जळगावशैक्षणिक

देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर वडजी ता. भडगाव येथे संस्थेचे सन्माननीय चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन व्ही. टी. जोशी होते. समारोप कार्यक्रमाला संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, विजय देशपांडे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा उपस्थित होते.

व्ही. टी. जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त व नेतृत्वगुण विकसित होतात. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे फार महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात मानवी मूल्यांची जोपासना केल्यास त्याचे व्यक्तिमत्व घडते”, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण पाटील, पत्रकार सुधाकर पाटील, वडजी ग्रामपंचायत सदस्य स्वदेश पितांबर पाटील, संजय आनंदा परदेशी, समाधान रामचंद्र पाटील, कैलास रामदास पाटील, भाईदास पाटील, संजय पाटील, दीपक जिजाबराव पाटील, बाबाजी पाटील, पोलीस पाटील कैलास मोरे तसेच वडजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वनराई बंधारा, बेरोजगार तरुण सर्वेक्षण, सामाजिक जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

समारोप सोहळ्यात रोहन दिलीप तडवी, कृष्णा ज्ञानेश्वर कोळी, चेतन रघुनाथ अहिरे, निशा सुनील बागूल व प्रांजल निलेश कासार यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले. तसेच रोशनी योगेश पाटील हिला उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून मान्यवरांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या वतीने सौरभ नाना गायकवाड, चेतन माणिक बोरसे, निशा सुनील बागूल व प्रांजल पाटील यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले, तर आभार प्रा.एस.सी. पाटील यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेकरिता उपप्राचार्य डॉ. डी.एम. मराठे, प्रा.डॉ एस. डी.भैसे, डॉ. ए.एन. भंगाळे, डॉ. सुनील शेलार, प्रा. एम. डी. बिर्ला, प्रा. डॉ.नारायण चिमणकर, प्रा. जी.एस.अहिरराव, प्रा. संजय झाल्टे, डॉ.डी. एच. तांदळे, डॉ. एस. एन. हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, डॉ. गजानन चौधरी, प्रा. अर्चना टेमकर, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ. चित्रा पाटील, डॉ. डी. ए. मस्की, प्रा. रचना गजभिये, प्रा. अधिकराव पाटील, डॉ. प्राजक्ता देशमुख, प्रा. प्रवीण देसले, प्रा. श्रद्धा ठाकूर, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. ज्योती नन्नवरे, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. मयूर दायमा, संदीप केदार, शिक्षकेतर कर्मचारी अजय देशमुख, दिलीप चौधरी, सुनील पाटील, दिलीप तडवी, प्रवीण तडवी, तुळशीराम महाजन आदींनी सहकार्य केले.

समारोप कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक एस.आर.पाटील, प्रा.एल.जी.कांबळे, प्रा.पी.डी.पाटील व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!