जळगावराजकीय
Trending

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुसर्डी येथील नागरिकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुसर्डी येथील नागरिकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भडगाव प्रतिनिधी :- (जावेद शेख)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या सक्षम, लोकाभिमुख व संविधान रक्षणाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून घुसर्डी (ता. भडगाव जि. जळगाव) येथील अनेक नागरिकांनी भारतीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप राव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधानसभा अध्यक्ष मा. मनोहर शिवाजी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप राव पवार यांनी सांगितले की, “देशातील लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.”

युवक विधानसभा अध्यक्ष मनोहर शिवाजी महाले यांनी म्हटले की, “घुसर्डी येथील नागरिकांनी काँग्रेसच्या विचारधारेवर व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षात प्रवेश केला, ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात गावाच्या व जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे काम करेल.”

प्रवेश घेतलेले

गोकुळ काशिनाथ शिंदे, बाळासाहेब माधवराव शिंदे ,महेंद्र रामचंद्र शिंदे, शिवम गोकुळ शिंदे, अमोल मनोज पाटील, गोपाल शिंदे ,शुभम शिवाजी शिंदे, भूषण शिंदे, पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी युवक शहराध्यक्ष आबा देशमुख, युवक विधानसभा उपाध्यक्ष धनंजय शिंदे ,युवक तालुका सचिव शुभम शिंदे, युवक तालुका उपध्यक्ष शुभम शिवाजी शिंदे, युवक तालुका सरचिटणीस अर्जुन शिंदे, अनिकेत शिंदे ,कार्यकर्ते उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!