Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 3

राज ठाकरेंनी अदानी साम्राज्याचा व्हिडिओ दाखवत भाजपवर जोरदार हल्लाबोल.!!!

0

मुंबई :-

मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत उपस्थितांना धक्का देणारे वक्तव्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत अदानी समूहाच्या वाढत्या साम्राज्याचा एक विशेष व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याची प्रतिक्रिया सभास्थळी उमटली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०१४ पूर्वी गौतम अदानी यांचे प्रकल्प मर्यादित स्वरूपात होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी समूहाच्या प्रकल्पांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. “मला व्यापाराला विरोध नाही, पण एका उद्योगपतीला इतकं सरकारचं संरक्षण आणि पाठबळ का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभेत राज ठाकरे यांनी आधी भारताचा नकाशा दाखवला. त्यामध्ये २०१४ साली अदानी समूहाचे किती प्रकल्प होते आणि आज देशभरात किती प्रकल्प आहेत, याची तुलनात्मक आकडेवारी त्यांनी सादर केली. मुंबई महानगर, महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अदानींच्या प्रकल्पांची सविस्तर यादीही त्यांनी दाखवली.

“भाजपने फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश विकायला काढला आहे. आपल्यासमोर काय वाढवून ठेवलं आहे, याची आपल्याला कल्पनाही नाही,” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनंतर आपल्या टीमने संशोधन केल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनातून समोर आलेली माहिती धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी सभेत अदानी साम्राज्याची क्लिप दाखवली.

“तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना भीती वाटेल. हे सगळं पाहिलं असतं तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असे परखड वक्तव्य करत राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना असा आरोप केला की, सत्तेचा गैरवापर करून काही निवडक उद्योगपतींना फायदा करून दिला जात आहे. “मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदानी कुठे होते आणि आज कुठे आहेत, हा प्रश्न देशातील जनतेने विचारायला हवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संयुक्त सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर वडजी ता. भडगाव येथे संस्थेचे सन्माननीय चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन व्ही. टी. जोशी होते. समारोप कार्यक्रमाला संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, विजय देशपांडे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा उपस्थित होते.

व्ही. टी. जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त व नेतृत्वगुण विकसित होतात. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे फार महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात मानवी मूल्यांची जोपासना केल्यास त्याचे व्यक्तिमत्व घडते”, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण पाटील, पत्रकार सुधाकर पाटील, वडजी ग्रामपंचायत सदस्य स्वदेश पितांबर पाटील, संजय आनंदा परदेशी, समाधान रामचंद्र पाटील, कैलास रामदास पाटील, भाईदास पाटील, संजय पाटील, दीपक जिजाबराव पाटील, बाबाजी पाटील, पोलीस पाटील कैलास मोरे तसेच वडजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वनराई बंधारा, बेरोजगार तरुण सर्वेक्षण, सामाजिक जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

समारोप सोहळ्यात रोहन दिलीप तडवी, कृष्णा ज्ञानेश्वर कोळी, चेतन रघुनाथ अहिरे, निशा सुनील बागूल व प्रांजल निलेश कासार यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले. तसेच रोशनी योगेश पाटील हिला उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून मान्यवरांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या वतीने सौरभ नाना गायकवाड, चेतन माणिक बोरसे, निशा सुनील बागूल व प्रांजल पाटील यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले, तर आभार प्रा.एस.सी. पाटील यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेकरिता उपप्राचार्य डॉ. डी.एम. मराठे, प्रा.डॉ एस. डी.भैसे, डॉ. ए.एन. भंगाळे, डॉ. सुनील शेलार, प्रा. एम. डी. बिर्ला, प्रा. डॉ.नारायण चिमणकर, प्रा. जी.एस.अहिरराव, प्रा. संजय झाल्टे, डॉ.डी. एच. तांदळे, डॉ. एस. एन. हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, डॉ. गजानन चौधरी, प्रा. अर्चना टेमकर, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ. चित्रा पाटील, डॉ. डी. ए. मस्की, प्रा. रचना गजभिये, प्रा. अधिकराव पाटील, डॉ. प्राजक्ता देशमुख, प्रा. प्रवीण देसले, प्रा. श्रद्धा ठाकूर, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. ज्योती नन्नवरे, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. मयूर दायमा, संदीप केदार, शिक्षकेतर कर्मचारी अजय देशमुख, दिलीप चौधरी, सुनील पाटील, दिलीप तडवी, प्रवीण तडवी, तुळशीराम महाजन आदींनी सहकार्य केले.

समारोप कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक एस.आर.पाटील, प्रा.एल.जी.कांबळे, प्रा.पी.डी.पाटील व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!

