जळगावमहाराष्ट्रसामाजिक

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बस स्थानक परिसरातील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण गावकऱ्यांच्या पुढाकाराने काढण्यात आले. 

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बस स्थानक परिसरातील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण गावकऱ्यांच्या पुढाकाराने काढण्यात आले. 

 

भडगाव ता.प्रतिनिधी :-

कजगाव येथील बस स्टँड परिसरातील हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण सात ते आठ दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या पुढाकारणाने काढण्यात आले,

 

बस स्टँड परिसर काही प्रमाणात मोकळा झाला असून मात्र बेकायदेशीर रित्या बस स्टँडच्या आजूबाजूला पक्के अतिक्रमण धारकांचे काय असा सवाल नागरिकांनी उपलब्ध केला आहे,

 

 

यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी जळगाव येथे दिनांक 6/3/ 2025 रोजी जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन अतिक्रमण बाबतच्या समस्या सांगितले व त्या संदर्भात निवेदन दिले

 

 

असून त्यासोबत पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिलेले पत्र देखील देण्यात आले आहे,

 

 

आता याकडे माननीय जिल्हा अधिकारी साहेब काय कारवाई करता याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे, कजगाव येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून उद्भवत असून देखील संबंधित शासन पर शासन याकडे सातत्याने काना डोळ्यात करत असल्याने अतिक्रमणाचा वाद गावात वाढत चालला असल्याने याकडे संबंधित अधिकारी जिल्हा अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन पक्के अतिक्रमण धारकांवर त्वरित कारवाई करावी

 

 

अशी मागणी गावातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तरी प्रशासन हे टोकाचे पाऊल उचलत नसल्याने अतिक्रमणधारकांना अभय मिळत आहे, गावात अतिक्रमणधारकांमुळे अनेकांचे वाद-विवाद एकोपाला जातात गावात हात गाडीवर धंदा करणाऱ्यांना अतिक्रम धारक नाहक त्रास देत असल्याने बऱ्याच वेळा हाणामाऱ्या सुद्धा होत असतात तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांवर कठोर अशी कारवाई करून कजगाव गाव कजगाव बस स्टँड परिसर स्टेशन रोड नागद रोड भडगाव रोड चाळीसगाव रोड त्वरित अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!