Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 8

लोकशाही सशक्त राहिली तरच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती शक्य – अ‍ॅड. इंदिरा जयसिंग

0

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर ) : स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय (२०, २१ व २२ डिसेंबर) राज्यस्तरीय परिषदेची सुरुवात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाली. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. इंदिरा जयसिंग, डॉ. सईदा हमीद तसेच महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार, अ‍ॅड. निशा शिऊरकर, डॉ. चयनिका शहा, लता भिसे-सोनावणे, हसीना खान, अमोल केरकर, सुनीता बागल, शुभदा देशमुख, संगीता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्त्रीमुक्ती चळवळीच्या परंपरेनुसार स्त्रीमुक्ती विषयक गीतांच्या सादरीकरणाने परिषदेची सुरुवात झाली. राज्यातील ३१ जिल्ह्यांतून ८००हून अधिक विविध जाती-पंथांतील महिला प्रतिनिधी आणि ट्रान्सजेंडर यांनी परिषदेला उपस्थिती लावली. सुमारे ९२ स्त्रीमुक्ती संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला. गेल्या वर्षभरात परिषदेमार्फत राज्यभर विभागनिहाय महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. यासह अलीकडेच करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिट अहवालाची माहिती देत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील वास्तव आणि आव्हाने स्पष्ट करण्यात आली.

 

यावेळी बोलताना अ‍ॅड. इंदिरा जयसिंग म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने देशात स्त्रीमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली. गांधीजींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शिकवण दिली, तर डॉ. आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करायला शिकवले. संविधानाचे जनक कोण, हा प्रश्न नेहमी विचारला जातो; मात्र संविधानाची ‘आई’ कोण, हा प्रश्न विचारला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मृणालताई गोरे आणि अहिल्याबाई रांगणेकर यांनी पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लाटणे मोर्चे काढले, प्रमिला दंडवते यांनी हुंडाविरोधी चळवळ गावोगावी पोहोचवली, निरा देसाई यांनी शैक्षणिक परंपरेचा पुरस्कार केला, तर निर्मला देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्या सार्वत्रिक असल्याची जाणीव करून दिली, असे त्यांनी नमूद केले. पंचायत राज व्यवस्थेत महिलांना अधिकार मिळाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात सत्ता अनेकदा ‘सरपंच पतीं’कडेच केंद्रीत राहते. त्यामुळे स्त्रीमुक्ती ही लोकशाहीवर अवलंबून असून, लोकशाही सशक्त राहिली तरच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

सन्माननीय पाहुण्या डॉ. सईदा हमीद यांनी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या कार्याचे कौतुक करताना, प्लॅनिंग कमिशनमध्ये काम करताना मालेगाव आणि गडचिरोली येथील परिस्थितीचा अभ्यास करून वस्तुस्थिती देशासमोर मांडल्याचा अनुभव सांगितला आणि स्त्रीमुक्तीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच दशकांच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेतला. आजही हुंड्यामुळे महिलांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, मेट्रोसारख्या सुविधा आल्या तरी प्रवास सुरक्षित नाही, तसेच घर व शाळांमध्ये स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकताच नरेगा संदर्भातील ठराव लोकसभेत मंजूर केल्यामुळे रोजगार हमी योजनेवर होणारे परिणाम चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले, तसेच आगामी अणुकरारांमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांवर आतापासूनच विचार करण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्ष शारदा साठे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि परिषदेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्रावर झोंबणाऱ्या शीतलहरींचा प्रहार; पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा.!!!

0

महाराष्ट्रावर झोंबणाऱ्या शीतलहरींचा प्रहार; पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा.!!!

मुंबई प्रतिनिधी :-

उत्तर भारतातील पर्वतीय भागांसह मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात झालेल्या तीव्र घटीनंतर त्याचा परिणाम आता मध्य भारतासह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी महाराष्ट्रात शीतलहरींचा इशारा जारी केला आहे.

