जळगावमहाराष्ट्रसामाजिक

भडगाव येथे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सेवा बंद नागरिकांचे हाल,प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी.!!!

भडगाव येथे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सेवा बंद नागरिकांचे हाल,प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार करण्याची सेवा सुरू होती. मात्र, मागील काही दिवसांपासून ही सेवा प्रशासनाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे. परिणामी, विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे तयार करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पूर्वी ही सेवा सेतू केंद्रातून नाममात्र शुल्कात (₹50 ते ₹60) उपलब्ध होती. आता मात्र नागरिकांना वकिलामार्फत नोटरी करून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्याच कामासाठी आता ₹300 ते ₹400 खर्च करावा लागत असून, याचा थेट आर्थिक फटका सामान्य व गरीब नागरिकांना बसत आहे.

या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात कजगाव येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आमीन पिंजारी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याकडे नागरिकांची व्यथा मांडली आहे.

भडगाव तहसीलदारांनी त्वरित लक्ष घालून सेतू सुविधा केंद्रात पुन्हा प्रतिज्ञापत्र सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ही सेवा पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना विनाकारण वकिलांकडे वणवण फिरण्याची वेळ येणार नाही आणि त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होईल.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!