जळगावशैक्षणिकसामाजिक

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे राखी बनवा कार्यशाळा व रक्षाबंधन संपन्न.!!!

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे राखी बनवा कार्यशाळा व रक्षाबंधन संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बनवा कार्यशाळा संपन्न झाली. बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजलेली असताना स्वतः राखी बनवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. राखी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोरा, रंगीत मनी, रंगीत कार्डशिट, रंगीबेरंगी टिकल्या, कैची,फेविकॉल इत्यादी साहित्य वापरले. विद्यार्थ्यांनी स्वतःची सर्जनशीलता वापरून नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या.

अत्यंत सुरेख आकर्षक अशा राख्या विद्यार्थ्यांनी बनवल्या. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांच्या साह्याने रक्षाबंधन सण शाळेत साजरा केला गेला. रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावुन सांगितले.श्रीमती अनिता सैंदाने व श्री अनंत हिरे यांनी विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार,सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील, सचिन पाटील,हरिचंद्र पाटील, किरण पाटील व शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!