जळगावराजकीयसामाजिक

सन्मान स्वच्छतेच्या खऱ्या शिल्पकारांचा.!!!

सन्मान स्वच्छतेच्या खऱ्या शिल्पकारांचा.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये भडगाव नगरपरिषदेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत एक गौरवशाली यश संपादन केले आहे! या यशाचे खरे श्रेय जाते आपल्या स्वच्छतादूत बांधव-भगिनींना – ज्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भडगाव शहर स्वच्छतेच्या दिशेने उजळून निघाले आहे.

या निमित्ताने शिवसेना – युवासेना व स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी श्री. रविंद्र लांडे साहेब आणि १२५ सफाई कर्मचारी बांधव-भगिनींचा सत्कार समारंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री. लखीचंद भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, मा. नगराध्यक्ष राजू जिभू पाटील, युवराज आबा पाटील, डॉ. प्रमोद पाटील, नगरसेवक जग्गू भोई, जितू आचारी, विजू भोसले, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, आबा चौधरी, दुर्गेश वाघ, चंद्रकांत पाटील, शेख वकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे संचालक पिंटू मराठे, महेंद्र ततार, निलेश पाटील, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, चेतन राजपूत, पप्पू पाटील, रघुनंदन पाटील, महेश पाटील, प्रशांत सोनवणे, चेतन काळे, दिग्विजय राजपूत, तेजस पाटील, विनय पाटील, सुनील राजपूत, किशोर राजपूत, प्रदीप पाटील, दर्शन शिंपी, सुदर्शन कोळी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रविण महाजन सर यांनी केले.

> “सफाई कामगार म्हणजेच शहराचा आत्मा – त्यांना दिलेला सन्मान हाच खऱ्या भारताची ओळख दर्शवतो!”

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!