राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय कोणते पाहा.?
मुंबई :-
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज (मंगळवार) संपन्न झाली. आजच्या बैठकीत 6 मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या एनटीएफ फोर्समध्ये 346 पदांसाठी लवकरच जाहीरात निघू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
1) कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594.09 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.
या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1,08,197 हेक्टर क्षेत्राला लाभ
(जलसंपदा विभाग)
2) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी, यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार
(गृह विभाग)
3) सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता
(वित्त विभाग)
4) राज्यातील रोपवेची कामे राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) मार्फत आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
5) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला 1275.78 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8290 हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार
(जलसंपदा विभाग)
6) मौजे एरंडवणा, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जागा नाममात्र 1 रुपयात शासकीय जमीन
(महसूल व वन विभाग)