जळगावविशेष

भडगाव तालुक्यात कोठली येथील जवान शहिद.!!!

भडगाव तालुक्यात कोठली येथील जवान शहिद.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी :-

तालुक्यातील कोठली येथील भुमिपुत्र प्रवीण अभिमन्यू पाटील ( वय ३० ) वर्ष सीआर पीएफ १३७ बटालीयनचा जवानाचा उधमपूर येथे देशसेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता हाती आली आहे.

ते बटालियन उधमपुर येथे कार्यरत असताना गोळी लागलेल्या परिस्थितीत त्यांना विरमरण आले आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते.त्यांचा स्वभाव अतिशय सोज्वळ होता. गेल्या आठवड्यात कोठली येथे आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन नातेवाईक व मित्र परिवार यांना भेटुन ते कर्तव्यावर परतले होते. त्यातच अशी अचानक दुःखद वार्ता गावावर ऐकु आल्याने सर्वत्र शोकाकळा पसरलेली आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव गावावर आण्यासाठी गावातील नातेवाईक रवाना झाले आहेत.माञ पुढील माहीती पोलीस प्रशासनाकडे केली असता पोलीस पाटील अतुल पाटील यांनी यि घटनेची माहीती पोलीस स्टेशनला कळविलेली आहे. माञ घटनेची अधिकृत माहिती प्रशासनाकडुन कळु शकली नाही.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!