जळगावमहाराष्ट्रविशेष

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

 

वृक्षतोड व पक्षांचे जीव घेऊन बांधकामाला चालना देणाऱ्यांवर प्रशासन कारवाई केव्हा करणार.?

 

तिस वर्षांपासून टाळू वरचे लोणी खाणारे ते दोन “आका” कोण.?

 

विशेष प्रतिनिधी (किशोर रायसाकडा ):-

भडगाव शहरातील कोठली रस्त्यावतील शाळा हि दर सहा महिन्यात कुठल्या न कुठल्या विषयात चर्चेत राहते. यातच काही दिवसापूर्वी शाळेच्या परिसरातील पाच ते सहा डेरेदार हिरवेगार निंबाच्या झाडांची मुख्याध्यापकांनी कुठलीही पूर्व परवानगी न घेता हुकूमशाही पद्धतीने झाडांची कत्तल करून डेरेदार झाडांवर निवारा करणाऱ्या हजारो पक्षांना (बगळे व त्यांची छोटी पिल्ले व झाडावरील घरट्यातले शेकडो बगळ्यांची अंडी) मारले गेले होते. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर व शाळेवर गुन्हा दाखल करण्या पर्यंत विषय होता. पण त्या वेळी त्या तक्रारदारांचे व वन विभागाचे तोंड बंद करून तेरी भी चूप मेरी भी चुप करून प्रकरण गोलमाल कऱण्यात आले

 

असताना याच पाच सहा डेरेदार निंबाच्या झाडांच्या जागेवर शाळा तिस वर्षांपासून हुकूमशाही चालवणाऱ्या दोन आका ,संचालक मंडल व मुख्याध्यापकांनी बेकायदा,हमकायदा याठिकाणी गेल्या काही दिवसापासून मोठे बांधकाम सुरु केले आहे. हे करतांना त्यांनी जे डेरेदार निंबाचे वृक्ष कत्तल करून एका लाकूड व्यापार्याला देऊन टाळूवरचे लोणी खाऊन अनेक पक्षांना मारून टाकत. त्या ठिकाणीं नवीन कुठलेही झाडं न लावता अनाधिकृत बेकायदा बांधकामाला सुरुवात केली. या बांधकाम करण्या मागचा उद्देश काय? तसेच शाळेत कुणाला काही माहिती पडत नाही. तिस वर्षा पासुन परीसरात अनेक बांधकामे झाली ती अधिकृत आहेतः की अनाधिकृत तसेच शाळेची मेन बिल्डिंग तीन मजली आहे. त्या किती मजल्यांची परवानगी घेतली आहे. त्या समोर सभा मंडप (स्टेज) बांधण्यात आले त्याची परवानगी घेतली आहे का?त्याचे संपूर्ण टॅक्स हा नगरपालिकेला अदा केला आहे का ? अदा केला नसेल किंवा परवानगी घेतली नसेल तर प्रशासनाने या अवैध बांधकामावर करवाई करावी. व तिस वर्षांपासून हुकूमशाही पद्धतीने संस्था चालवणाऱ्या त्या दोन आका संचालक मंडल व मुख्याध्यापकांवर प्रशासनाने सरळ हाताने कारवाई करावी. अश्या हुकूमशाही पद्धत व बेकायदेशीर कामांना आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!