ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलवलं, नववधू म्हणाली,ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू पाठवलंय.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home जळगाव

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलवलं, नववधू म्हणाली,ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू पाठवलंय.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
May 8, 2025
in जळगाव, राष्ट्रीय, विशेष
0 0
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलवलं, नववधू म्हणाली,ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू पाठवलंय.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलवलं, नववधू म्हणाली,ऑपरेशन सिंदूरसाठी कुंकू पाठवलंय.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते.लग्नानंतर फिरायला जाणे आणि आनंदाने जीवन जगणे सगळ्यांनाच हवे असते. पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत वेगळे घडले.

५ मे रोजी त्यांचे लग्न झाले आणि अवघ्या तीन दिवसांत, ८ मे रोजी त्यांना तातडीने देशसेवेसाठी हजर राहण्याचा आदेश आला. कोणताही विचार न करता, मनोज पाटील आपल्या अंगावरची हळद आणि हातावरची मेहंदी तशीच ठेवून आज (८ मे) कर्तव्यासाठी रवाना झाले.

देशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावण्यात आले आहे. जवानांनीही आपल्या वैयक्तिक स्वप्नांपेक्षा देशाच्या कर्तव्याला अधिक महत्त्व देत ८ मे रोजी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाची सुंदर स्वप्ने, पत्नीसोबत फिरण्याचे बेत आणि भविष्याच्या योजना बाजूला सारून, ५ मे रोजी विवाहबंधनात अडकलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदीचे) हे आपल्या अंगावर हळदीचा रंग असतानाच देशासाठी सीमेवर निघाले आहेत.

नाशणखेडे (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची मुलगी यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज याचे लग्न ठरले होते. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे विवाह सोहळा नुकताच पार पडला आणि लगेचच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचा आदेश आला.

कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा करत असतानाच देशसेवेसाठी जाण्याचा मनोज यांना अभिमान आहे. ‘देशापेक्षा मोठे काहीही नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मनोज यांची पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे, घरी परतलेल्या जवानांना पुन्हा आपल्या कर्तव्यावर जावे लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेले मनोजदेखील हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळद अशा स्थितीत आज देशासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!