 

राज्याच्या उत्तरेकडील पट्ट्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या झोंबणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, घाट क्षेत्रासह मैदानी भागांमध्ये धुक्याची चादर पसरत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा प्रशासन आणि हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

मुंबई–उपनगरांमध्येही गारठा

 

मुंबई शहर व उपनगरांमध्येही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत असून, किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहरात सकाळच्या वेळी हलकं धुकं जाणवणार असून सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार

 

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होत असून ही स्थिती सोलापूरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जाणवणाऱ्या शीतलहरींसारखीच थंडी आता महाराष्ट्रात जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घराबाहेर पडायचं की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

मराठवाडा–विदर्भालाही फटका

कोकण, मराठवाडा आणि विदर्भ हे भागही या शीतलहरींपासून सुटलेले नाहीत. नांदेड, परभणी, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शीतलहरी हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असून, पुढील 48 तासांत हवामानात फारसे बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक कारणांशिवाय पहाटे आणि रात्री उशिरा बाहेर पडू नये, उबदार कपडे वापरावेत आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.

चार नगरसेवकांचा सौहार्दपूर्ण सत्कार; भडगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार

0

चार नगरसेवकांचा सौहार्दपूर्ण सत्कार; भडगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे शिवसेनेचे नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा व इमरान अली सय्यद तसेच प्रभाग क्रमांक ७ चे अपक्ष उमेदवार अलीम शाह आणि शिवसेनेचे उमेदवार हाजी खलील मिस्त्री यांनी निवडणुकीनंतर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. या उपक्रमातून राजकीय सौहार्द, एकोपा आणि शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक सहकार्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते जमाल भाऊ कासार, पत्रकार अबरार मिर्झा, एच बी ए इंग्लिश मेडीयम स्कुलचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख यांनी देखील निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला

निवडणूक काळात विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी निवडणुकीनंतर ते बाजूला ठेवून नागरिकांच्या हितासाठी एकत्र काम करणे ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. भडगाव शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा व शिक्षण या विषयांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर वेळेत तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या समजून घेऊन त्यावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

भडगावच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्षभेद न ठेवता सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक असून, शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. नागरिकांचा विश्वास व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सौहार्दपूर्ण भूमिकेमुळे नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सत्कार सोहळ्याला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी सहकार्य व समन्वयाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे भडगाव शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख ठरले किंगमेकर

0

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख ठरले किंगमेकर

पाचोरा प्रतिनिधी :–

पाचोरा नगरपरिषदेच्या अलीकडील निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख हे ठरले निर्णायक किंगमेकर. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या जबाबदारीनुसार, हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांनी शिवसेनाच्या 9पैकी 9 उमेदवारांना नगरसेवकपदी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

यामुळे निवडणुकीत सत्ता समतोल राखण्यात आणि शिवसेनेला नगरपरिषदेतील आपले स्थान मजबूत करण्यात मोठा वाटा राहिला. स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरल्यामुळे भविष्यातील नगरपालिकेच्या धोरणांवरही त्यांचा प्रभाव दिसून येईल.

नगरपरिषदेच्या या निवडणुकीत अनेक पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा होती, मात्र हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांच्या निर्णयक्षमतेमुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले.

मताधिक्यांचा पाऊस, विजयांचा इतिहास : भडगाववर शिवसेनेचा भगवा शिक्का.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व यश मिळवत नगरराजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मिळालेल्या विक्रमात्मक मताधिक्यामुळे हे उमेदवार शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

प्रभाग क्रमांक ३ अ : सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम

या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान प्रभाग क्रमांक ३ अ मधील शिवसेनेच्या उमेदवार आसिम भाऊ मिर्झा यांच्या मातोश्री सौ. मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग यांनी पटकावला आहे.

त्यांना तब्बल १७८५ मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवार पठाण बिबाबी अमानुल्लाखान यांना केवळ ५३१ मते मिळाली.

यामुळे अनजुमपरवीन मिर्झा यांनी १२५४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम नोंदवला आहे.

