जळगावमहाराष्ट्रविशेष

भडगाव शहरात शासनाच्या जागेवरच शासनाचा आतिक्रमण; नगर परिषदेच्या विकास कामांना अडथळे.?

भडगाव शहरात शासनाच्या जागेवरच शासनाचा आतिक्रमण; नगर परिषदेच्या विकास कामांना अडथळे.?

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरात सन 2009 मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली, परंतु पंधरा वर्षांनंतरही अपेक्षित विकास घडून आलेला नाही. शहरातील विकासकामांना वेळोवेळी अडथळे येत असून, यामागचे प्रमुख कारण म्हणजे अनेक शासकीय जागा अद्यापही विविध खात्यांच्या ताब्यात असल्यामुळे नगर परिषदेची अंमलबजावणी प्रक्रिया खोळंबली आहे.

शहरातील अनेक महत्त्वाच्या जागा जिल्हा परिषद, पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीत असून, त्यावर नगर परिषदेच्या आवश्यक योजनांसाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन केंद्रे, भाजी पाला मार्केट,यांसारखी मूलभूत कामे रखडली आहेत.

विशेष म्हणजे, या काही जागांवर अनधिकृत आतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे विकास आराखडे धुळीला मिळण्याची वेळ आली आहे. परिणामी नागरिकांच्या गरजा अपूर्ण राहतात, आणि जनतेत नाराजी वाढत आहे.

या समस्येच्या निवारणासाठी पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असले तरीही अद्याप प्रश्न सुटलेला नाही. नागरिकांतूनही जोरदार मागणी आहे की, संबंधित शासकीय विभागांनी आपापल्या मालकीच्या जागांची स्पष्टता करून नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या जागा तात्काळ नगर परिषदेच्या ताब्यात द्याव्यात.

भविष्यातील शहर विकास आराखड्याच्या दृष्टीने ही समस्या तातडीने सोडवणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा भडगाव शहर विकासाच्या शर्यतीत मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!