क्राईमजळगावमहाराष्ट्र

भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात समाजाला हादरवून टाकणारी व मानवी नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या नात्याने चुलत बहिण असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, या अत्याचारातून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा पीडित मुलीच्या कुटुंबातील जवळचा नातेवाईक असून, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीवर वारंवार अत्याचार केले. अल्पवयीन असल्याने आणि भीतीपोटी मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीत बदल दिसून आल्याने कुटुंबीयांनी तिला तपासणीसाठी भडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी- वाल्मीक दिलीप शिरसाठ वय-२२ या तरुणाविरोधात भारतीय दंड विधानातील बलात्काराचे गंभीर कलम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्याची व अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून, तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे.

या घटनेमुळे भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!