जळगावमहाराष्ट्रराजकीय

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांची सदिच्छा भेट

भडगाव प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टी भडगाव मंडलाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आज भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरूवात करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांनी नोंदणी शिबीराला भेट देऊन समाधान व्यक्त केले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचा परिचय करून मार्गदर्शन केले.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क करून सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजपाशी जोडण्याची सूचना यावेळी केली.

आज दिवसभरात भडगाव मंडलातील जास्तीत जास्त पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून,घरोघरी संपर्क करुन नोंदणीसाठी प्रयत्न केलेत.१५० पेक्षा जास्त कार्यकर्ते आज दिवसभरात सक्रिय होते. १३००हून जास्त प्राथमिक सदस्यांची आज विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान १५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहेत.

 

याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्य. सदस्य तथा विधानसभा संयोजक अमोल नाना पाटील, सदस्य नोंदणी अभियानाचे मंडल संयोजक तथा तालुका सरचिटणीस अनिल मुरलीधर पाटील, अभियानाचे सह संयोजक तथा तालुका उपाध्यक्ष प्रमोद देविदास पाटील, अभियानाचे आय.टी. संयोजक मनोहर तुकाराम चौधरी, शक्तीकेंद्रप्रमुख मनोज सिताराम पाटील माजी शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष विजय सुभाष वाणी, वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वैद्यकिय आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. शेखर पाटील, अनु.जमाती मोर्चाचे सुभाष मोरे,ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान अर्जुन पाटील, बुथप्रमुख हिम्मत बडगुजर, दिपक दादाजी पाटील, जगदिश नारायण सोनवणे,मनोहर रामराव पाटील, अमोल प्रकाश सोनजे,पप्पू विरभान पाटील, राजेंद्र एकनाथ माळी,हेमंत धर्मराज वाडेकर, योगेश कांतीलाल शिंपी, राजू संतोष मोरे, प्रमोद प्रल्हाद पाटील, गोरख रघुनाथ महाजन, निलेश पाटील, यांची उपस्थिती होती.

सदस्यता नोंदणी शिबीर यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!