जळगावशासकीय

लोणपिराचेचे सुपुत्र श्री. रवींद्र गोरख पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) पदोन्नती.!!!

लोणपिराचेचे सुपुत्र श्री. रवींद्र गोरख पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) पदोन्नती.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील लोणपिराचे या छोट्याशा गावाने आज मोठा सन्मान मिळवला आहे. या गावचे सुपुत्र श्री. रवींद्र गोरख पाटील यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रामाणिक सेवेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे पोलीस खात्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या अथक मेहनतीचे आणि निष्ठेचे फलित मानले जात आहे.

या पदोन्नतीची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

श्री. रवींद्र पाटील यांचे यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक न राहता, जिल्ह्याच्या उज्ज्वल प्रतिमेला बळकटी देणारे ठरत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!