प्रभाग क्रमांक ७ ब : शिवसेनेचा प्रचंड जनाधार

प्रभाग क्रमांक ७ ब मधून शिवसेनेचे शेख खलील शेख अजिज यांनी १६०३ मते मिळवत विजय मिळवला. भाजपाचे बेग न्यामतबेग हुकूमत यांना केवळ ४६१ मते मिळाली.या लढतीत ११४२ मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवत शेख खलील यांनी शिवसेनेचा मजबूत जनाधार स्पष्ट केला.

प्रभाग क्रमांक ३ ब : हजाराहून अधिक मतांचे वर्चस्व

इतर मोठ्या फरकाने विजयी उमेदवार

प्रभाग ९ अ : भोसले विजयकुमार रायभान (शिवसेना) – १५०५ मते, फरक १०५३

प्रभाग क्रमांक ३ ब मधून शिवसेनेचे सय्यद इम्रानअली शहादतअली यांनी १६६८ मते मिळवली, तर भाजपाचे पठाण शेरखान मजिदखान यांना ६३६ मते मिळाली.

याठिकाणी १०३२ मतांच्या फरकाने शिवसेनेचा विजय झाला.

प्रभाग ६ ब : पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना) – १३९१ मते, फरक ६३४

प्रभाग ५ ब : परदेशी अतुलसिंह भिकनसिंह (शिवसेना) – ११९६ मते, फरक २३०

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही मोठा फरक

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखाताई प्रदीप मालचे यांनी भाजपाच्या सुशीलाबाई पाटील यांचा १५११ मतांनी पराभव करत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हा विजयही शहराच्या राजकारणात मैलाचा दगड मानला जात आहे.

जनतेचा स्पष्ट कौल

या निवडणुकीतील मोठ्या मताधिक्यांचे निकाल पाहता भडगाव शहरातील जनतेने विकास, स्थैर्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला स्पष्ट कौल दिल्याचे चित्र आहे.

नगरपरिषदेतील बहुसंख्य जागांवर मिळालेला विजय आणि काही प्रभागांतील विक्रमी मताधिक्य यामुळे आगामी काळात शिवसेनेचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; रेखाताई मालचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी तर भाजपाच्या सुशीलाबाई पाटील पराभुत.!!!

0

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; रेखाताई मालचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी तर भाजपाच्या सुशीलाबाई पाटील पराभुत.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुशीलाबाई शांताराम पाटील यांचा १ हजार ५११ मतांनी पराभव केला. रेखाताई मालचे यांना एकूण १२,९५५ मते, तर सुशीलाबाई पाटील यांना ११,४४४ मते मिळाली. या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला असून सेनेचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे.

नगरसेवक निवडणुकीतही शिवसेनेने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण १२ प्रभागांतील २४ नगरसेवक पदाकरिता शिवसेनेने १९ नगरसेवक तर भाजपा ने ४ नगरसेवक व यामध्ये प्रभाग क्रमांक सात अ मधून अपक्ष उमेदवार यांनी आपली बाजी लावली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

याबाबत प्रभाग निहाय निवडुन आलेले विजयी व पराभुत उमेदवार

प्रभाग क्रमांक १अ मधून भिल अंजना हिंम्मत भाजपा ८८६ मते (विजयी), मालचे लताबाई अजय अपक्ष २२९ मते (पराभूत) रंजना रविंद्र सोनवणे शिवसेना ८७७ मते (पराभूत)

प्रभाग क्रमांक १ ब मधून नरवाडे शिवसेना ६९४ मते (पराभूत) पाटील जितेंद्र विठ्ठल भाजपा ७४९ मते (विजयी) पाटील सुशिलाबाई भगवान अपक्ष ५६५ (पराभूत)

प्रभाग क्रमांक दोन अ मधून देशमुख विजयकुमार नानासाहेब शिवसेना १३१४ मते (विजयी) पाटील मीनाक्षीबाई नारायण भाजपा ६१३ मते (पराभूत) शिरसाठ महेश राजेंद्र अपक्ष १८ (पराभूत)

