जळगावराजकीय

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते धनराज पाटील यांनी वडजी गणातुन भाजपकडून उमेदवारची मागणी.

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते धनराज पाटील यांनी वडजी गणातुन भाजपकडून उमेदवारची मागणी.

भडगाव: प्रतिनिधी :-

येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती रणधुमाळी सुरू झाली आहे त्यातच भडगाव तालुक्यातील वडजी पंचायत समिती साठी वडजी गणातील पिचर्डे येथील भाजपचे एकनिष्ठ असलेले धनराज पाटील यांनी भाजप पक्षाकडे वडजी गणातुन उमेदवारी ची मागणी केली आहे.तसे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटुन ही मागणी केली.

पिचर्डे येथील धनराज पाटील हे एक अभ्यासू पत्रकार म्हणून सर्व तालुक्यांत ओळख आहे तसेच त्यांनी 2010 पासुन विघार्थी दशेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटनेचे चार वर्षे काम केले.त्यांनतर त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करुन राजकारणाची सुरुवात केली त्यांनी पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून सुरुवात केली त्यांनतर युवा मोर्चा चे शाखा अध्यक्ष,बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,गण प्रमुख,गटप्रमुख,युवा मोर्चा चे काम केले आहे त्यानंतर दोन तीन टर्म ला लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी मेहनत घेऊन काम केले ते पण एकनिष्ठ ने काम केले आहे तसेच तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असताना निसर्ग मित्र समितीचे भडगाव तालुका अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे.तसेच वडजी गणात नातेवाईक व मित्र परिवार आहे उच्चशिक्षक,अभ्यासु व्यक्तीमत्व,साधा सरळ स्वभाव असलेले युवक म्हणून वडजी गणात व भडगाव तालुक्यात त्यांच्या कडे पाहिले जाते.या सर्व कार्याची दखल घेऊन एका सर्वसामान्य कार्यकर्ताला भाजप पक्षाने उमेदवारी देऊन सम्मान करावा तसेच पक्षाने वेळोवेळी शब्द दिला व अनेक निवडणुकीत पक्षासाठी थांबायला लावले कारण धनराज पाटील यांनी पक्षाचे व नेत्यांचा आदेश मान्य करत थांबले होते परंतु यावेळी त्यांनी कोणतेही परिस्थिती निवडणूक लढवणार आहेत तसेच त्यांच म्हणून शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे तसेच भाजपचे संकटंमोचक नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, तसेच भाजपचे जिल्हाचे नेतृत्व आमदार मंगेश दादा चव्हाण,माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,भाजपचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे व वैशालीताई सुर्यवंशी व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांचा आदेश मला मान्य राहील…

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!