अपघातजळगाव

हिवरखेडे येथे विहिरीचा पाण्यात बुडून तरुणाच्या मृत्यू.!!!

हिवरखेडे येथे विहिरीचा पाण्यात बुडून तरुणाच्या मृत्यू.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – धुलीवंदन सण साजरा

करण्यासाठी गावी आलेल्या बावीस वर्षीय तरुणाच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना

शुक्रवारी घडली.निलेश विठ्ठल पवार (वय २२,रा हिवरखेडा तांडा ता.पारोळा ह.मु.सुरत) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तालुक्यातील हिवरखेडे तांडा येथे होळी धुलिवंदनानिमित्त

समाजाचा सांस्कृतिक धुंड कार्यक्रम साजरा होत असतो. निलेश हा गावी सण साजरा करण्यासाठी आला होता. धुलिवंदन साजरा करून सकाळी साडेदहाच्या सुमारास निलेश व त्याचे मित्र हे गावातील विहिरीवर अंघोळ करण्यासाठी गेले असता तेथे आंघोळ करतांना त्याचा पाय घसरुन विहिरीत तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला.विहिरीत शोध घेऊन त्यास बाहेर काढून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत विजू सरीचंद पवार यांनी पारोळा पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!