जळगावसामाजिक

तांदुळवाडीतील ५ तरुणांची संरक्षण दलात निवड. ग्रामस्थांकडुन मिरवणुक.

तांदुळवाडीतील ५ तरुणांची संरक्षण दलात निवड. ग्रामस्थांकडुन मिरवणुक.

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील तांदुळवाडी गावातील ५ तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणुक काढुन जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.

निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), मयुर नाना पवार (सीआयएसएफ ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ ), गौरव अनिल पाटील (बीएसएफ ) व अनंत तुकाराम मोरे ( इंडीयन नेव्ही) यांचा समावेश आहे.

या प्रसंगी पत्रकार अशोक परदेशी व प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या तरुणांनी केलेली मेहनत व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

ग्रामस्थांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत या जवानांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी मिरवणुकीत, तरुण मंडळी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!