जळगावशैक्षणिक

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न.!!!

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी अध्यक्ष , सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्री. संजयजी बिर्ला हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत जागोजागी विनोद प्रचुर भाषेत विद्यार्थ्यांना हसवत आणि त्यासोबतच इयत्ता १० वी नंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या कोणत्या वाटा निवडाव्यात आणि कुठले कोर्स निवडावेत या संदर्भातही सखोल आणि सोप्या भाषेत त्यांनी सर्वांगीण विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना त्याच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यासोबतच शाळेतील शिक्षिका सौ. स्मिता देशमुख मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहावा या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले . इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यां पैकी कु. कृतीका पाटील, कु. साक्षी पांडे, कु. टिकलं महाले, कु.वेदिका शिरुडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री. गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री. जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार श्री.जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री. लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री. रितेशजी ललवाणी, संचालक श्री संजयजी चोरडीया, श्री. गुलाबजी राठोड श्री.प्रभुलालजी शर्मा, श्री.गोपालजी पटवारी, सौ.प्रितीजी जैन. श्री.महेंद्रकुमारजी हिरण, श्री.अशोककुमारजी मोर, श्री.शेखरकुमारजी धाडीवाल हे मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पलता पाटील व सीईओ श्री.अतुल चित्ते सर, शिक्षक वृंद सौ.निर्मला पाटील, सौ.प्रतिभा मोरे, सौ.रुपाली जाधव, सौ. प्रिती शर्मा, सौ.शितल तिवारी, दिपिका रणदिवे, सौ.योगिता शेंडे, सौ.पुजा पाटील, सौ.ज्योती बडगुजर, सौ.कविता जोशी, सौ.रूपाली देवरे, सौ.भाग्यश्री ब्राम्हणकर,सौ.विद्या थेपडे, सौ. पिंकी जैन, सौ. राधा शर्मा, सौ.शितल महाजन, सौ.स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र,किशोरी साळुंखे, श्री.वाल्मिक शिंदे, श्री.किरण बोरसे, श्रीमती.संगिता पाटकरी, सौ.पुजा अहिरे, सौ.पुनम कुमावत,सौ शालिनी महाजन, सौ.कल्पना बोरसे, श्री.निवृत्ती तांदळे, श्री.संजय सोनजे, श्री. संदिप परदेशी,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, सौ.अलका बडगुजर, सौ.अश्विनी पाटील, सौ.सुनिता शिंपी, सौ.मनिषा पाटील, श्री शिवाजी पाटील, श्री. विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण बोरसे सर व वर्ग ९ वी तील विद्यार्थिनी कु. जान्हवी देवरे व कु. श्रेया चौधरी यांनी उत्कृष्टरित्या केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.शालिनी महाजन यांनी केले. व संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!