महाराष्ट्रसामाजिक

अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

 

सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सर्वांचे घर असावे, सर्वा मुखी असावा घास, राहू नये कधी कुणी उपाशी हा एकाच वसा हा एकाच ध्यास… समाजात माणुसकीची जाणीव ठेवत, निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी ‘अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन’ तर्फे त्यांच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त एक आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ११ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमात सामाजिक भान जपत कार्य करणाऱ्या उल्लेखनीय महिलांचा गौरव करण्यात येणार असून, एक प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणेश वंदनेने होणार असून, त्यानंतर संस्थेची कार्यदिशा, उद्दिष्टे आणि संस्थापकांचा थोडक्यात परिचय सादर केला जाईल. यानंतर “बाईपण भारी देवा” या संगीतमय आणि भावस्पर्शी अभिवाचनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

कार्यक्रमात समाजासाठी समर्पित योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंगळागौरी स्पर्धासुद्धा रंगणार आहे. ही पारंपरिक स्पर्धा उपस्थितांसाठी एक आनंदाचा अनुभव ठरणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला आपली उपस्थिती हीच आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जर आपण अथवा आपल्याजवळील एखाद्या महिलेनं समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलं असेल, तर त्यांचं नाव आणि थोडक्यात परिचय ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत WhatsApp क्रमांक 9175775251 वर पाठवावा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रज्ञा प्रफुल्ल पितळे – 7887555251.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका प्रज्ञा प्रफुल्ल पितळे (अध्यक्षा) आणि संजना प्रफुल्ल पितळे (उपाध्यक्षा) यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्त्री सामर्थ्याचा सन्मान, समाजसेवेचा गौरव आणि श्रावणातील सांस्कृतिक उत्सव यांचा अनोखा संगम म्हणजे हा कार्यक्रम ठरणार आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!