क्राईम

तरुणीवर सहा नराधमांकडून वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार, भिवंडी येथील घटना 

तरुणीवर सहा नराधमांकडून वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार भिवंडी येथील घटना 

भिवंडी प्रतिनिधी :-

भिवंडी शहरात एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. भिवंडीतील एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला.

आरोपी नराधमांनी अगोदर भावाचे अपहरण करत त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या बहिणीला बोलावून घेतले आणि तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी याप्रकरणी सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील शांतीनगर परिसरात वास्तव्यास असणारी तरुणी तिच्या आतेबहि‍णीकडे गेली होती. दरम्यान, रात्री १२ वाजता तिला अचानक जाग आली तेव्हा तिने बघितले की मोबाईलवर तिच्या भावाचे अनेक मिस्डकॉल होते, ते पाहून तिने भावाला फोन केला. यावेळी भावाने सांगितले की, माझी तब्येत ठीक नाही तू ताबडतोब बागे फिरदौस या ठिकाणी ये. त्यानंतर ती रिक्षाने तिकडे निघाली. ती पोहोचल्यानंतर, सहा आरोपी, ज्यांनी आधीच तिच्या भावाचे अपहरण केले होते आणि त्याला मारहाण केली होती, त्यांनी महिलेला झुडुपात नेले, जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर बागे फिरदौस येथून तरुणीसह तिच्या भावालाही रिक्षात जबरदस्ती बसवून नेण्यात आले. मुख्य आरोपी मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू ,गोलू आणि इतर दोन जण (सर्व राहणार फातमा नगर) यांनी तरुणीला जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता वासनांध नराधमांनी तिला पुन्हा फातमा नगरात आणले आणि तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्ये पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या सर्व प्रकारानंतर हे सर्व नराधम तिला धमकी देऊन पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षा चालकाला सोडून तेथून पसार झाले.

 

या भयंकर घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी सहा गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४(२)(ड) (बलात्कार), ७०(१) (सामूहिक बलात्कार), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत) आणि ३(५) (सामान्य हेतू असलेल्या अनेक लोकांनी केलेला फौजदारी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पीडित तरुणी आता रुग्णालयात आहे आणि पुढील तपास भिवंडीतील शांती नगर पोलिस करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सहा आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!