ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
January 14, 2025
in राष्ट्रीय, विशेष
0 0
अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपये देणार नितीन गडकरींची घोषणा.!!!

 

नागपूर प्रतिनिधी :-

 

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे.

नेमकं काय म्हणाले गडकरी.?

नितीन गडकरींनी या नव्या धोरणाबद्दल बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे. यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, “केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे,” अशी माहिती दिली.

लागू केलं नवं धोरण….

अपघाग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2021 पासून रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे. भीषण अपघातामधील जखमींना तातडीची मदत करुन त्यांचे प्राण वाचवणाऱ्यांना, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत बक्षीस स्वरुपात ठराविक निधी दिला जाणार असं निश्चित करण्यात आलेलं. तेव्हा ही रक्कम 5 हजार रुपये इतकी होती. ज्यामध्ये आता वाढ करुन ती 25 हजार इतकी करण्यात आली आहे.

कोण असतो ‘गुड स्मार्टीयन.?

केंद्र सरकारच्या या मदतनीसांना आर्थिक स्वरुपाची शब्बासकीची थाप देण्याच्या योजनेला ‘गुड स्मार्टीयन’ असं नाव देण्यात आलं आहे. “चांगल्या विचाराने आणि कोणत्याही मोबदल्याचा अथवा बक्षिसाचा विचार न करता, कोणतंही खास नातं नसताना स्वयंप्रेरणेनं पुढाकार घेत अपघातात जमखी झालेल्यांना मदत करतो,” अशी ‘गुड स्मार्टीयन’ची व्याख्या करण्यात आली आहे.

चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या

दरम्यान, सोनमर्गमधील झेड-मोर्च बोगद्याच्या कामाच्या भूमीपुजन सोहळ्यानंतर नितीन गडकरींनी, “आपल्या देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करायला हवी. पाणी, ऊर्जा, परिवहन आणि संवाद या गोष्टींशिवाय विकास, उद्योग, पर्यटन आणि व्यापार वाढवता येणार नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी आमच्याकडे जम्मू-काश्मीरला अधिक सधन, श्रीमंत आणि विकसित करण्यासाठी हा प्रकल्प सोपावला आहे. उद्योजक आणि व्यवसायिकांनी जम्मू-काश्मीरला अधिक आनंदी, सधन आणि श्रीमंत बनवायला हवं, असा आमचा उद्देश आहे. म्हणूनच आम्ही ही विकासकामं हाती घेतली आहेत,” असं सांगितलं.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!