Thursday, January 22, 2026
Google search engine
Home Blog Page 107

जशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रम संपन्न.!!!

0

जशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रम संपन्न.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संस्कारधाम केळवाणी मंडळ संस्थापित जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाद्वारे आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात ४ जानेवारी २०२५ रोजी “लेखकांशी चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर सत्रासाठी दोन प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा आणि कवी गुरुदत्त वाकदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. विद्या हंचिनाळ (आयोजक) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी उपस्थितांना प्रोत्साहनपर शब्दांत संबोधित केले. प्रा. चैताली धनू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.

सॅबी परेरा आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी आजच्या पिढीला आवश्यक असलेले वाचन तसेच त्या वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच लोप पावत चाललेल्या वाचक वर्गाबाबत खंत व्यक्त केली. पुस्तके विद्यार्थ्यांवर कसे संस्कार घडवू शकतात याची जाणीव करून दिली. कार्यक्रमात गुरुदत्त वाकदेकर आणि रविंद्र पाटील यांनी स्वरचीत मराठी कवितांचे वाचन देखील केले आणि त्यांचे साहित्यिक अनुभव कथन केले.

सदर कार्यक्रमात प्रा. सायली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस वितरण समारंभाचाही समावेश होता. आंतरवर्गीय पुस्तक समीक्षा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा (विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी), बुकमार्क मेकिंग स्पर्धा यासह शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध ग्रंथालयीन कार्यक्रमांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमास जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य, बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, बीएससी आयटी तथा मराठी वाड्मय मंडळाचे विद्यार्थी; तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीदेखील उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात एका वाचन प्रेरणेने झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. साहित्य आणि वाचनाच्या सवयींना चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे. उत्साहाने भारलेल्या ह्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. प्रणिता कामत यांनी केले. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा” ह्या उपक्रमामुळे श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात उत्साही वातावरण

0

वाचन संकल्प महाराष्ट्राचा” ह्या उपक्रमामुळे श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात उत्साही वातावरण

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम मुंबई येथील श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. इंग्रजी नूतन वर्षाची सुरूवात ही विद्यार्थिंनीना ग्रंथालयाच्या दिशेने नेणारी आहे, ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नाही, असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी मांडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विशेष आभार व कौतुक केले. महाविद्यालयातील ‘जी ओ शाह ग्रंथालया’च्या ग्रंथापाल अश्विनी प्रभू ह्यांच्या मार्गदर्शनाने २९ डिंसेबर २०२४ रोजी ग्रंथालयातील परिसर शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिंनींच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुस्तक प्रदर्शन भरवून त्यातील प्रेरणादायी पुस्तकांतून विशेष कार्य करणाऱ्या महंतांची ओळख विद्यार्थिंनीना करून दिली. १ ते ७ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या सहकार्याने उत्कृष्ट व प्रेरणादायी साहित्य तसेच कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णन इ. पुस्तकांचे वाचन व त्यावर आधारित गटचर्चा करण्यात आल्या, जेणेकरून विद्यार्थिंनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. पुढील दिवसांमध्ये वाचन कौशल्यावर आधारित कादंबरीचे अभिवाचन, लेखक-वाचक संवाद भेट, पुस्तक परीक्षण स्पर्धा असे उपक्रम रावबिण्यात येणार आहेत.

गोंडगाव विदयालयात नानासाहेब चव्हाण यांची जयंती साजरी.!!!

0

गोंडगाव विदयालयात नानासाहेब चव्हाण यांची जयंती साजरी.!!!

