कृषीजळगावमहाराष्ट्र

भडगाव तालुक्यात तात्काळ मदत द्यावी,शेतकरी सहकारी संघाची मागणी.!!!

भडगाव तालुक्यात तात्काळ मदत द्यावी,शेतकरी सहकारी संघाची मागणी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यात २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, केळी आदी पिके वाहून गेली असून, पशुधनाचे तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी सहकारी संघाने ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे तात्काळ करावेत आणि सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तहसिलदार शितल सोलाट यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघाच्या वार्षिक सभेत संचालक मंडळातर्फे ठराव करून शासनाकडे ही मागणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याच ठरावाची प्रत तहसिल प्रशासनाला देऊन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन सादर करताना शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संचालक अमोल पाटील, व्यवस्थापक सुरेश पाटील, लिपिक अनिल पाटील, साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, समाधान पाटील तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!