प्रभाग क्रमांक दोन ब मधून पठाण खालेदाबी नसीर खान भाजपा ५३० मते (पराभूत) मोरे चैताली जगन्नाथ अपक्ष ६४६ मते (पराभूत) वाघ रंजनाबाई अनिल शिवसेना ७४४ मते (विजयी)

प्रभाग क्रमांक तीन अ मधून पठाण बिबाबी अमानुल्लाखान भाजपा ५३१ मते(पराभूत) मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग शिवसेना १७८५ मते (विजयी) तर नोटा ४४ मते

प्रभाग क्रमांक तीन ब मधून पठाण शेरखान मजिदखान भाजपा ६३६ मते (पराभूत) सय्यद इम्रानअली शहादतअली शिवसेना १६६८ (विजयी) नोटा ५६ मते

प्रभाग क्रमांक चार अ मधून देशमुख करुणाबाई सुनिल शिवसेना १०६१ मते (विजयी) पवार पुष्पांजली प्रशांत भाजपा ९६३ मते (पराभूत) नोटा २८ मते

प्रभाग क्रमांक चार ब मधून चोरडिया सचिन विनोदकुमार भाजपा ११४२ मते (विजयी) ततार महेंद्र वसंत शिवसेना ८९० मते (पराभूत) नोटा २० मते

प्रभाग क्रमांक पाच अ मधून पाटील कविता सोमनाथ भाजपा १०७९ मते (पराभूत) पाटील किरण अतुल शिवसेना १०९१ मते (विजयी) नोटा ११ मते

प्रभाग क्रमांक पाच ब मधून परदेशी अतुलसिंह भिकनसिंह शिवसेना ११९६ मते (विजयी) पवार जितेंद्र भास्करराव भाजपा ९६६ मते (पराभूत) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक सहा अ मधून पाटील आशाबाई रंगनाथ भाजपा ९१९ मते (पराभूत) येवले योगिता शशिकांत शिवसेना १२५४ मते (विजयी) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक सहा ब मधून पाटील प्रशांत पांडुरंग भाजपा ७५७ मते (पराभूत) पाटील लखीचंद प्रकाश १३९१ मते (विजयी) नोटा ४४ मते

प्रभाग क्रमांक सात अ मधून परदेशी निता गणेश शिवसेना १०४९ मते (पराभूत)

फकीर नगमाबी अलीमशाह अपक्ष १२४१ मते (विजयी)

सूर्यवंशी दिपाली नरेंद्रसिंग भाजपा ४२९ मते (पराभूत ) नोटा २० मते

प्रभाग क्रमांक सात ब खान सलीमाबी शब्बीर रा. काँ. पा. ३७४ मते (पराभूत) थोरात अमोल सुरेश उ. बा. ठा. २१२ मते (पराभूत) धोबी भरत किसन अपक्ष ४६ मते (पराभूत) बेग न्यामतबेग हुकूमत भाजपा ४६१ मते (पराभूत) शेख खलील शेख अजिज शिवसेना १६०३ मते (विजयी) नोटा ४३ मते

प्रभाग क्रमांक आठ अ मधून डॉ. पाटील पूनम प्रशांत भाजपा १२८७ मते (पराभूत) पाटील समीक्षा लखीचंद शिवसेना १३०१ मते (विजयी) नोटा २७ मते

प्रभाग क्रमांक आठ ब मधून

ॲड. पाटील अमोल नाना भाजपा १५२३ मते (विजयी) डॉ. पाटील प्रमोद हेमराज शिवसेना ९०२ मते (पराभूत) वाडेकर भूषण प्रकाश उ.ठा.बा. १७१ मते (पराभूत) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक नऊ अ मधून पाटील शेखर दिनानाथ भाजपा ४५२ मते (पराभूत) भोसले विजयकुमार रायभान शिवसेना १५०५ मते (विजयी) महाजन उज्वल अनिल रा. काॅ.पा. ७६ मते (पराभूत) नोटा १४ मते

प्रभाग क्रमांक नऊ ब मधून पाटील योजना दत्तात्रय भाजपा ८५८ मते (पराभूत) पाटील वैशाली विशाल शिवसेना ११६३ मते (विजयी) नोटा २६ मते

