अपघातजळगाव

रक्षाबंधनाच्या दिवस ठरला काळा दिवस ; ४ अपघात,१२ जखमी.!!!

रक्षाबंधनाच्या दिवस ठरला काळा दिवस ; ४ अपघात,१२ जखमी

(पारोळा तालुक्यातील घटना)

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – तालुक्यातील म्हसवे,कामतवाडी,सार्वे व कजगाव रोडावर असे चार वेगवेगळ्या झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाल्याची घटना आज रक्षाबंधन दिनी घडली आहे.

आज शनिवारी दुपारी एकच्या सुमारास म्हसवे फाट्याजवळ दोन मोटरसायकलींच्या धडकेत

अश्विनी राजेंद्र पाटील (२२), शिव सुनिल तनेजा (१८), गौरव गोविंदा गादरी (१८), प्रभाकर रूपलाल पाटील (६०) प्रणित मनोज पवार (४५),प्रतीक अशोक बडगुजर (३०) सर्व राहणार पारोळा हे जखमी झालेत.तसेच कामतवाडी फाट्याजवळ मोटरसायकल घसरून त्यात सुंदर लालजी चपके (५०), दत्तू दगडू बिरार (८८) राहणार चांदवड तर सरदार सेगल बारेला (४०,एम पी) हे जखमी झालेत.तसेच दुपारी पाचच्या सुमारास सार्वे गावाजवळ मोटरसायलीचा समोर कुत्रा आडवा आल्याने त्यात रामकृष्ण ईश्वर पाटील (३०) व जगदीश सिताराम पाटील (३०) राहणार फुलपाट ता.धरणगाव हे जखमी झालेत.जखमींना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी उपचारार्थ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.तर कजगाव रोडवरील आकाश मॉल जवळ दुपारी चारच्या सुमारास मोटरसायकलींच्या धडकेत

सुफियान शेख सिकंदर (२५) रा.पारोळा हा जखमी झाला. याला रुग्णवाहिका चालक प्रसाद राजहंस याने कुटीर रुग्णालयात दाखल केले.डॉ. गणेश कोळी,पंकज ब्रदर, परिचारिका दामिनी,मंगला त्रिवेणी,सोनाली गुरव यांनी जखमींवर प्रथमोपचार केला. जखमींपैकी एक धुळे येथे तर काही शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!