Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 111

1 गुंठा जमीनीची खरेदी विक्री करणे शक्य; हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

0

1 गुंठा जमीनीची खरेदी विक्री करणे शक्य; हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

नव्या सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे विविध विधेयके आणि निर्णय मंजूर करण्यात आले.

त्यापैकी एक सर्वात मोठा निर्णय म्हणजे तुकडेबंदी कायद्यासंदर्भातील निर्णय. तो म्हणजे यापुढे शेतकरी असो किंवा कोणीही त्यांना 1 गुंठा जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे. या आधी तुकडेबंदी कायद्यांतर्गत तसे करण्यास राज्य शासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. परंतू महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारच्या हिवाळी अधिवेशनात यांदर्भात निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि त्यासंदर्भात आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

 

जमिनीचे छोटे छोटे भाग केल्याने पिकाची उत्पादकता नष्ट होते आणि त्यामुळे नुकसान होते असे असल्याने जमीनीचे छोटे छोटे भाग खरेदी किंवा विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतू एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी विहिर बांधायची असेल किंवा शेतरस्ता काढायचा असेल तर त कमी प्रमाणात जमीन खरेदी करुन ही कामे करता येत नसल्याने शेतकऱ्याची अडचण होत असे

तुकडेबंदी कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारे काही बदल केले आणि त्यानुसार शासनाने संबंधीत शासन निर्णय देखील काढला आहे. खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता.

विहिर बांधणे शक्य

हिवाळी अधिवेशनातील विधेयकामुळे शेतकऱ्यांना यापुढे विहिर बांधण्यासाठी 1 ते 2 गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी करता येणार आहे.

शेततळ्यासाठी जमीन मिळवणे शक्य

तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करुन महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयानुसार 1 गुंठा जमीन यापुढे खरेदी विक्री करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे शेततळ्यांसाठी जमीन मिळवणे शक्य झाले आहे.

शेतरस्त्यासाठी जमीन मिळवणे शक्य

नव्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना शेतरस्त्यासाठी लागणारी 1 गुंठा जमीन खरेदी करता येणांर आहे. याआधी तसे करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

घरकुल योजनेमार्फत घर बांधता येणार

एखाद्या व्यक्तीस घरकुल योजनेमार्फत घर बांधायचे असेल आणि त्याच्याकडे जमीन नसेल तर या योजनेअंतरर्गत ती व्यक्ती घरासाठी लागणारी 1 ते 2 गुंठे जमीन खरेदी करु शकणार आहे. कारण विधेयकात तसे नमूद करण्यात आले आहे की शासकीय योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी कमी प्रमाणात जमीन खरेदी करणे शक्य आहे.

 

आता मात्र, बाजारमूल्याच्या ५ टक्के शुल्क भरून तुम्ही १ गुंठ्याची खरेदी-विक्री करू शकता. याबाबत यापूर्वी एक अद्यादेश काढण्यात आलेला होता. त्याचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी विविध मंत्र्यांनी यांनी विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये विधेयक सादर केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यामार्फत ती मंजूर झाले आहे. शासकीय नियमांनुसार, घर बांधकाम, विहिरी खोदकाम, आणि शेत रस्त्यासाठी केवळ १, २, ३, ४, ५ गुंठ्याची खरेदी-विक्री करता येईल. यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!

0

जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!

सोलापूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील चार लाख 68 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहाराचे अनुदान रखडल्याने पोषण आहारातून अंडी गायब झाल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे.

अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे पालकांतून बोलले जात आहे.

थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शाळांमध्ये अंडी देणे गरजेचे आहे, पण नेमक्या त्याच काळात आहारातून अंडी गायब झाली आहेत. अंडी न खाणार्‍या विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून केळी, फळे पुरवण्याचा शासन निर्णय आहे; परंतु हा निर्णय कागदावरच राहत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्याचा निर्णय झाला. मात्र, याकडे शाळेकडून दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हिवाळ्यात अंड्यांपासून वंचित राहात आहेत. ऐन हिवाळ्यामध्येत पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून पालक वर्गातून होत आहे.

– वैभव राऊत, लेखाधिकारी, शालेय पोषण आहारपोषण आहाराचे अनुदान मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या पत्रानुसार लवकरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करावे. तसेच ज्या शाळा पोषण आहारामध्ये अंडी देणार नाहीत, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

0

1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

नवी दिल्ली :-

भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत

या योजनांचा लाभ अनेक लोक घेत आहेत. ज्या लोकांना २ वेळेचे जेवण नीट मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून काही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे.

‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द.देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

1 जानेवारीपासून केली जाणार कारवाई

बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने १ जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ई-केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात.

शाळेच्या शिक्षिकेकडून दहावीतील विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

0

शाळेच्या शिक्षिकेकडून दहावीतील विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

पुणे प्रतिनिधी :-

खडक पोलिस ठाण्याचे हद्दीत एका इंग्लिश मिडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने स्वत:ची लैंगिक इच्छा भागविण्यासाठी, दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळयात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या शिक्षिका असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदावर काम करत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेचे कालावधीत पालकत्वाची शिक्षिक या नात्याने संपूर्ण जबाबदारी आपली असते हे माहिती असताना देखील, त्यांनी १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याच्या सोबत प्रेमसंबंध जुळवले. तो प्रिलियम परिक्षेस शाळेत हजर असताना, त्यास प्रेमाची भुरळ पाडून शारिरिक संबंधासाठी प्रोत्साहित व उत्तेजीत करुन आपल्या शरीर सुखासाठी त्याचा वापर करुन त्याच्याशी शाळेच्या आवारात शारिरिक संबंध प्रस्थापित करुन अल्पवयीन विद्यार्थ्याची लैंगिक सतावणूक केली. याबाबत खडक पोलिस पुढील तपास करत आहे.

श्रध्दाताई शिंदे यांचा बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम

0

बांधकाम कामगारांना भांडी व ट्रंक वाटप

 

श्रध्दाताई शिंदे यांचा बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम

सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा श्रध्दाताई शिंदे‌ यांच्यावतीने बांधकाम कामगारांना ‌भांडी व पेटी वाटप करण्यात आले. त्यांनी बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.

सदर उपक्रम केवळ बांधकाम कामगारांचा सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत करेल असे नाही तर त्यांचे जीवनमान सुधारण्यासही हातभार लावेल. या उपक्रमाद्वारे कामगारांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबासह चांगले जीवन जगू शकतील.

सदर उपक्रम केवळ कामगारांसाठीच नाही तर समाजासाठीही एक सकारात्मक विचारांचे पाऊल आहे, याचे कौतुक करायला हवे. हा उपक्रम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यास हातभार लावेल.

बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!

0

बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!

भडगाव वार्ताहर —

भारताचे पहिले कृषी मंञी डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त दि. २७ डिसेंबर रोजी नाशिक येथे भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. येथील आदर्श शेतकरी तथा परदेशी, राजपुत समाजाचे तंटामुक्त समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद बालचंद परदेशी यांचेसह रेखाबाई परदेशी असा सपत्निक मान्यवरांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन ट्राॅफी, सन्मानपञ, साडी देऊन कुटुंबासह सन्मानीत करण्यात आले. यावेळी सोबत परदेशी, राजपुत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, विनोद परदेशी यांची मुलगी ममता परदेशी हे ही कार्यक्रमास उपस्थित होते.

 आमची माती आमची माणसं. जय किसान फार्मस फोरम 

 डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भारतातील टॉप टेन मधील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर, 

 ब्रिगेडियर सुधीर सावंत मुंबई , सदुभाऊ सळके सेंद्रिय शेती तज्ञ , मा खासदार भास्कर भगरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विनोद परदेशी यांचे जळगाव जिल्हयातुन अभिनंदन होत आहे. 

फोटो — नाशिक येथे कार्यक्रमात विनोद परदेशी यांचेसह सपत्नीक पुरस्काराने सन्मानीत करतांना मान्यवर, बाजुला उपस्थित समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, ममता परदेशी आदि.

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

0

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-३ केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अरूण पालव, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे, मच्छिंद्र पाटील तसेच परीक्षक रमाकांत भालेराव, विवेक खेर, प्रतिभा नागपुरे तेटू यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सायली साळवी यांनी केले.

 

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये डॉ. तृप्ती झेमसे लिखित तसेच अभिषेक भगत दिग्दर्शित “कॅनिबल” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.

 

स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू झाली असून ८ जानेवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध २० नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.

 

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.

 

तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर हे काम पाहात आहेत.

कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची – डॉ. मानसी पाटील

0

This Content Is Only For Subscribers

Please subscribe to unlock this content.
error: Content is protected !!