जळगावविशेषसामाजिक

कजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई,मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक हैराण.!!!

कजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई,मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक हैराण.!!!

भडगाव ता. प्रतिनिधी :- आमीन पिंजारी

भडगाव तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत असून, अनेक ठिकाणी दूषित पाणी नळाला येत असल्याने लहान मुले व वृद्ध आजारांना बळी पडत आहेत.

गावात दोन-तीन वर्षांपूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मात्र, अद्यापही गावकऱ्यांना नियमित व शुद्ध पाणी मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महिलांना व वृद्धांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!