जळगावसामाजिक

माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प.!!!

माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २०२५ या वर्षी ५०१ वृक्ष लागवड संगोपन अभियानाचा प्रारंभ उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका नगरसेविका योजना पाटील,

मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, साई समर्थ मतीमंद शाळा अधीक्षकांसह सहकारी वृंद यांचे प्रमुख उपस्थितीत साई समर्थ मतीमंद शाळा नाचणखेडा रोड येथून करण्यात आला. सजीव सृष्टी वाचवायची असेल तर निसर्ग पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. मान्यवरांनी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व मोफत रोगनिदान शिबिरांसह प्रबोधनात्मक उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मनोगतातून व्यक्त केले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!