जळगावमहाराष्ट्र

कन्हेरेत एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू,गावात शोककळा 

कन्हेरेत एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू,गावात शोककळा 

पारोळा प्रतिनिधी:-

पारोळा – एकाचा शॉक लागून तर दुसऱ्याचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कन्हेरे येथे घडली.या घटनेमुळे गावात शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे.

कन्हेरे येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे समाधान प्रल्हाद पाटील (४०) हे आपल्या शेतातील विहिरीच्या मोटरचा पेटी जवळ गेले असता त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागेवरच पडून मृत्यू झाला. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास गावातील विठ्ठल विभीषण पाटील (४२) हे रात्री जेवण करून झोपले असता पहाटे घराचा दरवाजा न उघडल्याने तो उघडून पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास पोलीस हेकॉ डॉ.शरद पाटील करीत आहे.

गावात एकाच दिवशी दोन कर्तबगार इसमांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!