गोंडगाव विदयालयात शिक्षणमहर्षी कर्मवीर नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. कल्याणराव वाघ यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन श्री. व्हि. ए. पाटील यांनी शिक्षण महर्षी, कर्मवीर नानासाहेबांच्या अनमोल कार्याविषयी माहिती दिली. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. कल्याणराव वाघ,

श्री. प्रमोद जाधव, श्री. चंद्रकांत सोन्नीस, श्री. सुभाष चौधरी, श्री. वसंतराव पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. प्रशांत सोळंके, श्री. भुषण बोरसे, श्री. सुधीर आम्ले, श्री. राजु सैंदाणे, श्री. निलेश मोरे, श्री. प्रसाद देशमुख, श्री. समाधान भोपे, श्री. अशोक परदेशी, श्री. संजय मोरे, श्री. वाल्मिक जाधव आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी हजर होते

 

कासोदा येथे भाजपा सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

0

कासोदा येथे भाजपा सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

कासोदा प्रतिनिधि :-

संपूर्ण देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असुन राष्ट्रिय अध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता या अभियानात सहभागी होत आहे.

येथे दि.५ जानेवारी रोजी भाजप सदस्यता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला.मोठया प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्यात आली.

त्या प्रसंगी डॉ. राधेशाम चौधरी , नरेंद्र पाटील , ऋषिकेश पाटील , नरेश ठाकरे , सागर शेलार , शैलेश पांडे , ज्ञानेश्वर शिंदे , शैलेश मंत्री , ज्ञानेश्वर खैरणार , भूषन खैरनार , शुभम समदानी , जयेश सुतार , वैभव पाटील , सुरेश पाटील , आबाजी पाटील तथा भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

भाजपाचे हे सदस्यता नोंदणी अभियान १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असुन ८८००००२०२४ या नंबर वर मिस कॉल द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येणार आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेची पसंती कायम असुन देश सुरक्षित राहण्याची भावना या अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांनी व्यक्त केली.

बॅंडने वाजत गाजत गुरुजनांची गाडीवर मिरवणुक. विदयार्थ्यांनी केला नाचुन आनंद व्यक्त.

0

बॅंडने वाजत गाजत गुरुजनांची गाडीवर मिरवणुक. विदयार्थ्यांनी केला नाचुन आनंद व्यक्त.

वाडे येथे दहावीचे माजी विदयार्थी स्नेह मेळाव्याला ३८ वर्षांनी आले एकञ. अनोखे स्नेह संमेलन.

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव येथील रा.स. शि. प्र. मंडळ संचलीत वाडे येथील माध्यमिक विदयालयातील सन १९८५, १९८६ या वर्षांच्या दहावीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी दहावीचे शिक्षण घेऊन शाळेतुन बाहेर पडलेल्या माजी विदयार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजीत करण्यात आला होता. आपण बालपणी शिक्षण घेतलेल्या वाडे येथील माध्यमिक विदयालयात हा कार्यक्रम उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपात गुरुजनांचा सन्मान केला. व माजी विदयार्थी, विदयार्थींनींनी आपला परीचय देत बालपणीच्या शाळेतील गमती, जमती, केलेला खोडसाळपणा, शिक्षकांनी शिक्षणाचे पाजलेले ज्ञानरुपी अमृत, शिक्षकांनी केलेली शिक्षा यासह शालेय जीवनातील आलेले प्रसंग मांडुन बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. या स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल ३८ वर्षानंतर गुरुजनांच्या उपस्थितीत पुन्हा एकञ येत शाळा भरल्याचा आनंद दिसुन आला. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजता गुरुजनांना फेटे बांधुन सजविलेल्या गाडीवरुन चाळीसगाव येथील आनंद बॅंडच्या सुमधुर गितांच्या ताला सुरात गावातुन गुरुजनांसह माजी विदयार्थी, विदयार्थीनींची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत या माजी विदयार्थी अन विदयार्थ्यांनी आनंद बॅंडच्या सुमधुर धुमधडाक्यात नाचुन मनमुराद आनंद घेतला. असा हा गुरुजन अन दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे अनोखे स्नेह संमेलन गावात खास आकर्षण ठरल्याचे दिसुन आले.

