क्राईमजळगावमहाराष्ट्र

कासोद्यात बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.!!!

कासोद्यात बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.!!!

 

एरंडोल प्रतिनिधी :-

कासोदा शहरात कव्वाली कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारी झाल्याची घटना दि. १४ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जैनुद्दीन नजमुद्दीन शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपींचा बॅनर काढल्याने रागाच्या भरात आरोपी जावीद शेख सुपडू, मोहसिन शेख सुपडू, नाजिम शेख सुपडू (सर्व रा. मुल्लाजी नगर) यांनी त्यांच्यावर एकत्रितपणे हल्ला केला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी त्यांच्या पायाच्या मांडीवर, पाठीवर, कंबरेवर, डोक्यावर व छातीवर जबर मारहाण केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली आणि शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणारी असल्यामुळे पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ११८(२)(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. श्रीकांत गायकवाड करत आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!