क्राईमजळगावमहाराष्ट्र

 कजगाव ग्रामपंचायत कार्यालयात राडा.”तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” म्हणत कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या, जिवे मारण्याची धमकी.!!!

 कजगाव ग्रामपंचायत कार्यालयात राडा.

“तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” म्हणत कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या, जिवे मारण्याची धमकी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव गावात सोमवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात अक्षरशः राडा उसळला. सरकारी कामात अडथळा आणत, संतापाच्या भरात एका इसमाने थेट कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या लगावल्या आणि वरून “मी तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” अशी धडकी भरवणारी वाक्यं फेकत जिवे मारण्याची धमकी दिली.

घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. फिर्यादी सुनील भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत कार्यालयात आपले नियमित काम करत होते. इतक्यात संशयित भूषण नामदेव पाटील (रा. कजगाव, ता. भडगाव) तिथे धडकले. रस्त्यावर भरत असलेल्या बाजाराबाबत तक्रार करताना त्यांचा पारा चढला आणि थेट हाणामारी सुरू झाली.

या प्रकारामुळे कार्यालयात क्षणभर गोंधळ माजला. घटनेनंतर भूषण पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण व जिवे मारण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. किशोर सोनावणे करत आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!