क्राईमजळगावमहाराष्ट्र

पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या.पतीसह सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल.!!!

पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या.पतीसह सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मृत विवाहितेचे नाव वैशाली पाटील (वय-४३) असे आहे. सदर घटनेप्रकरनी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मृत विवाहितेचा पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलिसात मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “माझी बहीण वैशाली लग्नानंतर सहा ते सात महिने उत्तम राहिली. परंतु त्यानंतर तिच्या पती अनिल पाटील आणि सासू छबाबाई पाटील यांनी तिच्या चारित्र्यवर संशय घेण्यास सुरवात केली.

‘तू मोबाईलवर कोणाशी बोलतेस? तुझे काही संबंध आहे का?’ असे प्रश्न विचारत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला याविषयी मृत वैशालीने तिच्या भावाला “सासरच्या जाचामुळे मी त्रस्त आहे.असे ही कळविले होते” भावाने तिला सावध राहण्यासाठी सांगितले होते की, “तू काही टेन्शन घेऊ नकोस, टोकाचे पाऊल उचलू नकोस.” परंतु

२ मार्च चा सायंकाळी फिर्यादीला त्याचा भाचा रोहित पाटील याने फोन करून आईने फाशी घेतली आहे.”

अशी माहिती दिल्याने या माहितीवरून भावाने तत्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीसांना माहीती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंख्याला लटकलेला विवाहितेचा मृत देह खाली उतरवून ॲम्बुलन्सच्या सहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सदर घटने प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी पाचोरा पोलीसात दिलेल्या फिर्याद वरून रविवारी रात्री मृत विवाहितेचा पती अनिल पाटील व सासू छबाबाई पाटील या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून आरोपी अनिल पाटील यास सोमवारी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!