
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व यश मिळवत नगरराजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मिळालेल्या विक्रमात्मक मताधिक्यामुळे हे उमेदवार शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
प्रभाग क्रमांक ३ अ : सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम
या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान प्रभाग क्रमांक ३ अ मधील शिवसेनेच्या उमेदवार आसिम भाऊ मिर्झा यांच्या मातोश्री सौ. मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग यांनी पटकावला आहे.
त्यांना तब्बल १७८५ मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवार पठाण बिबाबी अमानुल्लाखान यांना केवळ ५३१ मते मिळाली.
यामुळे अनजुमपरवीन मिर्झा यांनी १२५४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम नोंदवला आहे.
प्रभाग क्रमांक ७ ब : शिवसेनेचा प्रचंड जनाधार
प्रभाग क्रमांक ७ ब मधून शिवसेनेचे शेख खलील शेख अजिज यांनी १६०३ मते मिळवत विजय मिळवला. भाजपाचे बेग न्यामतबेग हुकूमत यांना केवळ ४६१ मते मिळाली.या लढतीत ११४२ मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवत शेख खलील यांनी शिवसेनेचा मजबूत जनाधार स्पष्ट केला.
प्रभाग क्रमांक ३ ब : हजाराहून अधिक मतांचे वर्चस्व
इतर मोठ्या फरकाने विजयी उमेदवार
प्रभाग ९ अ : भोसले विजयकुमार रायभान (शिवसेना) – १५०५ मते, फरक १०५३
प्रभाग क्रमांक ३ ब मधून शिवसेनेचे सय्यद इम्रानअली शहादतअली यांनी १६६८ मते मिळवली, तर भाजपाचे पठाण शेरखान मजिदखान यांना ६३६ मते मिळाली.
याठिकाणी १०३२ मतांच्या फरकाने शिवसेनेचा विजय झाला.
प्रभाग ६ ब : पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना) – १३९१ मते, फरक ६३४
प्रभाग ५ ब : परदेशी अतुलसिंह भिकनसिंह (शिवसेना) – ११९६ मते, फरक २३०
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही मोठा फरक
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखाताई प्रदीप मालचे यांनी भाजपाच्या सुशीलाबाई पाटील यांचा १५११ मतांनी पराभव करत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हा विजयही शहराच्या राजकारणात मैलाचा दगड मानला जात आहे.
जनतेचा स्पष्ट कौल
या निवडणुकीतील मोठ्या मताधिक्यांचे निकाल पाहता भडगाव शहरातील जनतेने विकास, स्थैर्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला स्पष्ट कौल दिल्याचे चित्र आहे.
नगरपरिषदेतील बहुसंख्य जागांवर मिळालेला विजय आणि काही प्रभागांतील विक्रमी मताधिक्य यामुळे आगामी काळात शिवसेनेचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
