क्राईमजळगावमहाराष्ट्र

दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस, दोघांना अटक

दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस, दोघांना अटक

पारोळा प्रतिनिधी :-

कोळपिंप्री गावातून चोरीला गेलेल्या दुचाकी प्रकरणी पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेनंतर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली. कोळपिंप्री येथील ज्ञानेश्वर मच्छिद्र कोळी यांची हिरो कंपनीची दुचाकी (एमएच-५४ ए-२१९५) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. सदर दुचाकीची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये होती.

या प्रकरणात पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील व अनिल राठोड यांच्या पथकाला तपासासाठी नियुक्त केले. पथकाने आरोपी अभय प्रवीण पाटील (वय १९, रा. कोळपिंप्री) याला अमळनेर येथून अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत दुचाकी मयूर तुळशीदास देवरे (वय २२, रा. खडकी, ता. मालेगाव) याच्याकडे असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी मालेगाव येथून मयूर देवरे यालाही ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी चोरी गेलेली दुचाकी जप्त केली आहे.

तपास हवालदार सुनील हटकर करत आहेत.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!