जळगावराजकीय

भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश.!!!

भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश.!!!

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकार्यातून प्रेरित होऊन घेतला निर्णय

पाचोरा प्रतिनिधी :-

राजकारणात कार्य, निष्ठा आणि जनसंपर्क या तिन्हींचा संगम असलेले धडाडीचे कार्यकर्ते डी.डी. नाना यांनी शिवसेनेत प्रवेश करून पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चर्चा सुरू केली आहे.

भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे डी.डी. नाना यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान लोहटार-खडकदेवळा गटाची धुरा आपल्या खांद्यावर घेत प्रभावी नेतृत्व केले होते. वैशालीताईंनी त्यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती.

मात्र, कार्यसम्राट, कार्यकुशल आणि विकासपुरुष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन डी.डी. नाना यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शिवसेना संघटनेला बळकटी मिळाली आहे.

या प्रवेश सोहळ्यावेळी भावी जिल्हा परिषद सदस्य भरत बापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक भाऊ राजपुत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, माजी सरपंच आर.आर. पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, तसेच शिवसेना शाखा प्रमुख धनराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी डी.डी. नाना यांच्या नेतृत्वगुणांचे आणि त्यांच्या जनसंपर्क क्षमतेचे कौतुक केले. “नानांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला लोहटार-खडकदेवळा गटासह संपूर्ण परिसरात नवे बळ मिळेल,” असे मत भावी जिल्हा परिषद सदस्य भरत बापू पाटील यांनी व्यक्त केले.

डी.डी. नाना यांनी या प्रसंगी सांगितले की,

> “आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न असेल.”

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण असून ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!