वाडे विदयालयात आकर्षक अन उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपरुपी वर्गातच हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एस. एस. पाटील हे होते. सुरुवातीस सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन गुरुजनांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित गुरुजन व गावातील मान्यवरांचा सत्कार माजी विदयार्थी, विदयार्थींनींच्या हस्ते करण्यात आला. गुरुजनांना सन्मानपञ फ्रेम, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर रा. स. शि. प्र. मंडळाचे माजी संचालक डाॅ. कर्तारसिंग परदेशी, एस. एस. पाटील, एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. बी. मोरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव, एस. जी. अहिरे, परमेश्वर टीळकर, पी. के. मोरे, ओंकारदास बैरागी, शिवाजी पाटील आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचलन गसचे माजी संचालक सुनिल निंबा पाटील व सुनिल भाऊराव माळी यांनी केले. प्रास्तविक कैलास माळी यांनी केले. यावेळी मुकुंदा माळी, सुरेखा पाटील, विदया पाटील, भटाबाई माळी, सरलाबाई परदेशी, अशोक परदेशी,चंद्रकांत मोरे, शरद महाजन, सुनिल पाटील, शामकांत बोरसे, चंद्रकांत अमृतकार, रविंद्र पाटील, नाना मरसाळे, राजु परदेशी, हरीचंद्र माळी, राजु माळी, अर्चना पाटील, महम्मद खाटीक यांचेसह विदयार्थी, विदयार्थीनींनी आपल्या शाळेतील बालपणीच्या आठवणी मनोगतातुन मांडुन गुरुजनांचे आभार मानले. तसेच यावेळी एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. जी. अहिरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव आदि शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातुन शिक्षक एस. एस. पाटील यांनी विनोदी शैलीतुन अन अलंकारीक रुपाने शब्दांची गुंफन करीत बालपणीच्या विदयार्थी, विदयार्थींनी अन गुरुजनांच्या नात्याची मांडणी केली. आपले जीवन सुखी व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. विदयार्थ्यांनी व्यसनांपासुन दुर राहावे. असेही एस, एस. पाटील यांनी सांगीतले. यावेळी एकच हास्याचे फवारे उडाल्याचे चिञ पहावयास मिळाले.

याप्रसंगी वाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गुलाब पाटील, माजी उपसरपंच प्रदिप भिल्ल, सदस्य रविंद्र सोनवणे, विकासोचे चेअरमन विजय परदेशी, प्रथम महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, मी वाडेकर गृपचे जगतसिंग राजपुत यांचेसह नागरीकांचीही उपस्थिती होती. आभार सुनिल भाऊराव पाटील यांनी मानले. तसेच कार्यक्रमानंतर गावापासुन जवळच असलेल्या राजेंद्र हरी पाटील यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात स्नेह भोजनाचा आनंद गुरुजनांसोबतच माजी विदयार्थी, विदयार्थीनी, नागरीकांनी घेतला.कार्यक्रम यशस्विततेसाठी सर्व वर्ग मिञ, मैञिणींनी अनमोल परीश्रम घेतले.

 

पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी मदत करणार – ना. गुलाबराव पाटील

0

पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी मदत करणार – ना. गुलाबराव पाटील

 

देशदूतचे मुख्य उपसंपादक चेतन साखरे दर्पण पुरस्काराने सन्मानित

 

जळगाव प्रतिनिधी :-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन भवन येथे ६जानेवारी सोमवारी रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दर्पणदिनानिमित्त आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ

पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरजी रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिनजी गोसावी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,उपाध्यक्ष भुवनेशजी दुसाने, विभागीय उपाध्यक्ष प्रा विजय गाढे,संपर्क प्रमुख राकेश सुतार,ग्रामीण जि अध्यक्ष, नागराज पाटील, कार्याध्यक्ष गणेश रावळ, महेंद्र सूर्यवंशी,जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले,प्रा.सी एन.चौधरी,सागर शेलार,चेतन महाजन,प्रवीण पाटील,पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र राजेंद्र, स्वप्निल कुमावत,सुनील कोळी, खैरनार,प्रल्हाद पवार, मुझम्मील शेख,

आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारीआयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, डीआयजी दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव देशदूतचे चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किशोर पाटील, संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे नरेंद्र पाटील, निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार

प्रदान करण्यात आला.

पत्रकारांचे स्थान समाजात खुप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा असा महत्वाचा सल्ला आ. राजूमामा भोळे यांनी यावेळी दिला. पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे

 

हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील मार्गदर्शन केले.