प्रभाग क्रमांक दहा अ मधून पाटील प्रवीण वसंत भाजपा ५८३ मते (पराभूत) पाटील राजेंद्र महादू शिवसेना १०६५ मते (विजयी) पाटील विठ्ठल कौतिक अपक्ष ४६ मते (पराभूत) नोटा १७ मते

प्रभाग क्रमांक दहा ब मधून पाटील ज्योती जितेंद्र शिवसेना ९९१ मते (विजयी) पाटील हर्षा विठ्ठल उ.बा.ठा.१६० मते (पराभूत) बोरसे कुसुम सुभाष भाजपा ३३६ मते (पराभूत) शेख शहनाजबी अनिस अपक्ष १८४ मते (पराभूत) सेय्यद शकील इब्राहिम अपक्ष २८ मते (पराभूत) नोटा १२ मते

प्रभाग क्रमांक अकरा अ मधून अहिरे अविनाश पुंडलिक अपक्ष ६७८ मते (पराभूत) अहिरे देवाजी बापू शिवसेना ९३६ मते (विजयी) वाघ योगिता अनिल भाजपा ६८९ मते (पराभूत)मोरे सुरेंद्र चंद्रराव उ.बा.ठा. १९ मते (पराभूत) नोटा १५ मते

प्रभाग क्रमांक अकरा ब मधून भोई कल्पनाबाई जगन शिवसेना १२०१ मते (विजयी) भोई पुष्पाबाई अशोक अपक्ष ५१ मते (पराभूत) पाटील मीनाक्षी भूषण भाजपा १०३३ मते (पराभूत) नोटा ५२ मते

प्रभाग क्रमांक बारा अ मधून ठाकरे राहुल राजेंद्र शिवसेना १०७० मते (विजयी) मालचे रितेश राजेश अपक्ष ८२ मते (पराभूत) सोनवणे रवींद्र शांताराम भाजपा ९१८ मते (पराभूत) नोटा ३७ मते

प्रभाग क्रमांक बारा ब मधून अहिरे कमलबाई पुंडलिक अपक्ष ५३ मते (पराभूत) पठाण रुखसरबी शाहरुखखान भाजपा ८०५ मते (पराभूत) बाविस्कर मनीषा हिरामण रा. काँ. पा. ११७ मते (पराभूत) महाजन वैशाली संतोष शिवसेना १०७० मते (विजयी) नोटा ६२ मते.

भडगाव नगरपरिषद निवडणूक  प्रभाग क्रमांक ३ वर शिवसेनेचा झेंडा, दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी.!!!

0
0-0x0-2-0-{}-0-0#

भडगाव नगरपरिषद निवडणूक  प्रभाग क्रमांक ३ वर शिवसेनेचा झेंडा, दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातून शिवसेनेच्या मिर्झा अंजुम परविन हकीमबेग यांनी १७८५ मतांनी स्पष्ट विजय मिळवला, तर सय्यद इमरान अली शहादतअली यांनी १६६८ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

या निकालामुळे संपूर्ण प्रभागात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. प्रभागातील नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मतदारांचे आभार मानले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक व लोकाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

नर्सरीतील चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शंभर टक्के बंद शहरातील व्यवहार ठप्प.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज भडगाव शहरात सर्वपक्षीय वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाले होते.

दिनांक 16 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोल्हा नाल्याच्या पाण्यात पडून नर्सरीत शिकणाऱ्या अंश सागर तहसिलदार वय-३वर्ष ६ महिने व मयांक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय- ४ वर्ष २ महिने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण भडगाव शहरात स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले, बसस्टँड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रस्ता, पाचोरा रस्ता, पेठ भागातील लहान-मोठी दुकाने पूर्णतः बंद होती. खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांवरही बंदचा परिणाम दिसून आला. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा तैनात बंदोबस्त होता. बंद काळात कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, सदर घटनेतील आठ ते दहा आरोपी अद्याप फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, शाळेचे संचालक मंडळ बखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज दुपारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार शितल सोलाट व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना देण्यात आले

एकूणच, चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शहराने दाखवलेली एकजूट लक्षवेधी ठरली असून बंद शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे चित्र दिसून आले.

कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल : माटुंग्यात विद्यार्थिनींसाठी ‘उद्योजक मेळावा’

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, श्रीमती मनिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग तसेच ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा येथील विसनजी रावजी ऑडिटोरियममध्ये ‘उद्योजक मेळावा’ या लघुउद्योजक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास विविध क्षेत्रांतील उद्योजक, प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख डॉ. सरिता कासरलकर यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत स्वयं-लघुउद्योजकतेकडे कसे वळावे, याविषयी आपले विचार मांडले. तसेच त्यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यानंतर महाविद्यालयाच्यावतीने प्रमुख अतिथी ‘दे आसरा’ फाउंडेशनचे सहसंस्थापक व मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोडसे आणि अजय कौटिकवार, तसेच सन्माननीय अतिथी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य अधिकारी विद्या शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान करण्यात आला.

 

प्रास्ताविकात सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीमध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करत या उपक्रमामागील उद्देश विषद केला व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. आनंद गोडसे यांनी स्व-कौशल्याचे यशस्वी उद्योजकतेमध्ये रूपांतर करताना मानसिक व शारीरिक क्षमतांचा विकास कसा करावा, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी प्रभावी नेटवर्किंगचे महत्त्व काय आहे, याविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अजय कौटिकवार यांनी सोशल मीडिया मार्केटिंगच्या प्रभावी वापरातून व्यवसाय कसा विस्तारता येतो, याबाबत विविध उदाहरणांसह माहिती देत नवउद्योजक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

या उपक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधवी पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभागाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले. या उद्योजक मेळाव्यात १० महिला उद्योजिका, २५ उद्योजक तसेच १६० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन कौशल्याधारित व्यवसायाच्या संधींबाबत नवी दिशा मिळाली असून, कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

निवडणूक आयोगाचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा,निधी वितरणासाठी मिळाला ग्रीन सिग्नल ,खात्यात केव्हा जमा होणार पैसे.?

0

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात एकूण तीन टप्प्यात होणार आहेत. दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली.

मात्र काही कारणास्तव राज्यातील काही जागांवरील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकाचे मतदान आता उद्या अर्थातच वीस डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

यामुळे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरू आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच आता लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

खरे तर स्थानिकच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत. दरम्यान आता याच संदर्भात एक नवे अपडेट हाती आल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. विशेष बाब अशी की यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे आणि लवकरच हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.

खरे तर आचारसंहिता सुरू असल्याने निधी वितरणासाठी अडचणी येणार अशी शक्यता होती. मात्र निवडणूक आयोगाकडून लाडक्या बहिणींना हफ्ता वितरित करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरणासाठी मंजुरी दिली असल्याची एक बातमी प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने दिली मोठी माहिती

राज्य निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्याने या योजनेच्या निधी वितरणास आचारसंहितेचा अडसर येत नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती समोर आली आहे. योजना नवीन नाही , योजना जुनी आहे म्हणूनच योजनेच्या निधी वितरणावर आचारसंहितेमुळे कोणताही प्रतिबंध लावता येऊ शकत नाही असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या निधी वितरणाबाबत निवडणूक आयोगाला अजून विचारण्यात आलेली नाही. राज्य शासनाने निधी वितरणासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली नाही.

मात्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत योजनेच्या हप्त्याच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो अशा चर्चांनी आता जोर पकडला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार महापालिका निवडणूकांच्या चार ते पाच दिवस आधी लाडक्या बहिणींना सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित रित्या दिले जाऊ शकतात.

दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसी बंधनकारक करण्यात आली असून केवायसी प्रक्रियेतून जवळपास 40 ते 50 लाख लाभार्थी वगळले जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. केवायसी साठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. यामुळे या मुदतीत महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

error: Content is protected !!