0

जिल्हा प्रतिनिधी :- अलिराजा खान

नगरदेवळे ता. पाचोरा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १० जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिन सप्ताह तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस व पत्रकार बांधवांचा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम शिक्षण समितीचे संचालक दादासाहेब किशोर पाटील, आप्पासाहेब जगन्नाथ पाटील, तात्यासाहेब वामन पाटील, दादासाहेब अब्दुल गनी शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मोरे, तसेच संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, सोनू परदेशी, अली रजा खान, फारुख शेख, अतुल भावसार, सौरव तोष्णीवल, जावेद शहा या पत्रकार व पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती दादा मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षकांविषयी आदर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांची उदाहरणे देत जीवन शिस्तबद्ध, मूल्याधिष्ठित व प्रगतिशील कसे घडवावे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण काटकर यांनी आपल्या भाषणात पोलीस व पत्रकार यांची समाजातील भूमिका स्पष्ट केली. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सत्य व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे कार्य हे दोन्ही घटक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब शिवनारायण जाधव यांनी पत्रकार व पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. यू. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. डी. पी. राजपूत यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

0

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

125 तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

कासोदा प्रतिनिधी :-

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून रविवार, दि. 11 जानेवारी 2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन व पोलीस पाटील संघटना, कासोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रमास कासोदा परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण 125 परीक्षार्थींनी या सराव परीक्षेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेची ओळख होावी, लेखी परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे परीक्षार्थींना काळा पेन, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा पूर्णपणे शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. परीक्षा संपल्यानंतर सर्व परीक्षार्थींंसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

या उपक्रमाबाबत परीक्षार्थींनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले असून, अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत असल्याचे मत अनेक परीक्षार्थींनी व्यक्त केले.

हा पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!

0

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्राचे वाघ सज्ज मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी

पुणे : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत.

प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोश

स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.

गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज

भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे.

पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत

कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.

महिला संघ : रणरागिणींचा आत्मविश्वास आणि धार

कर्णधार : रितिका राठोड (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली महिला संघात धाराशिवचे वर्चस्व दिसून येते. संघात अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, संपदा मोरे, मैथिली पवार, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, श्वेता नवले, रितिका राठोड (कर्णधार) (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), सरिता दिवा (नाशिक), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी) या रणरागिणी मैदानात उतरतील. प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : निकिता पवार (धाराशिव), व्यवस्थापिका : सुनिता जायभाय (बीड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मार्गदर्शकांचे बळ, व्यवस्थापनाची ठाम साथ

दोन्ही संघांसोबत अनुभवी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापनाची मजबूत टीम असल्याने तांत्रिक तयारी, डावपेच आणि मानसिक बळ या तिन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सज्ज आहे.

शुभेच्छांचा वर्षाव : सुवर्णमय स्वप्नासाठी एकजूट

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. ना. श्री. अजित पवार, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंना सुवर्णमय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तेलंगणाच्या भूमीत महाराष्ट्राचे वादळ घोंघावणार—जेतेपदाचा निर्धार, मैदानावरचा वेग आणि संघभावना यांची दमदार परीक्षा आता सुरू!

भडगाव तालुक्यात विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!!!

0

भडगाव  प्रतिनिधी : –

भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी येथे विश्व मानव रूहानी केंद्र, नवानगर (हरियाणा) यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, खेडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

विश्व मानव रूहानी केंद्र हे गोरगरीब, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने विविध जनहितकारी योजना राबवित असून शिक्षण, आरोग्य व सामाजिक मदत या क्षेत्रात संस्थेचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. तसेच रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड, औषधे व आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध करून देत मानवतेचे कार्य करण्यात आले होते.

याच सामाजिक बांधिलकीतून सध्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज एकाच दिवशी भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

या उपक्रमाबद्दल खेडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच वसंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी विश्व मानव रूहानी केंद्राचे प्रमुख बलजीत सिंहजी महाराज साहेब व संस्थेच्या सर्व सेवेदारांचे मनापासून आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या सेवाकार्यात खेडगाव मानव केंद्राचे फर्स्ट मेंबर नानाभाऊ मिस्त्री, वसंतवाडी येथील फर्स्ट मेंबर प्रकाश राठोड, तसेच चाळीसगाव येथील अनुभवी सेवेदार अशोक आप्पा चौधरी, विजुभाऊ पाटील, रमेश मामा, रवीभाऊ चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या शेवटी गावाच्या वतीने उपस्थित नागरिक, पालक व शिक्षकांनी विश्व मानव रूहानी केंद्राच्या सेवाकार्याचे कौतुक करत सेवेदारांचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

साई भक्तांच्या पायी दिंडीस नगरसेविका समीक्षा पाटील यांची भेट.!!!

0

साई भक्तांच्या पायी दिंडीस नगरसेविका समीक्षा पाटील यांची भेट.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

श्री साई मंदिर, भडगाव येथून पायी दिंडीसाठी प्रस्थान केलेल्या समस्त साई भक्तांची प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील (ताई) यांनी भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी साई भक्तांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाबाबत माहिती घेतली व दिंडीतील शिस्त, भक्तीभाव आणि नियोजनाचे कौतुक केले.

यावेळी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत नगरसेविका सौ. समीक्षा पाटील यांनी, “साईबाबांच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडून या संधीचे सोनं करीन,” असा विश्वास व्यक्त केला.

साई भक्तांच्या पायी दिंडीसाठी आवश्यक त्या सुविधा, सुरक्षितता आणि आरोग्यविषयक बाबींविषयीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. भक्तांच्या प्रवासात कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीमुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरसेविकेच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. साई नामाच्या जयघोषात भक्तांनी पुढील प्रवासास प्रस्थान केले.

