क्राईमजळगाव

कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!

कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी आमीन पिंजारी

कजगाव परिसरात चोरीच्या घटनांना उधाण आले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आडत व्यापारी रामकृष्ण दयाराम वाणी यांच्या पिंप्री शिवारातील गोडाऊनमधून सुमारे ५० हजार रुपये किमतीची तुरदाळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हे गोडाऊन कजगाव-नागद मुख्य रस्त्यालगत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

त्याचप्रमाणे, दिनांक ७ रोजी सावता माळी चौक येथील रहिवासी शाकीर इस्माईल मन्यार यांच्या अंगणातून २५ हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्या. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी व पशुपालक वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

कजगाव परिसरात यापूर्वीही अशा अनेक चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लागलेला नाही, ही बाब गंभीर आहे. येथील पोलीस मदत केंद्रात कोणताही पोलीस कर्मचारी नियमित राहत नसल्याने ते केवळ नावापुरते उरले आहे. येथे केवळ एखाद्या प्रसंगीच पोलीस येतात, हे वास्तव असून, त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांकडून या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येथील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!