवर (साळुंखे) यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्राने करण्यात आली.

या कार्यक्रमात कौशिक पाटील यांनी प्रमुख वक्ते म्हणून प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सुधारक कार्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांमध्ये इतिहासाबाबत जागरूकता निर्माण झाली. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसुधारणेचा दृष्टिकोन त्यांनी ठळकपणे अधोरेखित केला.

या व्याख्यानमालेचे सूत्रसंचलन प्रवीण विठ्ठल जाधव, अध्यक्ष, श्री शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान, मुंबई यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. सोसायटीचे सेक्रेटरी प्रीतम बागवे, सदस्य संपत शेलार, प्रशांत वऱ्हाडी, सुहास परब, दीपक केसरकर, रवी माने आणि वनिता मांगले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहकार्य केले. सोसायटी सदस्यांनी आवश्यक साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शिवप्रेमी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारधारेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या व्याख्यानमालेमुळे शिवजयंती उत्सवाला वैचारिक अधिष्ठान लाभले असून, समाजप्रबोधनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!