 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी. शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

भडगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न.!!!

0

भडगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि सौ. र.ना.देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भडगाव येथे महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा उद्धाटन कार्यक्रम कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, उपप्राचार्य प्रा.डॉ.दिपक मराठे सर,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. संजय भैसे सर,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. देवेंद्र मस्की सर, सायबर साक्षरता विषयातील वक्त्या भडगाव पो.स्टे. च्या महिला पोलीस काँस्टेबल श्रीमती सोनी सपकाळे मॅडम, श्रीमती शमिका पठाण मॅडम हे उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ॲड. अमोल पाटील यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी युवतींनी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. स्पर्धायुगात आवश्यकतेनुसार विविध कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करून इतरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

सायबर सुरक्षा या विषयावर श्रीमती सोनी सपकाळे मॅडम आणि श्रीमती शमिका पठाण मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.

६ जाने. ते ११ जाने.पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सायबर सुरक्षा, बँक व्यवहार साक्षरता, स्वयंरोजगाराच्या शासकीय योजना, सॉफ्ट स्किल या विषयांवर विविध वक्त्यांची मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय भैसे सर, सूत्रसंचलन प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम, आभारप्रदर्शन प्रा.टेमकर मॅडम यांनी केले.

शिव उद्योग संघटनेचा महिला सक्षमीकरण धोरणा अंतर्गत यशस्वी मेळावा

0

शिव उद्योग संघटनेचा महिला सक्षमीकरण धोरणा अंतर्गत यशस्वी मेळावा

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०२५ सालामध्ये शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दामू नगर, कांदिवली पूर्व येथे हेमलता नायडू महिला शाखाप्रमुख मागाठाणे शाखा क्रमांक २६ यांनी स्थानिक शाखाप्रमुख सचिन केळकर यांच्या सहकार्याने महिला मुक्तीदिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा आयोजित केला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महिला मेळाव्याचा उद्देश शाखाप्रमुख सचिन केळकर यांनी विषद करत मेळाव्याची सुरवात केली. महिला शाखाप्रमुख हेमलता नायडू यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिव उद्योग संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. सहकार सेना मागाठाणे प्रमुख रुचिता भोसले यांनी महिलांनी उद्योग व रोजगार क्षेत्रात कार्यरत शिव उद्योग संघटनेच्या विविध उपक्रमांचा लाभ महिलांनी घेण्यासंबंधी आवाहन केले.

सदर मेळाव्यात शिव उद्योग संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी शिव उद्योग संघटनेच्या कार्याची व भावी वाटचालीची तसेच शिव उद्योग संघटनेच्या माझा महाराष्ट्र या

ई-कॉमर्स वेबसाईट आणि महिला सेवा गटा संदर्भात माहिती दिली.

तद्नंतर इंडी श्रेष्ठ शास्त्रम् आयुर्वेदिक हेयर ऑइल कंपनीचे व्यवस्थापक योगेंद्र नाविक यांनी कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीतून महिलांना होणारा फायदा याबद्दल मार्गदर्शन केले. नंतर स्टे फाईन मल्टीव्हेंचरचे संचालक सूरज कुंभार व मोहिनी पुजारी यांनी महिला आरोग्य व नारी प्रोटेक्ट हे कंपनीचे उत्पादन याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली व विभागातील महिला कंपनीला जोडल्या गेल्यास त्यांना होणारा आर्थिक फायदा याबद्दल माहिती दिली. सदर मेळाव्याला अंदाजे अडीचशे होऊन जास्त महिला उपस्थित होत्या. अनेक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदविले.

सदर मेळाव्याला स्थानिक पदाधिकारी बापूराव चव्हाण, समन्वयक माधुरी समेळ, समन्वयक अर्चना वर्पे , कार्यालय प्रमुख सोनाली चतुर्वेदी , सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख व महिला बचत गट यांची विशेष उपस्थिती होती.

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांची सदिच्छा भेट

भडगाव प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टी भडगाव मंडलाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आज भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरूवात करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांनी नोंदणी शिबीराला भेट देऊन समाधान व्यक्त केले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचा परिचय करून मार्गदर्शन केले.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क करून सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजपाशी जोडण्याची सूचना यावेळी केली.