लालबागमध्ये विठुरायाचा गजर, मुंबई झाली भक्तीमय पंढरपूर

0

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने श्री पांडुरंग पालखी स्वागत सोहळा मागील २६ वर्षांपासून अखंडपणे आयोजित केले जात आहे. या परंपरेनुसार लालबाग येथील संत संताजी जगनाडे महाराज चौकात गेल्या दहा वर्षांपासून संत संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या वतीने पालखीचे भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात येते. यंदाही वारकरी संप्रदायातील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

पालखी स्वागतासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींसह वारकरी भाविकांसाठी अल्पोपाहार व चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सामाजिक जाणीव जपत संताजी लेखणी अर्थात पेन तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमस्थळी आकर्षक बॅनरच्या माध्यमातून संत संताजी महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, ही ऐतिहासिक माहिती वारकरी व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विशेष मांडणी करण्यात आली होती. या उपक्रमास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भक्तीमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर, किशोर मेहेर, राम देशमाने, संतोष पन्हाळे, शिवाजी झगडे, अनिल चौधरी, देविदास राऊत, गजानन घाटकर, सचिन लोखंडे, सुरेश धानके, ॲड. रघुनाथ महाले, मुकुंद चौधरी, सचिन करडिले, संजय डाके, स्वप्नील मावळे, अनिल मावळे, अमित डाके, प्रशांत कसाबे, अशोक करडिले, भरत फल्ले, भूषण खोंड, रूपाली मावळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या वारकरी भाविकांचे, समाज बांधवांचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष दिलीप खोंड यांनी मनःपूर्वक आभार मानले. समाजातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी साकारण्यात आलेली आकर्षक रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली, तर समाज बंधू-भगिनींनी फुगड्या खेळत भक्ती आणि आनंदाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांची जबाबदारी संतोष झगडे व नीलेश कसाबे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडली.

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन पदि राजेंद्र परदेशी तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण पाटोळे यांची निवड. 

0

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव शेतकरी सहकारी संघाची चेअरमन व व्हाईस चेअरमन साठी दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता निवडीचा कार्यक्रम व संचालक मंडळाची सभा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकरी सहकारी संघाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि राजेंद्र लालचंद परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रत्येकी दोघांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली.चेअरमन पदाचा भैय्यासाहेब पाटील यांनी तर व्हाईस चेअरमन पदाचा देविदास माळी या दोघांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे दिले होते या दोघ रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. नवनिर्वाचीत चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन या दोघांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांचेसह संचालक मंडळ व उपस्थित नागरीकांमार्फत करण्यात आला. तसेच यानंतर पञकार व अशोकबापु परदेशी यांनीही चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन हिरामण पाटोळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतापराव पाटील, जयवंत पाटील, खुमानसिंग पाटील, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, जयवंत पाटील, गुलाब पाटील, रायचंद परदेशी, हिरामण पाटोळे, शुभांगी पाटील, योजना पाटील, भिमराव पाटील, नागेश वाघ, आदि संचालक तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील, डाॅ. प्रमोद पाटील, महेंद्र ततार, जगन भोई, नगराज पाटील, सरदार परदेशी घुसर्डी, कैलास पाटील, रमेश पाटील, विशाल परदेशी, भुतेसिंग परदेशी बांबरुड प्र. ब, वाडे विकासोचे चेअरमन उदयसिंग परदेशी , जितेंद्र परदेशी घुसर्डी, दिनेश परदेशी वडजी, विष्णु भोसले, आमडदे, घुसर्डी विठ्ठल पाटील,पप्पु पाटील,डी. डी. पाटील आदि उपस्थित होते. तर संघाचे मॅनेजर सुरेश पाटील, लिपीक साहेबराव पाटील, दिलीप नरवाडे, विशाल भोई

आदि कर्मचारीही उपस्थित होते.आभार माजी चेअरमन भैय्यासाहेब पाटील यांनी मानले.

मांडकी शिवारात बिबटयाचे झाले दर्शन.चौधरी कुटुंबाची उडाली भंबेरी.!!!

0

मांडकी शिवारात बिबटयाचे झाले दर्शन.चौधरी कुटुंबाची उडाली भंबेरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

भडगाव तालुक्यातील मांडकी शिवारात दि.८ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता मांडकी येथील श्री. संत बाळु मामा मंदिराचे पुजारी सुभाष धनराज चौधरी यांचेसह परीवार चारचाकी गाडीने गावात जात असतांना रस्त्यावरुन बिबटया जातांना बिबटयाचे दर्शन झाले. बिबटया पहाताच चौधरी कुटुंबातील सदस्यांची घबराहट पसरुन भंबेरी उडाली होती. तात्काळ गाडीचे काच बंद करुन घटनास्थळावरुन गाडी भरधाव वेगाने काढली. परीसरात बिबटया वावरत असल्याने शेतकरी, नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. तरी वनविभागाने या बिबटयाचा तात्काळ बंदोबस्त करावा. नागरीकांची भिती कमी करावी अशी मागणी मांडकी परीसरातील नागरीकातुन होतांना दिसत आहे.

error: Content is protected !!