कृषीजळगावनिवडणूक

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन पदि राजेंद्र परदेशी तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण पाटोळे यांची निवड. 

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव शेतकरी सहकारी संघाची चेअरमन व व्हाईस चेअरमन साठी दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता निवडीचा कार्यक्रम व संचालक मंडळाची सभा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकरी सहकारी संघाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि राजेंद्र लालचंद परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रत्येकी दोघांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली.चेअरमन पदाचा भैय्यासाहेब पाटील यांनी तर व्हाईस चेअरमन पदाचा देविदास माळी या दोघांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे दिले होते या दोघ रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. नवनिर्वाचीत चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन या दोघांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांचेसह संचालक मंडळ व उपस्थित नागरीकांमार्फत करण्यात आला. तसेच यानंतर पञकार व अशोकबापु परदेशी यांनीही चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन हिरामण पाटोळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतापराव पाटील, जयवंत पाटील, खुमानसिंग पाटील, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, जयवंत पाटील, गुलाब पाटील, रायचंद परदेशी, हिरामण पाटोळे, शुभांगी पाटील, योजना पाटील, भिमराव पाटील, नागेश वाघ, आदि संचालक तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील, डाॅ. प्रमोद पाटील, महेंद्र ततार, जगन भोई, नगराज पाटील, सरदार परदेशी घुसर्डी, कैलास पाटील, रमेश पाटील, विशाल परदेशी, भुतेसिंग परदेशी बांबरुड प्र. ब, वाडे विकासोचे चेअरमन उदयसिंग परदेशी , जितेंद्र परदेशी घुसर्डी, दिनेश परदेशी वडजी, विष्णु भोसले, आमडदे, घुसर्डी विठ्ठल पाटील,पप्पु पाटील,डी. डी. पाटील आदि उपस्थित होते. तर संघाचे मॅनेजर सुरेश पाटील, लिपीक साहेबराव पाटील, दिलीप नरवाडे, विशाल भोई

आदि कर्मचारीही उपस्थित होते.आभार माजी चेअरमन भैय्यासाहेब पाटील यांनी मानले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!