जळगावमहाराष्ट्रविशेषसामाजिक

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव पोलिसांनी आयोजित केलेला सत्कार समारंभ, शहरातील सद्भाव आणि एकतेचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. गणेश मंडळ आणि ईद-ए-मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडणाऱ्या मंडळाचे सत्कार करून पोलिसांनी सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

 

भडगाव येथे आज रोजी भडगाव पोलिस स्टेशन यांच्या कढून पोलिस स्थापना दिनानिमित्त भडगाव शहरातील उत्कृष्ठ गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडली त्यांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय

तर तृतीय समांचिन्ह देण्यात आले या कार्यकामाचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघांचे आ. किशोर आप्पा पाटील होते यांचे हस्ते सर्व गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत काढणारे सर्वांना समांचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले याच्यात

पहिले क्रमांक

आझाद चौक मित्र मंडळ भडगाव

दुसरा क्रमांक

जागृती गणेश मंडळ भडगाव

तिसरा क्रमांक

जय बजरंग मित्र मंडळ यशवंत नगर भोईवाडा

ईद ए मीलाद जलाली मोहला पंच कमिटी भडगाव देण्यात आले

आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक मस्के साहेब यांनी केलं त्यावेळी खालील पैकी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत भडगाव पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के,पोलिस उप निरीक्षक,सुशील सोनवणे, पोलीस गोपनीय विभागाचे निलेश ब्राह्मणकर महिला दक्षता समिती अध्यक्ष व समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळ ईद-ए-मिलाद चे पंचमंडळ आणि आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते

भडगाव शहरातील विविध धर्मांचे लोक एकत्रितपणे राहतात आणि त्यांच्या सन उत्सवांना एकमेकांचा आदर करतात.

पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कामच केले नाही, तर शहरातील सद्भाव वाढवण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

विजेते मंडळांनी दाखवलेली जबाबदारी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, इतर मंडळाना प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांची उपस्थिती, या कार्यक्रमाच्या महत्त्वावर भर दिले.

हा सत्कार समारंभ केवळ एक कार्यक्रम नसून, एक संदेश आहे. तो संदेश आहे, सद्भाव, एकता आणि शांतता हीच खरी प्रगतीची पायाभूत शिला आहे. हा कार्यक्रम भडगावच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकतो.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!