आज दिवसभरात भडगाव मंडलातील जास्तीत जास्त पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून,घरोघरी संपर्क करुन नोंदणीसाठी प्रयत्न केलेत.१५० पेक्षा जास्त कार्यकर्ते आज दिवसभरात सक्रिय होते. १३००हून जास्त प्राथमिक सदस्यांची आज विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान १५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहेत.

 

याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्य. सदस्य तथा विधानसभा संयोजक अमोल नाना पाटील, सदस्य नोंदणी अभियानाचे मंडल संयोजक तथा तालुका सरचिटणीस अनिल मुरलीधर पाटील, अभियानाचे सह संयोजक तथा तालुका उपाध्यक्ष प्रमोद देविदास पाटील, अभियानाचे आय.टी. संयोजक मनोहर तुकाराम चौधरी, शक्तीकेंद्रप्रमुख मनोज सिताराम पाटील माजी शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष विजय सुभाष वाणी, वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वैद्यकिय आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. शेखर पाटील, अनु.जमाती मोर्चाचे सुभाष मोरे,ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान अर्जुन पाटील, बुथप्रमुख हिम्मत बडगुजर, दिपक दादाजी पाटील, जगदिश नारायण सोनवणे,मनोहर रामराव पाटील, अमोल प्रकाश सोनजे,पप्पू विरभान पाटील, राजेंद्र एकनाथ माळी,हेमंत धर्मराज वाडेकर, योगेश कांतीलाल शिंपी, राजू संतोष मोरे, प्रमोद प्रल्हाद पाटील, गोरख रघुनाथ महाजन, निलेश पाटील, यांची उपस्थिती होती.

सदस्यता नोंदणी शिबीर यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

0
1-3248x1440-2-0#

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव पोलिसांनी आयोजित केलेला सत्कार समारंभ, शहरातील सद्भाव आणि एकतेचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. गणेश मंडळ आणि ईद-ए-मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडणाऱ्या मंडळाचे सत्कार करून पोलिसांनी सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

 

भडगाव येथे आज रोजी भडगाव पोलिस स्टेशन यांच्या कढून पोलिस स्थापना दिनानिमित्त भडगाव शहरातील उत्कृष्ठ गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडली त्यांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय

तर तृतीय समांचिन्ह देण्यात आले या कार्यकामाचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघांचे आ. किशोर आप्पा पाटील होते यांचे हस्ते सर्व गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत काढणारे सर्वांना समांचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले याच्यात

पहिले क्रमांक

आझाद चौक मित्र मंडळ भडगाव

दुसरा क्रमांक

जागृती गणेश मंडळ भडगाव

तिसरा क्रमांक

जय बजरंग मित्र मंडळ यशवंत नगर भोईवाडा

ईद ए मीलाद जलाली मोहला पंच कमिटी भडगाव देण्यात आले

आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक मस्के साहेब यांनी केलं त्यावेळी खालील पैकी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत भडगाव पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के,पोलिस उप निरीक्षक,सुशील सोनवणे, पोलीस गोपनीय विभागाचे निलेश ब्राह्मणकर महिला दक्षता समिती अध्यक्ष व समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळ ईद-ए-मिलाद चे पंचमंडळ आणि आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते

भडगाव शहरातील विविध धर्मांचे लोक एकत्रितपणे राहतात आणि त्यांच्या सन उत्सवांना एकमेकांचा आदर करतात.

पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कामच केले नाही, तर शहरातील सद्भाव वाढवण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

विजेते मंडळांनी दाखवलेली जबाबदारी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, इतर मंडळाना प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांची उपस्थिती, या कार्यक्रमाच्या महत्त्वावर भर दिले.

हा सत्कार समारंभ केवळ एक कार्यक्रम नसून, एक संदेश आहे. तो संदेश आहे, सद्भाव, एकता आणि शांतता हीच खरी प्रगतीची पायाभूत शिला आहे. हा कार्यक्रम भडगावच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकतो.

error: Content is protected !!